शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बावचीनजीक अपघातात पडवळवाडीच्या युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2021 04:22 IST

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथे इस्लामपूर जोड रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. विजय ...

गोटखिंडी : बावची (ता. वाळवा) येथे इस्लामपूर जोड रस्त्यावर अज्ञात ट्रॅक्टर व दुचाकीच्या धडकेत युवकाचा जागीच मृत्यू झाला. विजय उत्तम चव्हाण (वय ३२, रा. पडवळवाडी, ता. वाळवा) असे मृताचे नाव आहे. हा अपघात शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान घडला. या अपघाताची नोंद रात्री आष्टा पोलीस ठाण्यात झाली आहे.

विजय चव्हाण हा शुक्रवारी रात्री दुचाकीवरून (एमएच १० सीई ७९२९) पडवळवाडीहून आष्टा येथील शिंदे मळा येथे नातेवाइकांकडे थांबलेल्या वडिलांना घरी आणण्यासाठी जात होता. यावेळी बावची येथील शिरोळकर मळ्यानजीक अज्ञात ट्रॅक्टरने त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यात विजयच्या चेहऱ्याला जबर मार लागून त्याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रॅक्टरसह चालकाने घटनास्थळावरून पलायन केले.

रात्रीची वेेळ आणि पाऊस असल्याने रस्त्यावर वर्दळ नव्हती. यामुळे अपघातातील ट्रॅक्टरबाबत अधिक माहिती समजली नाही. अपघाताच्या आवाजाने नागरिक घटनास्थळी दाखल झाले. मृत विजयच्या चेहऱ्यावर गंभीर इजा झाल्याने त्याची प्रथम ओळख पटली नाही. मात्र त्याचा या परिसरात नेहमी वावर असल्याने त्यांची दुचाकी पाहून तो पडवळवाडी येथील असल्याचे समजले. यानंतर कुटुंबीय व नातेवाइकांना माहिती दिल्यावर ते घटनास्थळी आल्यावर त्याची ओळख पटली. यावेळी कुटुंबीयांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.

आष्टा येथील डांगे कॉलेज परिसरात विजय चव्हाण याचा खाद्यपदार्थ विक्रीचा व्यवसाय होता. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे. या घटनेची आष्टा पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.