शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तरुणांनी उठविला आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:30 IST

सांगली : अतिवृष्टीमुळे डाळिंब बागांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळाली नाही. भाजीपाल्याला दर नसल्यामुळे तो शेतात सडत आहे. अन्य ...

सांगली : अतिवृष्टीमुळे डाळिंब बागांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळाली नाही. भाजीपाल्याला दर नसल्यामुळे तो शेतात सडत आहे. अन्य पिकांप्रमाणे भाजीपाल्यासही हमीभाव मिळाला पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांनीच आवाज उठविला आहे. मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत उपोषण सुुरू केले आहे.

ऋषिकेशन साळुंखे, विजय कोरे, रवींद्र म्हमाणे, नंदकुमार कोळी, बापू कोळी, सचिन कांबळे, बळवंत लोखंडे, आनंदराव पांढरे, चंद्रकांत बंडगर, श्रीकांत माळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे. आंदोलकांनी अतिवृष्टीमुळे आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तरीही विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्याची भरपाई देत नाहीत. शासन त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन घेतले आहे, पण त्यास दर नसल्यामुळे शेतात भाजीपाला सडत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई दिली पाहिजे, तसेच गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही भरपाईही शासनाकडून अद्याप मिळाली नाही. शेतकरी रात्रंदिवस राबत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी कोणत्याही संघटनेची मदत न घेता, अमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्याचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या तरुण शेतकऱ्यांच्या आंदोलनास सांगलीतील अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चौकट

दुधात भेसळ करून शेतकऱ्यांना बदनाम नको : ऋषिकेश साळुंखे

शेतकरी प्रामाणिक स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे दूध डेअरीमध्ये घालत आहेत. डेअरी चालक स्वत: भेसळ करून दूध संघांना घालत आहे. या भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दुधातील भेसळ थांबविली पाहिजे, पण अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई होत नसल्यामुळे भेसळीचे प्रकार चालूच आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची होणारी बदनामी थांबवावी, अशी मागणीही ऋषिकेश साळुंखे यांनी केली आहे.