शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
2
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
3
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
4
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
5
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
6
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
7
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
8
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
9
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
10
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
11
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
12
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
13
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
14
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
15
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
16
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
17
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
18
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
19
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बदलापूरमधील घटना
20
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

जिल्हा परिषद बंदचा डाव

By admin | Updated: July 18, 2014 23:58 IST

सदस्यांचा आरोप : अभियांत्रिकी योजना कृषी विभागाकडे वर्ग

सांगली : राज्य शासनाच्या ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य शासनाकडील कृषी विभागासह अन्य विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला होता. याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक योजना राज्य शासनाकडे वर्ग करण्याचा सपाटा लावून जिल्हा परिषद बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी कृषी समितीच्या बैठकीत केला. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील अभियांत्रिकी योजना राज्य शासनाच्या आत्मा विभागाकडे वर्ग केली आहे. यामुळे सदस्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अभियांत्रिकी योजना जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याचा ठरावही करण्यात आला. सभापती राजेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. कृषी समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील कृषी अभियांत्रिकी योजना राज्य शासनाकडे वर्ग केल्यावरून वादळी चर्चा झाली. जिल्हा परिषद बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव असून तो प्रकार उधळून लावला जाईल, असा इशाराही सदस्यांनी दिला. राज्य शासनाकडील योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याऐवजी येथीलच कृषी अभियांत्रिकी योजना वर्ग करून अन्याय केला जात आहे. राज्य शासनाकडील कृषी विभागाच्या योजनांचा जनतेपर्यंत लाभ मिळत नाही. कोणत्याही योजनेची जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही, असा आरोपही सदस्यांनी केला. डाळिंब शेतीकडे शेतकरी वळत असतानाही केंद्र आणि राज्य शासनाकडून तुटपुंजे अनुदान दिले जात आहे. १५०० हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी केली असताना शासनाकडून केवळ ५० हेक्टरसाठीच अनुदान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे डाळिंब बागांसाठी शासनाने वाढीव अनुदान देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आल्याचे राजेंद्र माळी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हवामानावर आधारित पीक विमा योजनेस शासनाने ३० जुलैपर्यंत वाढ देण्याच्या मागणीचा ठराव केला आहे. तसेच बायोगॅसच्या अनुदानात बाराशे रूपयांची वाढ केली आहे. सौरपथदिवे आणि सौर कंदिलासाठी शासनाकडून एक कोटींचा निधी आला आहे. या अनुदानातून सौरपथदिवे तीनशे आणि सौरकंदील एक हजार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)