शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

रेठरे धरण येथील तरुणांची ट्रक व्यवसायात भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:22 IST

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तरुणांनी नोकरी व शेतीच्या पाठीमागे न लागता आपलं कुटुंब चालविण्यासाठी ट्रक ...

रेठरे धरण : रेठरे धरण (ता. वाळवा) येथील तरुणांनी नोकरी व शेतीच्या पाठीमागे न लागता आपलं कुटुंब चालविण्यासाठी ट्रक व्यवसाय निवडला आहे. आजमितीला रेठरे धरण येथे सुमारे पावणे दोनशेहून अधिक ट्रक देशातील रस्त्यांवर धावत आहेत.

रेठरे धरण हे वाळवा तालुक्यातील, हद्दीवरील शेवटचे गाव. इथे साधारणपणे सहा हजार एकरवर पूर्व, पश्चिम व दक्षिण बाजूस पूर्ण डोंगराबरोबर शेती आहे. परंतु आजतागायत इथे इरिगेशन योजना नसल्यामुळे इथले तरुण शेती, दुग्धव्यवसाय व सहकारी संस्था, दूध संस्था, सूतगिरणी, साखर कारखाना येथे नोकरी करून उदरनिर्वाह करत होते.

गावात सुमारे १९६० च्या दशकात येथील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य आर. एस. पाटील व सध्याचे राजारामबापू साखर कारखान्याचे संचालक आनंदराव पाटील यांचे वडील पैलवान दत्तू ज्ञानू पाटील यांनी दोन ते तीन ट्रक घेऊन त्या काळात ट्रक व्यवसायाची मुहूर्तमेढ रोवली. श्रीरंग पाटील, राजाबापू पाटील, कृष्णात पाटील, जगन्नाथ घाटके, हिरकन पाटील, पोपटराव पाटील, पांडुरंग पाटील, बबन पाटील यांनी देखील ट्रक खरेदी करून या व्यवसायास सुरुवात केली.

. शिक्षण अपुरे, शेती आहे, पण त्यात फक्त कुसळे उगवत होती. नोकरी मिळण्याची तर शक्यताच नाही. त्यामुळे एकमेकांच्या संगतीने शिक्षित व अशिक्षित तरुणांनी पटापट ट्रक व्यवसायात उड्या घेतल्या. एक नाही, दोन नाही, तर ३० लाख रुपये किमतीच्या आवाक्याबाहेच्या गाड्या राष्ट्रीयीकृत, सहकारी बँकेतून व फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन खरेदी केल्या. आपली पत सांभाळत दर महिन्याला ६० हजार ते ८० हजार रुपयांचे हप्ते देखील नियमित भरून बँकांचा विश्वास संपादन केला.

कोट

ट्रक व्यवसायात ट्रकचे दर वाढले, डिझेल दर वाढले, टोल दर वाढले, परंतु त्या प्रमाणात ट्रकभाडे वाढले नसून अत्यंत जिकिरी करून हा व्यवसाय टिकवावा लागत आहे. कोल्हापूर व सांगली शहरातून गूळ व साखर बाहेरील राज्यांत ट्रकमधून नेण्यात येते. यामधून व्यवसायाला हातभार लागतो.

- संताजी मदने, ट्रक व्यावसायिक, रेठरे धरण