शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तरुणांनी आपली संस्कृती जपावी

By admin | Updated: November 27, 2015 00:07 IST

सिंधुताई सपकाळ : ‘आदर्श’ मातांचा कवठेपिरानमध्ये गौरव

दुधगाव : तरुणांनी आपल्या संस्कृतीचे जतन करावे, असे आवाहन ज्येष्ठ समाजसेविका सिंधुताई सपकाळ यांनी केले. कवठेपिरान (ता. मिरज) येथे बुधवारी सायंकाळी सपकाळ यांच्याहस्ते ‘आदर्श’ मातांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी माजी मंत्री आ. जयंत पाटील होते. कवठेपिरान येथे जयंत पाटील युथ फौंडेशनच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सपकाळ पुढे म्हणाल्या, आजच्या धावत्या युगात संगणकामुळे जनजीवन धावपळीचे होत चालले आहे. दिवसेंदिवस धावत्या युगात संस्कृतीचा ऱ्हास होत चालला आहे. तरुण आणि तरुणींनी आपली संस्कृती जपण्याची गरज आहे. आजच्या युगामध्ये सपकाळ यांनी आपल्या जीवनचरित्राचा इतिहासही तरुणांच्या डोळ्यासमोर ठेवला. त्यांनी ‘आई’ या विषयावरही व्याख्यान दिले. तसेच या परिस्थितीत परंपरा व संस्कृतीकडे दुर्लक्ष होऊ लागले आहे. त्या जपण्यासाठी मातांनीही लक्ष दिले पाहिजे, असे आवाहनही सिंधुतार्इंनी केले. यावेळी सिंंधुतार्इंनी आपला जीवनपटही उलगडला. कार्यक्रमाचे दीपप्रज्ज्वलन अध्यक्ष आ. जयंत पाटील यांच्याहस्ते झाले. यावेळी जयंत पाटील यांनी आपल्या भाषणात १९८५ मधील सिंधुताई सपकाळ यांच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला व जयंत फौंडेशनला मदत करण्याची ग्वाहीही दिली. तसेच प्रा. संग्राम जाखलेकर व अवधूत पाटील यांनी गावाच्या विकासासाठी जयंत फौंडेशन सतत कार्यरत राहील, अशी ग्वाही दिली.प्रास्ताविक दत्ता पाटील यांनी केले. यावेळी वाळवा तालुका राष्ट्रवादी युवक कॉँग्रेसचे अध्यक्ष संजय पाटील (बापू), उद्योजक भालचंद्र पाटील, पंचायत समितीचे सदस्य प्रमोद आवटी, अरुण साळुंखे, सचिन पाटील, रघु दिडे, एम. डी. खंबाळे, बाबूराव कालेकर, गजानन पाटील, प्रताप गुरव यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी आदी उपस्थित होते. (वार्ताहर)यांचा झाला गौरव या कार्यक्रमात श्रीमती मंगल पाटील, सौ. प्रमिला जैनापुरे, श्रीमती कल्पना जाधव, श्रीमती वत्सला माणगावे, सौ. आफसाना मुजावर, श्रीमंती आनंदीबाई दिंडे आदी आदर्श मातांचा यावेळी गौरव करण्यात आला.