शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
2
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
5
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
6
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
7
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
8
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
9
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
10
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
11
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
12
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
13
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
14
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
15
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
16
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
17
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
18
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
19
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
20
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम

जिल्हाधिकारी कार्यालयात ‘वायफाय’साठी तरुणांची गर्दी

By admin | Updated: November 16, 2015 00:11 IST

रात्री उशिरापर्यंत गर्दी---नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

सांगली : जिल्ह्यातील सर्वसामान्यांना नवीन तंत्रज्ञानाची ओळख व्हावी, या हेतूने प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालय ‘वायफाय’ करीत वाहवा मिळवली खरी, मात्र आता त्याचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले आहेत. फोर जी इंटरनेटचा वापर करण्यासाठी कार्यालयाचे आवार तरुणांच्या गर्र्दीने अक्षरश: फुलून जात आहे. दिवसभर पन्नासच्या घरात असलेली तरुणांची संख्या रात्री वाढत असून, रात्री दोनशे ते तीनशेजण ‘वायफाय’चा आनंद ‘लुटत’ आहेत. गेल्या महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एका खासगी मोबाईल कंपनीच्या मदतीने ‘वायफाय’ सुविधा सुरु करण्यात आली. सेवा सुरु झाल्यापासून आजपर्यंत त्याचा वापर करणाऱ्या तरुणांच्या संख्येत वाढच होत आहे. सुट्टीच्या दिवसात तर नेहमी सुनसान असणारा या कार्यालयाचा परिसर सध्या गर्दीने फुलून गेलेला असतो. या सेवेच्या उद्घाटनावेळी जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी, तरुणांनी या सेवेचा उपयोग करुन घेत स्पर्धात्मक परीक्षांची तयारी करावी, असे आवाहन केले होते. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांच्या आवाहनानुसार खरोखरच अभ्यासासाठी तरुण या सेवेचा वापर करतात का? हा सवाल कायम आहे. नागरिकांच्या वाहनांवर अक्षरश: झोपून काही युवक नेटचा वापर करतात. त्यामुळे यावरून अनेकदा वादावादीचे प्रसंगही घडत आहेत. या सेवेचा तरुणांकडून अतिरेक होत असल्याची तक्रार आता खुद्द कर्मचारीच करीत आहेत. रात्री तर या कार्यालयाच्या परिसरात दोनशेहून अधिक युवकांचा राबता असतो. यात नक्की कोणत्या कारणासाठी नेटचा वापर होतो, याचा अभ्यास केला, तर अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. प्रशासनाकडून अत्यंत सकारात्मक हेतूने या सेवेची सुरूवात केली असली तरी, मूळ उद्देश बाजूला पडत आहे. (प्रतिनिधी)रात्री उशिरापर्यंत गर्दीवायफाय सेवेचा लाभ उठविण्यासाठी दिवसभर तरुण जिल्हाधिकारी कार्यालयात ‘तळ’ ठोकून असतातच. शिवाय रात्री कार्यालयाच्या कामकाजाच्या वेळेनंतर तर खरी गर्दी या परिसरात होत आहे. रात्री किमान दोनशेहून अधिकजण या परिसरात या सेवेचा ‘लाभ’ घेत असल्याचे चित्र आहे.