शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

जिल्हा परिषदेतील सत्तेत स्वारस्य नाही

By admin | Updated: February 27, 2017 00:08 IST

जयंत पाटील; काँग्रेसला उशिरा शहाणपण सुचले; काँग्रेस नेत्यांकडून राष्ट्रवादीलाच टार्गेट

सांगली : जिल्हा परिषद निवडणुकीवेळी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचा प्रस्ताव होता; पण काही ठिकाणी आघाडी झाली, तर काही जिल्ह्यांमध्ये काँग्रेसचे स्थानिक नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच एक नंबरचा शत्रू मानत होते. आता दोन्ही पक्षांच्या आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर घेण्यात आला आहे. निवडणुकीनंतर काँग्रेसला उशिरा सुचलेले हे शहाणपण आहे, असा टोला राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकारांशी बोलताना लगावला. राष्ट्रवादीतर्फे आयोजित महाआरोग्य शिबिराच्या उद््घाटनासाठी जयंत पाटील सांगलीत आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. जिल्हा परिषद निवडणुकीतील पराभवाबद्दल ते म्हणाले की, जनतेने दिलेला कौल आम्हाला मान्य आहे. राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेसाठी इच्छुक नाही. जनतेने आम्हाला विरोधात बसविले आहे. जिल्'ात जातीयवादी भाजपला रोखण्यासाठी आम्ही ताकदीने लढलो. त्यात आम्हाला यश आले नाही. निवडणुकीनंतर संख्याबळाची जमवाजमव करून जनमताचा अनादर करण्याची आमची इच्छा नाही. काँग्रेस नेते आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी जिल्हा परिषद सत्तेसाठी राष्ट्रवादीला मदत करण्याची भूमिका घेतली आहे. त्याबाबत ते म्हणाले की, ज्यांना सत्तेसाठी हालचाली करायच्या आहेत, त्यांनी खुशाल कराव्यात. मतांची गोळाबेरीज आम्हाला करायची नाही. पण काँग्रेसला प्रयत्न करायचे असल्यास त्यांनी ते करावेत. जिल्हा परिषदेतील सत्तेसाठी राज्यस्तरावर काँग्रेस व राष्ट्रवादीच्या आघाडीचा निर्णय झाला आहे. त्यावर भाष्य करताना जयंत पाटील यांनी काँग्रेसवरच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, निवडणुकीपूर्वीच दोन्ही पक्षांनी आघाडी करावी, अशी भूमिका आमची होती. त्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्नही केले. पण जिल्हास्तरावरील नेते भाजपपेक्षा राष्ट्रवादीलाच शत्रू मानत होते. आता निकालानंतर काँग्रेसला शहाणपण आले आहे. पण जोपर्यंत काँग्रेस हा भाजपला शत्रू मानत नाही, तोपर्यंत दोन्ही पक्षांच्या आघाडीला काहीच अर्थ नाही. आगामी महापालिका निवडणुकीत काँग्रेसशी आघाडी करणार का? याबद्दल विचारता ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुकीबाबत अद्याप कोणताही विचार केलेला नाही. योग्य वेळ आल्यानंतर पाहू, असे पाटील म्हणाले. बंडखोरांना थारा नाही वाळवा तालुक्यात राष्ट्रवादी पक्षाच्या विरोधात काम केलेल्यांचे राजीनामे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे यांच्याकडे सोपविण्यात आले आहेत. त्यावरील कारवाईची प्रक्रिया पार पडली आहे. त्याबरोबरच बंडखोर उमेदवार संभाजी कचरे यांना आम्ही सोबत घेणार नसल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.