शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

जिल्हा परिषद बंदचा डाव

By admin | Updated: July 18, 2014 23:58 IST

सदस्यांचा आरोप : अभियांत्रिकी योजना कृषी विभागाकडे वर्ग

सांगली : राज्य शासनाच्या ७३ व्या घटनादुरूस्तीनुसार राज्य शासनाकडील कृषी विभागासह अन्य विभाग जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचा निर्णय झाला होता. याकडे दुर्लक्ष करून प्रत्येक योजना राज्य शासनाकडे वर्ग करण्याचा सपाटा लावून जिल्हा परिषद बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी कृषी समितीच्या बैठकीत केला. जिल्हा परिषद कृषी विभागाकडील अभियांत्रिकी योजना राज्य शासनाच्या आत्मा विभागाकडे वर्ग केली आहे. यामुळे सदस्यांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून अभियांत्रिकी योजना जिल्हा परिषदेकडेच ठेवण्याचा ठरावही करण्यात आला. सभापती राजेंद्र माळी यांच्या अध्यक्षतेखाली जि. प. कृषी समितीची बैठक झाली. या बैठकीत जिल्हा परिषद कृषी विभागाकडील कृषी अभियांत्रिकी योजना राज्य शासनाकडे वर्ग केल्यावरून वादळी चर्चा झाली. जिल्हा परिषद बंद करण्याचा राज्य सरकारचा डाव असून तो प्रकार उधळून लावला जाईल, असा इशाराही सदस्यांनी दिला. राज्य शासनाकडील योजना जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याऐवजी येथीलच कृषी अभियांत्रिकी योजना वर्ग करून अन्याय केला जात आहे. राज्य शासनाकडील कृषी विभागाच्या योजनांचा जनतेपर्यंत लाभ मिळत नाही. कोणत्याही योजनेची जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्यांना माहिती अधिकाऱ्यांकडून दिली जात नाही, असा आरोपही सदस्यांनी केला. डाळिंब शेतीकडे शेतकरी वळत असतानाही केंद्र आणि राज्य शासनाकडून तुटपुंजे अनुदान दिले जात आहे. १५०० हेक्टरसाठी शेतकऱ्यांनी अनुदानाची मागणी केली असताना शासनाकडून केवळ ५० हेक्टरसाठीच अनुदान दिले आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे डाळिंब बागांसाठी शासनाने वाढीव अनुदान देण्याच्या मागणीचा ठराव करण्यात आल्याचे राजेंद्र माळी यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, हवामानावर आधारित पीक विमा योजनेस शासनाने ३० जुलैपर्यंत वाढ देण्याच्या मागणीचा ठराव केला आहे. तसेच बायोगॅसच्या अनुदानात बाराशे रूपयांची वाढ केली आहे. सौरपथदिवे आणि सौर कंदिलासाठी शासनाकडून एक कोटींचा निधी आला आहे. या अनुदानातून सौरपथदिवे तीनशे आणि सौरकंदील एक हजार घेण्याचा निर्णय घेण्यात आला. (प्रतिनिधी)