शहरं
Join us  
Trending Stories
1
POK मध्ये लोकांना घरे खाली करण्याचे आदेश; पाकिस्तानी सैन्यानं बनवले बंकर, वॉर सायरन लावले
2
योग गुरू स्वामी पद्मश्री शिवानंद बाबा यांनी वयाच्या १२८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
दुसरे लग्न करायचे तर दुसऱ्याच्या पत्नीला पळवून न्यावे लागते; या देशात आहे विचित्र परंपरा...
4
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
5
"भारतात इतर पर्यटन स्थळं नाहीत का?" काश्मिरला जाण्याचं आवाहन करणाऱ्यांवर पल्लवी जोशीचं भाष्य
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लॉटरी, यशच यश; प्रगतीची संधी, नोकरीत पदोन्नती, पैसा मिळेल!
7
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
8
WAVES 2025: नेटफ्लिक्स सह-सीईओंसोबत सैफची चर्चा, म्हणाला, "रामायण, महाभारत..."
9
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
10
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
11
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
12
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
13
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
14
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
15
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
16
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
17
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
18
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
19
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
20
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश

वारणा पाणी योजनेसाठी युवा मंच आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:27 IST

लेंगरे म्हणाले, उन्हाळ्यामध्ये कृष्णा नदी कोरडी पडल्याने सांगली व कुपवाडला पाणी टंचाई निर्माण होते. तसेच कृष्णेच्या उगमापासून ते सांगलीतील ...

लेंगरे म्हणाले, उन्हाळ्यामध्ये कृष्णा नदी कोरडी पडल्याने सांगली व कुपवाडला पाणी टंचाई निर्माण होते. तसेच कृष्णेच्या उगमापासून ते सांगलीतील जॅकवेलपर्यंत १३ साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी कृष्णा नदीत मिळसते. अनेक गावांचे सांडपाणीही नदीतच सोडले जात आहे. त्यामुळे माजी मंत्री मदन पाटील यांनी वारणा नदीतून शुध्द व बारमाही पाणी पुरवठा करण्यासाठी ‘वारणा उद्भव पाणी योजना’ तयार केली. ती शासनाकडून मंजूर करून घेतली व त्यासाठी निधी आणला. मात्र मध्यंतरही महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर या योजनेला ब्रेक लागला. या योजनेतील माळगंबला जलशुध्दीकरण केंद्र, पाण्याच्या टाक्या, वितरण व्यवस्था आदी कामे झाली आहेत. आता केवळ वारणेतून पाणी उचलून ते माळ बंगल्यापर्यंत आणणे हा एकच टप्पा बाकी आहे. वारणा उद्भव पाणी योजना पूर्ण करावी, अशी मागणी पालकमत्री जयंत पाटील व कृषी व सहकार राज्य मंत्री विश्वजित कदम यांच्याकडे मदन पाटील युवा मंचच्यावतीने करण्यात येणार आहे.

तसेच रस्त्यावरचे बाजार खुल्या भूखंडावर स्थलांतरित करावे तसेच शहरासाठी एक मध्यवर्ती व सर्व सोयींनीयुक्त बहुमजली भाजी मंडई उभारावी, अशी मागणीही त्यांनी केली.

चौकट

हिराबाग जलशुध्दीकरण केंद्र सुरू करा

आनंद लेंगरे म्हणाले, सांगली व कुपवाड शहरासाठी सध्या माळबंगला जलशुध्दीकरण केंद्रातून पाणी दिले जाते. तरीही शहराला अपुरा पाणीपुरवठा होत आहे. हे टाळण्यासाठी हिराबाग येथील जलशुध्दीकरण केंद्र पूर्ववत सुरू करावे. या केंद्रातून अर्ध्या सांगलीला पाणी पुरवठा होतो. माळबंगल्याला समांतर यंत्रणा उभारणे आवश्यक आहे.