शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील सत्तेत स्वारस्य नाही

By admin | Updated: February 27, 2017 00:08 IST

जयंत पाटील; काँग्रेसला उशिरा शहाणपण सुचले; काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीलाच टार्गेट

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रस्ताव होता; पण काही ठिकाणी आघाडी झाली, तर काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच एक नंबरचा शत्रू मानत होते. आता दोन्ही पक्षांच्या आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. राष्ट्रवादीतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनासाठी जयंत पाटील सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाबद्दल ते म्हणाले की, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी इच्छुक नाही. जनतेने आम्हाला विरोधात बसविले आहे. जिल्'ात जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही ताकदीने लढलो. त्यात आम्हाला यश आले नाही. निवडणुकीनंतर संख्याबळाची जमवाजमव करून जनमताचा अनादर करण्याची आमची इच्छा नाही. काँग्रेस नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जिल्हा परिषद सत्तेसाठी राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत ते म्हणाले की, ज्यांना सत्तेसाठी हालचाली करायच्या आहेत, त्यांनी खुशाल कराव्यात. मतांची गोळाबेरीज आम्हाला करायची नाही. पण काँग्रेसला प्रयत्न करायचे असल्यास त्यांनी ते करावेत. जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला आहे. त्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांनी आघाडी करावी, अशी भूमिका आमची होती. त्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्नही केले. पण जिल्हास्तरावरील नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच शत्रू मानत होते. आता निकालानंतर काँग्रेसला शहाणपण आले आहे. पण जोपर्यंत काँग्रेस हा भाजपला शत्रू मानत नाही, तोपर्यंत दोन्ही पक्षांच्या आघाडीला काहीच अर्थ नाही. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करणार का? याबद्दल विचारता ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. योग्य वेळ आल्यानंतर पाहू, असे पाटील म्हणाले. बंडखोरांना थारा नाही वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केलेल्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. त्यावरील कारवाईची प्रक्रिया पार पडली आहे. त्याबरोबरच बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांना आम्ही सोबत घेणार नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.