शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

वाटाण्याला क्विंटलला १० हजार भाव!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2021 04:45 IST

सातारा : अनेक भाजीपाल्यांचे दर कमी झाले असले तरी वाटाणा मात्र, चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सातारा बाजार समितीत ...

सातारा : अनेक भाजीपाल्यांचे दर कमी झाले असले तरी वाटाणा मात्र, चांगलाच भाव खाऊ लागला आहे. सातारा बाजार समितीत तर वाटाण्याला क्विंटलला १० हजारापर्यंत भाव मिळू लागलाय. तसेच फ्लॉवरचाही दर वाढलाय. यामुळे शेतकऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, तीन आठवड्यांपूर्वी वाटाण्याचा दर ३ हजारापर्यंत खाली आला होता.

सातारा बाजार समितीत जिल्ह्यातील सातारा, कोरेगाव, खंडाळा, जावळी, कोरेगाव, माण, फलटण या तालुक्यांतून भाजीपाला येत असतो. आवक आणि मागणीच्या प्रमाणात बाजार समितीत दर ठरतो. मंगळवारी ३७५ क्विंटल फळभाज्यांची आवक झाली. तर कांद्याची अवघी ७५ क्विंटलची आवक झाली. कांद्याला क्विंटलला ३०० पासून १७०० रुपयांपर्यंत दर मिळाला. तर वांग्याला अजूनही दर कमीच मिळत आहे. वांग्याला १० किलोला १०० ते २०० रुपये दर मिळाला. टोमॅटोला ६० ते ८० रुपये दर आला. टोमॅटोचा दर कमी झाला आहे. फ्लॉवरला १० किलोला ३०० ते ४०० रुपये भाव आला. फ्लॉवरचा भाव टिकून आहे. यामुळे शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळू लागले आहेत.

हिरव्या मिरचीला क्विंटलला ८०० ते १५०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. मिरचीच्या दरात फारसा फरक पडलेला नाही. यामुळे शेतकऱ्यांत नाराजीचे वातावरण आहे. तरीही भाजी मंडई, छोटे विक्रेते ४० रुपये किलोपर्यंत हिरवी मिरची विकत आहेत. आल्याला क्विंटलला २ हजार, तर लसणाला ६ हजारांपर्यंत दर मिळत आहे. मागील दोन महिन्यांपासून आले आणि लसणाच्या दरात फार फरक पडलेला नाही. त्याचबरोबर बटाटाही स्वस्तच आहे. सातारा बाजार समितीत बटाट्याला क्विंटलला १३०० ते १४०० रुपये दर मिळत आहे. बटाट्याचा दर महिन्यापासून स्थिर आहे.

चौकट :

गवारला भाव कमी...

बाजार समितीत वांगी, टोमॅटो यांचे दर उतरलेले आहेत. तसेच गवारच्या दरावरही परिणाम झाला आहे. मंगळवारी तर गवारला १० किलोला अवघा २५० ते ३०० रुपये भाव आला. शेवगा शेंगला ३०० ते ४००, काकडीला १०० ते १५०, वाल घेवडा १५० ते २००, काळा घेवडा ३०० ते ४००, ढबू १०० ते १५०, भेंडी १५० ते २०० तसेच गाजरला १० किलोला २०० ते ३०० रुपये भाव आला.

.....................

बाजार समितीत भाज्यांचा भाव कमी झाला आहे. तरीही सध्या वाटाण्याला दर मिळतोय. त्यामुळे कुठेतरी समाधान वाटत आहे. तरीही वांगी, बटाटा, टोमॅटो, कांद्याचा दर वाढण्याची गरज आहे.

- सोपान पाटील, शेतकरी

.......................................................................