शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जिल्हा परिषद काँग्रेसच्या ताब्यात येणार

By admin | Updated: October 19, 2016 23:48 IST

मोहनराव कदम : निवडणुकीत स्थानिक आघाड्या, गट, कुरघोड्यांचे राजकारण चालणार नाही

सांगली : स्थानिक आघाड्या, युवा मंच, गट असे कोणतेही प्रकार जिल्हा परिषद निवडणुकीत खपवून घेतले जाणार नाहीत. पक्षाच्या चिन्हावरच निवडणुका लढविल्या जातील. काँग्रेसला चांगले वातावरण असून यंदाच्या निवडणुकीत जिल्हा परिषदेत काँग्रेसचीच सत्ता येईल, अशी माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले की, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची पक्षीय तयारी आता सुरू झाली आहे. २५ आॅक्टोबर ते ११ नोव्हेंबर या कालावधित इच्छुकांनी पक्षाकडे आपले सशुल्क अर्ज दाखल करायचे आहेत. यंदा जिल्हा परिषदेसाठी काँग्रेसला चांगले वातावरण आहे. तिरंगी, चौरंगी लढतीचे चित्र दिसत आहे. काँग्रेस ही निवडणूक स्वबळावर लढविणार असल्याने स्थानिक आघाड्या, विविध नेत्यांच्या नावचे मंच, गट असे प्रकार चालणार नाहीत. तसे आढळून आल्यास त्याबाबतची तक्रार प्रदेश कार्यकारिणीकडे तातडीने केली जाईल. पक्षाने आखून दिलेल्या शिस्तीने पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी तसेच इच्छुक उमेदवारांनी काम करावे. पाच नगरपालिका आणि चार नगरपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झाला असून त्यासंदर्भात संबंधित तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काही ठिकाणी आघाडीची, तर काही ठिकाणी स्वबळावर लढण्याची मागणी केली जात आहे. पक्षाने नियुक्त केलेले निरीक्षक संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यक्षेत्रात जाऊन परिस्थितीचा अभ्यास करून पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर ते आपला अहवाल जिल्हा कार्यकारिणीकडे सादर करतील. नगरपालिका आणि नगरपंचायतींसाठी आघाडी करायची, की स्वबळावर लढायचे, याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. लवकरच त्याबाबत निर्णय होईल. २१ आॅक्टोबरपर्यंत इच्छुकांना पक्षाकडे अर्ज सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानंतर २२ आॅक्टोबर रोजी जिल्हा कार्यकारिणीची बैठक होऊन त्यामध्ये हे अर्ज सादर होतील, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)माझ्यावर अन्याय नाही...पक्षात प्रदीर्घ काळ काम करताना मला कोणतेही मोठे पद मिळाले नाही, म्हणून मी नाराज नाही. कोणत्याही पदाची कधीही अपेक्षा ठेवलेली नाही. मोठ्या पदांपेक्षा मला पक्षीय कार्यात अधिक रस आहे.राष्ट्रवादी विरोध करणार नाहीसांगली-सातारा विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस कार्यकर्त्यांनी माझ्या उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. पक्षाने आदेश दिला, तर ही निवडणूक लढवून ती जिंकण्याचीही खात्री वाटते. राष्ट्रवादीने या जागेवर हक्क सांगितला असला तरी, माझ्या नावाला त्यांचा विरोध राहणार नाही, असे कदम म्हणाले.