शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत त्रुटी

By admin | Updated: June 7, 2017 00:19 IST

जिल्हा परिषदेच्या नोकर भरतीत त्रुटी

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा परिषदेच्या नोकरभरतीमध्ये अनेक तांत्रिक त्रुटी आढळल्या असून, त्याबाबत खुलासा करण्याची सूचना अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष आमदार सुरेश खाडे यांनी पत्रकारांना दिली. समितीच्या स्वागतावरून मात्र काही काळ जिल्हा परिषदेत मानापमान नाट्यही घडल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेत अनुसूचित जाती कल्याण समितीचे अध्यक्ष खाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या समितीमध्ये आ. प्रा. जोगेंद्र कवाडे, आ. सुजित मिणचेकर, आ. प्रकाश गजभिये, आ. सुभाष साबणे यांची उपस्थिती होती. अध्यक्ष संग्रामसिंंह देशमुख आणि उपाध्यक्ष सुहास बाबर, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी समितीचे स्वागत केले. त्यानंतर अधिकाऱ्यांची बैठक असल्याने अध्यक्ष देशमुख व उपाध्यक्ष बाबर सभागृहातून बाहेर पडले. समितीचे सदस्य सोमवारी सायंकाळी सांगलीत दाखल झाले. समितीचे सदस्य आले असताना, कुणी अधिकारी नसल्याने सदस्य नाराज होते. बैठकीच्या प्रारंभीच समितीच्या सदस्यांनी कुणी अधिकारी फिरकले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आढावा बैठकीत नोकरभरती व अनुशेष भरण्यावरून अनेक तांत्रिक त्रुटी समितीच्या निदर्शनास आल्या. जिल्हा परिषदेतील अनुशेष भरला नसल्याच्या कारणावरुन समितीच्या सदस्यांनी खुलासा करण्याची सूचना केली. त्यानंतर खातेप्रमुखांनी शासनाकडून मार्गदर्शन मागविले असल्याचे कारण दिले, मात्र त्यासाठी मार्गदर्शन घेण्याची गरज काय आहे?, असा प्रतिप्रश्न समिती सदस्यांनी उपस्थित केला. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना योग्य उत्तर देता आले नाही. राज्यस्तरीय समिती दौऱ्यावर येणार असताना अधिकाऱ्यांनी होमवर्क केला नसल्याचे स्पष्ट झाले. अन्य खातेप्रमुखांनी समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे तत्कालीन प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना याबाबतचा जाब विचारण्यात आला. राज्यस्तरीय अनुसूचित जाती कल्याण समिती (एस. सी.) सांगलीमध्ये दाखल झाली असताना, जिल्हा परिषदेचा एकही अधिकारी स्वागताला आला नसल्याने समिती सदस्य नाराज झाले होते. त्याबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना सुनावलेही. पत्रकारांशी बोलताना सुरेश खाडे म्हणाले, समितीमार्फत मागासवर्गीय अनुशेष व्यवस्थित भरला आहे की नाही, शासन अनुदानाचा योग्य विनियोग याबाबत पाहणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या अनुशेष भरतीत अनेक चुका आढळल्या आहेत. त्यामुळे त्याबाबत खुलासा मागविण्यात आला आहे. त्याबाबतची दुरुस्ती होईल.