शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
4
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
5
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
6
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
7
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
8
गणेश मंडळे दंड भरणार नाही, खड्यावर सरकारलाच दंड लावा
9
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
10
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
11
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
12
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
13
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
14
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
15
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
16
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
17
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
18
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
19
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
20
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं

तरुणांनी ग्राम-कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा : पोपटराव पवार यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:30 IST

कॉलेज जीवन हे सर्वात आनंददायी असते. स्वातंत्र्यलढ्यातही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरूणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या

ठळक मुद्दे विलिंग्डन महाविद्यालयात शताब्दी व्याख्यानमाला

सांगली : कॉलेज जीवन हे सर्वात आनंददायी असते. स्वातंत्र्यलढ्यातही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरूणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. तरूणाई सैराट झाल्याने सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. त्यामुळेच आता तरूणांनी बदलत ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा, असे आवाहन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी सोमवारी सांगलीत केले.

विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी व्याख्यानमालेत ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते.पवार पुढे म्हणाले की, वाढते शहरीकरण व अधिक उत्पादनाच्या नावाखाली शेतीवर होत असलेले अघोरी उपाय पाहता, आजारांचे प्रमाण वाढत आहे. जमिनी खराब करून टाकल्या आहेत. यासाठी आता तरूणांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक थेंबाचे नियोजन केले, तर दुष्काळाशीही दोनहात करता येऊ शकतात. आजच्या तरूणांच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचे मोठे जाळे आले आहे. याचा चुकीचा परिणामही दिसून येत आहे.

मैदाने ओस पडली असून मुलांच्या हातात फेसबुक आणि व्हॉटस् अप दिसत आहे. त्यामुळेच सुटीच्या काळातील मामाचा गाव, शेतामधील भटकंती बंद झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कोचिंग क्लासचे फॅड वाढले आहे. सिनिअर कॉलेजमध्ये बसायला विद्यार्थी नाहीत आणि कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, असे चित्र आहे. तरूण मुलेही मानसिक तणावात अडकली आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास, ज्या घरातील मुले निरोगी, ते घर समाजातील सर्वात श्रीमंत घर ठरणार आहे. सैराट होणे म्हणजे एखाद्या विषयावर जिवापाड प्रेम करणे होय. पण आजचे तरूण वेगळ्याच कारणासाठी सैराट होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.यावेळी प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, डॉ. बिराज खोलकुंबे, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना पाण्याचा ताळेबंद शिकवापवार म्हणाले की, पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वांनी राबविला पाहिजे. पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारने हा ताळेबंद मांडल्याने डरडोई उत्पन्नात वाढ झाली. आता विलिंग्डन महाविद्यालयानेही शताब्दीनिमित्त नवीन उपक्रम राबविताना पाण्याच्या ताळेबंदाचा विषय सुरू करावा. पर्यावरण विषयावरही भर दिल्यास विद्यार्थ्यांनाही वास्तवाची जाणीव होण्यास चांगली मदत होणार आहे.