शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

रेठरे धरण येथील तरुणांची ट्रक व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तरुणांनी नोकरी व शेतीच्या पाठीमागे न लागता आपलं कुटुंब चालविण्यासाठी ट्रक ...

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तरुणांनी नोकरी व शेतीच्या पाठीमागे न लागता आपलं कुटुंब चालविण्यासाठी ट्रक व्यवसाय निवडला आहे. आजमितीला रेठरे धरण येथे सुमारे पावणे दोनशेहून अधिक ट्रक देशातील रस्त्यांवर धावत आहेत.

रेठरे धरण हे वाळवा तालुक्यातील, हद्दीवरील शेवटचे गाव. इथे साधारणपणे सहा हजार एकरवर पूर्व, पश्चिम व दक्षिण बाजूस पूर्ण डोंगराबरोबर शेती आहे. परंतु आजतागायत इथे इरिगेशन योजना नसल्यामुळे इथले तरुण शेती, दुग्धव्यवसाय व सहकारी संस्था, दूध संस्था, सूतगिरणी, साखर कारखाना येथे नोकरी करून उदरनिर्वाह करत होते.

गावात सुमारे १९६० च्या दशकात येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य आर. एस. पाटील व सध्याचे राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे वडील पैलवान दत्तू ज्ञानू पाटील यांनी दोन ते तीन ट्रक घेऊन त्या काळात ट्रक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. श्रीरंग पाटील, राजाबापू पाटील, कृष्णात पाटील, जगन्नाथ घाटके, हिरकन पाटील, पोपटराव पाटील, पांडुरंग पाटील, बबन पाटील यांनी देखील ट्रक खरेदी करून या व्यवसायास सुरुवात केली.

. शिक्षण अपुरे, शेती आहे, पण त्यात फक्त कुसळे उगवत होती. नोकरी मिळण्याची तर शक्यताच नाही. त्यामुळे एकमेकांच्या संगतीने शिक्षित व अशिक्षित तरुणांनी पटापट ट्रक व्यवसायात उड्या घेतल्या. एक नाही, दोन नाही, तर ३० लाख रुपये किमतीच्या आवाक्याबाहेच्या गाड्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेतून व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन खरेदी केल्या. आपली पत सांभाळत दर महिन्याला ६० हजार ते ८० हजार रुपयांचे हप्ते देखील नियमित भरून बँकांचा विश्वास संपादन केला.

कोट

ट्रक व्यवसायात ट्रकचे दर वाढले, डिझेल दर वाढले, टोल दर वाढले, परंतु त्या प्रमाणात ट्रकभाडे वाढले नसून अत्यंत जिकिरी करून हा व्यवसाय टिकवावा लागत आहे. कोल्हापूर व सांगली शहरातून गूळ व साखर बाहेरील राज्यांत ट्रकमधून नेण्यात येते. यामधून व्यवसायाला हातभार लागतो.

- संताजी मदने, ट्रक व्यावसायिक, रेठरे धरण