शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

येरळवाडी तलावात १० लाख मत्स्यबीज

By admin | Updated: November 9, 2014 23:35 IST

‘वेदावती’ संस्थेचा पुढाकार : धरणग्रस्तांना रोजगाराची संधी

वडूज : येरळवाडी, ता. खटाव येथील वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्थेच्यावतीने येरळवाडी मध्यम प्रकल्पात तब्बल दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आले.वेदावती मच्छीमार संस्थेचे अध्यक्ष एम. एस. गोडसे यांच्या हस्ते व सरपंच सदाशिव बागल, सोसायटीचे अध्यक्ष बाळासाहेब पोळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष भाऊसाहेब बागल, जावेद मनोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे मत्सबीज सोडण्यात आले.गोडसे म्हणाले, येरळवाडी प्रकल्पातून विस्थापित झालेल्या लोकांना प्रकल्पाच्या माध्यमातून उदर निर्वाहाचे साधन निर्माण व्हावे, त्यादृष्टीने प्रकल्पातील मच्छीमारीचा ठेका या लोकांना प्राधान्याने द्यावा, असा शासनाचाच आदेश आहे. संस्थेच्या कामकाजात श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर, राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचे सहसचिव तानाजीराव मांडवे यांचे चांगले सहकार्य लाभले. सद्य:स्थितीत तलावातील पाणीपातळी चांगली असल्याने संस्थेच्यावतीने तलावात दहा लाख मत्स्यबीज सोडण्यात आले आहेत. आगामी काळात त्यामध्ये निश्चितच चांगली वाढ होईल. त्यामुळे प्रकल्पातील विस्थापित भूमीहीन, शेतमजूर, धरणग्रस्त लोकांना रोजगार निर्मितीसाठी फायदा होईल. सरपंच बागल म्हणाले, ‘तलावात मत्स्यबीज सोडल्यामुळे धरणग्रस्त लोकांना रोजगाराची चांगली संधी उपलब्ध होण्यास मदत झाली आहे. संस्थेस सर्वतोपरी सहकार्य राहील.यावेळी दत्तात्रय पाटोळे, बळवंतराव पाटील, लखन जाधव, सयाजी जाधव, उमाजी जाधव, प्रकाश बागल, अजित दुबळे, सुरेश चव्हाण, आनंदा कमाने, रमेश जाधव, चंद्रकांत दुबळे, सुरज जाधव उपस्थित होते. मधुकर बागल यांनी स्वागत केले. सोमनाथ बागल यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)येरळवाडी, ता. खटाव येथील मध्यम प्रकल्पात वेदावती धरणग्रस्तांची सहकारी मच्छीमार संस्थेच्यावतीने मत्स्यबीज सोडताना एम. एस. गोडसे, सदाशिव बागल, भाऊसाहेब बागल, बाळासाहेब बागल आदी.