शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जिल्हा परिषद पदाधिकारी बदलासाठी आता पुन्हा रविवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:25 IST

मिरज -जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा भाजप नेत्यांचा घोळ अद्याप संपलेला नाही. निर्णयासाठी पुढील रविवारी (दि. १४) पुन्हा बैठक घेण्याचा ...

मिरज -जिल्हा परिषद पदाधिकारी बदलाचा भाजप नेत्यांचा घोळ अद्याप संपलेला नाही. निर्णयासाठी पुढील रविवारी (दि. १४) पुन्हा बैठक घेण्याचा निर्णय रविवारी झाला. खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत येथील शासकीय विश्रामगृहात बैठक झाली.

महापालिकेत बहुमत असतानाही सत्ता गमवाव्या लागलेल्या भाजप नेत्यांनी आता ताकही फुंकून पिण्याचा निर्णय घेतल्याचे यामुळे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेत काठावरचे बहुमत असल्याने पदाधिकारी बदलात धोका असल्याची शंका बैठकीत व्यक्त झाली. जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी पदाधिकारी बदलाबाबत चार दिवसांत निर्णय घेणार असल्याचे बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.

जिल्हा परिषदेची मुदत नऊ महिने शिल्लक असून या काळासाठी पदाधिकारी बदल केला जावा, असा सदस्यांचा आग्रह आहे. त्यासाठीच्या बैठकीला सत्यजित देशमुख, रणधीर नाईक, सम्राट महाडिक, नीता केळकर, मकरंद देशपांडे, राजेंद्र देशमुख आदी उपस्थित होते. अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्यासह आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर यांच्यासह अजितराव घोरपडे उपस्थित नव्हते. खाडे व गाडगीळ यांच्याशी बैठकीतून फोनद्वारे संपर्क साधण्यात आला. बदलासाठी आपण सहमत असून निर्णयाची जबाबदारी खासदार पाटील यांच्याकडे आमदारांनी सोपविली.

जिल्हा परिषदेत भाजपच्या २३ सदस्यांना आ. बाबर, अजितराव घोरपडे व महाडिक समर्थक ९ जणांचा पाठिंबा आहे. भाजपचे काठावरचे बहुमत असून बदलत्या परिस्थितीत आमदार अनिल बाबर व अजितराव घोरपडे यांचा पाठिंबा कायम राहील याची खात्री नसल्याने जिल्हा परिषद पदाधिकारी बदलताना पक्षाला फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे इच्छुकांचा आग्रह असला तरी पदाधिकारी बदलासाठी सावधानतेने पावले टाकावी लागतील, अशीही चर्चा बैठकीत झाली. पदाधिकारी बदलाबाबत जिल्ह्यातील आमदार व सर्व नेतेमंडळींसोबत चर्चा करून चार दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पृथ्वीराज पाटील यांनी सांगितले.

चौकट

आता रविवारी पुन्हा बैठक

बदलासंदर्भात रविवारी (दि. १४) नेतेमंडळी पुन्हा बैठक घेणार आहेत. बदलासंदर्भात आजच निर्णय जाहीर करण्यासाठी सदस्यांचा खासदार पाटील यांच्याकडे आग्रह होता, पण खाडे, गाडगीळ, दीपक शिंदे-म्हैसाळकर अनुपस्थित असल्याने पुढील रविवारचा मुहूर्त निश्चित करण्यात आला.