शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांनी ग्राम-कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा : पोपटराव पवार यांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2018 00:30 IST

कॉलेज जीवन हे सर्वात आनंददायी असते. स्वातंत्र्यलढ्यातही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरूणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या

ठळक मुद्दे विलिंग्डन महाविद्यालयात शताब्दी व्याख्यानमाला

सांगली : कॉलेज जीवन हे सर्वात आनंददायी असते. स्वातंत्र्यलढ्यातही तरूणांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याने स्वातंत्र्य मिळाले होते. आजची तरूणाई मात्र, अभ्यास, वाचनालयांऐवजी डीजेच्या तालावर रमत आहे. तरूणाई सैराट झाल्याने सोशल मीडियाला अधिक वेळ देत आहे. त्यामुळेच आता तरूणांनी बदलत ग्रामविकास व कृषी विकासाचा झेंडा हाती घ्यावा, असे आवाहन हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी सोमवारी सांगलीत केले.

विलिंग्डन महाविद्यालय शताब्दी व्याख्यानमालेत ‘लोकसहभागातून ग्रामविकास’ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मध्यवर्ती बॅँकेचे अध्यक्ष दिलीपतात्या पाटील होते.पवार पुढे म्हणाले की, वाढते शहरीकरण व अधिक उत्पादनाच्या नावाखाली शेतीवर होत असलेले अघोरी उपाय पाहता, आजारांचे प्रमाण वाढत आहे. जमिनी खराब करून टाकल्या आहेत. यासाठी आता तरूणांनीच पुढाकार घेणे आवश्यक आहे. गावातील प्रत्येक थेंबाचे नियोजन केले, तर दुष्काळाशीही दोनहात करता येऊ शकतात. आजच्या तरूणांच्या हातात माहिती तंत्रज्ञानाचे मोठे जाळे आले आहे. याचा चुकीचा परिणामही दिसून येत आहे.

मैदाने ओस पडली असून मुलांच्या हातात फेसबुक आणि व्हॉटस् अप दिसत आहे. त्यामुळेच सुटीच्या काळातील मामाचा गाव, शेतामधील भटकंती बंद झाली आहे. शैक्षणिक क्षेत्रातील वाढत्या स्पर्धेमुळे कोचिंग क्लासचे फॅड वाढले आहे. सिनिअर कॉलेजमध्ये बसायला विद्यार्थी नाहीत आणि कोचिंग क्लासमध्ये विद्यार्थ्यांना बसायला जागा नाही, असे चित्र आहे. तरूण मुलेही मानसिक तणावात अडकली आहेत. हीच परिस्थिती कायम राहिल्यास, ज्या घरातील मुले निरोगी, ते घर समाजातील सर्वात श्रीमंत घर ठरणार आहे. सैराट होणे म्हणजे एखाद्या विषयावर जिवापाड प्रेम करणे होय. पण आजचे तरूण वेगळ्याच कारणासाठी सैराट होत असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली.यावेळी प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हनकर, डॉ. बिराज खोलकुंबे, राजकुमार पाटील आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना पाण्याचा ताळेबंद शिकवापवार म्हणाले की, पावसाचे पाणी अडविण्याचा आणि ते जिरविण्याचा उपक्रम सर्वांनी राबविला पाहिजे. पाण्याचा ताळेबंद कुणीही मांडत नाही. हिवरे बाजारने हा ताळेबंद मांडल्याने डरडोई उत्पन्नात वाढ झाली. आता विलिंग्डन महाविद्यालयानेही शताब्दीनिमित्त नवीन उपक्रम राबविताना पाण्याच्या ताळेबंदाचा विषय सुरू करावा. पर्यावरण विषयावरही भर दिल्यास विद्यार्थ्यांनाही वास्तवाची जाणीव होण्यास चांगली मदत होणार आहे.