शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

सांगलीत चाकू हल्ल्यात तरुण ठार

By admin | Updated: November 3, 2016 00:05 IST

चौघेजण जखमी : भांडण सोडविण्यास गेला अन् जिवाला मुकला

 सांगली : येथील न्यू टिंबर एरियातील भीमनगर परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचाच चाकूने वार करून खून करण्यात आला. आदर्श ऊर्फ नरसू मल्हारी वाघमारे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या वादावादीत अन्य चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मृत नरसूचा भाऊ विकी वाघमारे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. यात संतोष दादासाहेब ठोकळे, त्याचे साथीदार नितीन बापू ठोकळे व सोनू ऊर्फ योगेश रवी पाटील (सर्व रा. भीमनगर) या तिघांवर खुनाचा संशय आहे. यातील संशयित संतोष ठोकळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संतोष व त्याचे दोन साथीदार नितीन व सोनूसह भीमनगरमधील भीमकट्ट्यावर बसले होते. यावेळी संतोष दारूच्या नशेत होता. याच परिसरात राहणाऱ्या अक्काताई सनदी (वय ८०) रस्त्याने घरी निघाल्या होत्या. त्यांना पाहून संतोषने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कानाखाली थप्पड मारली. यातून त्यांच्यात वाद झाला. अक्काताईचा नातलग सूरज सनदी यानेही संतोषशी वाद घातला. संतोष व सनदी यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती आदर्श ऊर्फ नरसूला मिळाली. यावेळी तो घरात झोपला होता. त्याला कोणीतरी भांडण सोडविण्यासाठी बोलावून नेले. नरसू दोघांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच संतोषने त्याच्याजवळील चाकू काढून त्याला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. दोघात वाद सुरू असल्याने परिसरातील तरुणांनीही गर्दी केली होती. संतोष व नरसू यांच्यात झटापट झाली. यावेळी इतर तरुणही भांडण सोडविण्यासाठी धावले. नरसू मागे हटत नसल्याचे पाहून संतोषने त्याच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, पण छातीवर चाकूचा घाव वर्मी लागल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या झटापटीत रोहित पुजारी, राहुल मुळके, विकी वाघमारे जखमी झाले. संतोष ठोकळे, नितीन ठोकळे व सोनू पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सरोजिनी पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) चौकट बहिणीसाठी घेतले नवीन कपडे नरसूचे शिक्षण नववीपर्यंत झाले होते. तो कधी वाढप्याचे काम करी, तर कधी गवंड्याच्या हाताखाली कामाला जात असे. त्याची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण मिळत असे. दिवाळी तोंडावर आल्याने तो चार ते पाच दिवस गवंड्याच्या हाताखाली कामाला गेला. त्यातून आलेल्या पैशातून त्याने स्वत:सह बहिणीसाठी नवीन कपडे घेतले होते.