शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
3
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
4
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
5
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
6
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
7
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
8
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
9
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
10
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
11
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
12
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
13
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
14
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
15
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
16
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
17
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
18
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
19
कांजूर डम्पिंगच्या दुर्गंधीवर तोडगा काढा; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश; स्वच्छ हवेत श्वास घेणे काळाची गरज : महत्त्वपूर्ण निरीक्षण
20
बापरे, पश्चिम रेल्वेवर एकदाचाच ३० दिवसांचा मेगाब्लॉक! १०० लोकल रद्द झाल्याने हाल 
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेला मिळाला ३९ कोटींचा विकास निधी

By admin | Updated: March 27, 2015 23:57 IST

मार्च एन्डची लगबग : कलाकार मानधनासाठी ६८ लाख

सांगली : जिल्ह्यातील विकास कामे करण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मार्च एन्डला ३९ कोटी ७२ लाखांचा निधी मिळाला आहे. तसेच सरपंचांचे मानधन आणि सदस्यांचे थकित भत्ते देण्यासाठी पाच कोटी ६६ लाखांचा निधी मिळाल्यामुळे ग्रामपंचायतीमध्ये फिलगुडचे वातावरण आहे. कलाकारही चार महिन्यांपासून मानधनाच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्या मानधनासाठी नाही, पण त्यांच्या वाढीव मानधनासाठी ६८ लाख रूपये मिळाले आहेत. शासनाकडून आलेला निधी खर्च करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाची लगबग सुरु झाली आहे.जिल्हा परिषदेत मार्च एन्डला शासनाकडील थकित कराचा निधी येत असतो. त्यादृष्टीने तो निधी खर्च करण्यासाठी वित्त विभागातील अधिकारी, कर्मचारी काम करीत असतात. दरवर्षीप्रमाणेही शासनाकडून मार्च एन्डला जिल्हा परिषदेला आठवड्यापूर्वी १८ कोटी ७२ लाखांचा निधी मिळाला होता. हा निधी खर्च झाला आहे. उर्वरित कामांसाठी शासनाकडून निधी मिळेल, या अपेक्षेत अधिकारी होते. तोपर्यंत आता २१ कोटींचा निधी मिळाला असून दोन दिवसात बिल मंजूर करून खर्च करण्यात येईल, असे मुख्य वित्त अधिकारी शुभांगी पाटोळे यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, कलाकारांच्या वाढीव मानधनातील फरकाची रक्कम शासनाकडून ६७ लाख ४३ हजार रूपये मिळाली आहे. आमदार फंडासाठी पहिल्या टप्प्यात १८ लाख ८ हजाराचा निधी मिळाला होता. हा निधी खर्च झाला असून आता एक कोटी ५२ लाखाचा निधी मिळाला आहे. येत्या दोन दिवसात हा निधीही खर्च होणार आहे. सरपंच मानधन व सदस्यांच्या भत्त्यासाठी पाच कोटी ६६ लाख, दलित वस्तीमध्ये रस्ते, गटारी आदी विविध कामे करण्यासाठी दोन कोटी ३५ लाख मिळाले आहेत. शिष्यवृत्तीसाठी ४० लाख, तर तीर्थक्षेत्र विकासासाठी ७० लाख, जनसुविधांच्या कामासाठी एक कोटींचा निधी मिळाला आहे. शालेय पोषण आहारासाठी दोन कोटी ८१ लाख, पशुसंवर्धन विभागासाठी २८ लाख, विविध करांच्या थकित रकमेसाठी नऊ कोटींचा निधी मिळाला आहे. शासनाकडून आलेला सर्व निधी ३१ मार्चपर्यंत खर्च होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. (प्रतिनिधी)वसतिगृहांसाठी एक कोटीजिल्हा परिषदेकडून चालविण्यात येत असलेल्या वसतिगृहांसाठी शासनाकडून एक कोटीचा निधी मिळाला आहे. परंतु, या निधीपैकी ८० लाख रूपये हे कर्मचाऱ्यांच्या थकित वेतनावरच खर्च होणार आहेत. उर्वरित वीस लाख रूपयांमधून विद्यार्थ्यांच्या भोजनासाठीचे अनुदान कसे वितरित करायचे?, असा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे.