शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वायफाय’साठी तरुणांची गर्दी

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

रात्री उशिरापर्यंत गर्दी---नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

सांगली : जिल्ह्यातील सर्वसामान्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या हेतूने प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय ‘वायफाय’ करीत वाहवा मिळवली खरी, मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. फोर जी इंटरनेटचा वापर करण्यासाठी कार्यालयाचे आवार तरुणांच्या गर्र्दीने अक्षरश: फुलून जात आहे. दिवसभर पन्नासच्या घरात असलेली तरुणांची संख्या रात्री वाढत असून, रात्री दोनशे ते तीनशेजण ‘वायफाय’चा आनंद ‘लुटत’ आहेत. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका खासगी मोबाईल कंपनीच्या मदतीने ‘वायफाय’ सुविधा सुरु करण्यात आली. सेवा सुरु झाल्यापासून आजपर्यंत त्याचा वापर करणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढच होत आहे. सुट्टीच्या दिवसात तर नेहमी सुनसान असणारा या कार्यालयाचा परिसर सध्या गर्दीने फुलून गेलेला असतो. या सेवेच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी, तरुणांनी या सेवेचा उपयोग करुन घेत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार खरोखरच अभ्यासासाठी तरुण या सेवेचा वापर करतात का? हा सवाल कायम आहे. नागरिकांच्या वाहनांवर अक्षरश: झोपून काही युवक नेटचा वापर करतात. त्यामुळे यावरून अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. या सेवेचा तरुणांकडून अतिरेक होत असल्याची तक्रार आता खुद्द कर्मचारीच करीत आहेत. रात्री तर या कार्यालयाच्या परिसरात दोनशेहून अधिक युवकांचा राबता असतो. यात नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून अत्यंत सकारात्मक हेतूने या सेवेची सुरूवात केली असली तरी, मूळ उद्देश बाजूला पडत आहे. (प्रतिनिधी)रात्री उशिरापर्यंत गर्दीवायफाय सेवेचा लाभ उठविण्यासाठी दिवसभर तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तळ’ ठोकून असतातच. शिवाय रात्री कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेनंतर तर खरी गर्दी या परिसरात होत आहे. रात्री किमान दोनशेहून अधिकजण या परिसरात या सेवेचा ‘लाभ’ घेत असल्याचे चित्र आहे.