शहरं
Join us  
Trending Stories
1
मध्यरात्री भारत-पाकिस्तानात खणखणला फोन; तणाव कमी करण्यासाठी कुणी घेतला पुढाकार?
2
शत्रू भारताचं काही वाकडे करू शकणार नाहीत, परंतु...; प्रसिद्ध भेंडवळची भविष्यवाणी
3
१५ बँका बंद ते एटीएम, रेल्वे तिकीट बुकिंगपासून बँकिंग आणि गॅस सिलिंडरपर्यंत, आजपासून बदलले अनेक नियम
4
'सीमा हैदरला पाकिस्तानात पाठवू नका, ती इथे...'; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाच्या सदस्याचे विधान
5
नियोजित वेळेपूर्वीच अजितदादा आले, उद्घाटनही केले; भाजपा खासदार नाराज झाले, नेमके काय घडले?
6
देशात होणार जातनिहाय जनगणना; केंद्रीय मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीत ऐतिहासिक निर्णय
7
पहलगाम हल्ल्यानंतर अचानक गायब झाली पाकिस्तानी महिला; UP मध्ये केली ९ वर्ष सरकारी नोकरी
8
"तुम्हाला माहितीये आमचे सैन्य काय करू शकते, आता परिणाम भोगायला तयार रहा"; अमेरिकेचा इराणला इशारा
9
“‘सुसंस्कृत राज्य’ म्हणून महाराष्ट्राची ओळख अबाधित ठेवण्याचा दृढनिश्चय करूया”: अजित पवार
10
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
11
LPG Price 1 May 2025: एलपीजी सिलिंडर झाला स्वस्त, पाहा दिल्ली ते चेन्नईपर्यंतचे नवे दर
12
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
13
यावेळी तीन तुकडेच करा! पाकिस्तानचे शेपूटच मुरगाळले पाहिजे, तेदेखील असे की...
14
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
15
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
16
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
17
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
18
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
19
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
20
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तरुणांनी उठविला आवाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2021 04:30 IST

सांगली : अतिवृष्टीमुळे डाळिंब बागांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळाली नाही. भाजीपाल्याला दर नसल्यामुळे तो शेतात सडत आहे. अन्य ...

सांगली : अतिवृष्टीमुळे डाळिंब बागांचे नुकसान होऊनही त्यांना भरपाई मिळाली नाही. भाजीपाल्याला दर नसल्यामुळे तो शेतात सडत आहे. अन्य पिकांप्रमाणे भाजीपाल्यासही हमीभाव मिळाला पाहिजे, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या पोरांनीच आवाज उठविला आहे. मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयात बेमुदत उपोषण सुुरू केले आहे.

ऋषिकेशन साळुंखे, विजय कोरे, रवींद्र म्हमाणे, नंदकुमार कोळी, बापू कोळी, सचिन कांबळे, बळवंत लोखंडे, आनंदराव पांढरे, चंद्रकांत बंडगर, श्रीकांत माळी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन चालू आहे. आंदोलकांनी अतिवृष्टीमुळे आटपाडी तालुक्यातील डाळिंब पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, तरीही विमा कंपन्या शेतकऱ्यांना त्याची भरपाई देत नाहीत. शासन त्यांच्यावर कोणतीच कारवाई करत नाही. लाखो रुपये खर्च करून शेतकऱ्यांनी भाजीपाला उत्पादन घेतले आहे, पण त्यास दर नसल्यामुळे शेतात भाजीपाला सडत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने भरपाई दिली पाहिजे, तसेच गेल्या वर्षी झालेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. ही भरपाईही शासनाकडून अद्याप मिळाली नाही. शेतकरी रात्रंदिवस राबत असूनही त्यांना न्याय मिळत नाही. या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी तरुण शेतकऱ्यांनी कोणत्याही संघटनेची मदत न घेता, अमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्याचे निवेदनही त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. या तरुण शेतकऱ्यांच्या आंदोलनास सांगलीतील अनेक सामाजिक संघटनांनी पाठिंबा दिला आहे.

चौकट

दुधात भेसळ करून शेतकऱ्यांना बदनाम नको : ऋषिकेश साळुंखे

शेतकरी प्रामाणिक स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे दूध डेअरीमध्ये घालत आहेत. डेअरी चालक स्वत: भेसळ करून दूध संघांना घालत आहे. या भेसळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करून दुधातील भेसळ थांबविली पाहिजे, पण अधिकाऱ्यांकडून योग्य कारवाई होत नसल्यामुळे भेसळीचे प्रकार चालूच आहेत. यामध्ये शेतकऱ्यांची होणारी बदनामी थांबवावी, अशी मागणीही ऋषिकेश साळुंखे यांनी केली आहे.