शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
2
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
3
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
4
उलटेच झाले! सामुहिक बलात्काराची केस दाखल केली, तिलाच सात वर्षांची शिक्षा झाली
5
PF साठी एजंट्सची मदत घेताय? सावधान! EPFO ने दिली धोक्याची घंटा, पैसे आणि डेटा दोन्ही जाईल!
6
पुन्हा तेच! एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; अहमदाबादहून लंडनला जाणारे विमान रद्द
7
'दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे'चा सीक्वेल येणार? काजोल म्हणाली, "सिनेमाचा जो शेवट झाला..."
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी आणला स्वत:च्याच ब्रँडचा स्मार्टफोन; अमेरिकेत भूकंप, कमी किंमतीत एवढे फिचर्स देणार की...
9
Crude Oil Reserves India : भारताला अंदमानात २ लाख कोटी लिटर कच्च्या तेलाचं भांडार मिळालं, GDP २० ट्रिलियन डॉलर्सवर जाणार?
10
इस्रायल-इराण यांचे एकमेकांवर बॉम्ब; सरकारी न्यूज चॅनेलच्या इमारतीवर हल्ले
11
ऑल टाईम हायवरुन सोन्याचे दर घसरले, चांदीच्या दरात मात्र तेजी; पाहा लेटेस्ट किंमत
12
'या सगळ्यांना मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपी करायला हवे', खासदार संजय राऊत नितेश राणेंवर भडकले
13
Census of India: ३५ लाख कर्मचारी करणार जनगणना, नागरिकांनाही करता येणार स्वयंनोंदणी!
14
अरेरे! लग्नानंतर बॉयफ्रेंडसोबत पळून गेली बायको; नवरा म्हणतो, "राजा रघुवंशी होण्यापासून वाचलो"
15
सेलिब्रिटी जोडप्याने फिल्ममेकरचं केले अपहरण, गुन्हा दाखल; रस्त्यात एकट्याला अडवले, मग...
16
'समृद्धी'वर दगडफेक करून लुटीचा प्रयत्न; छ. संभाजीनगर ते नागपूर मार्गावरील प्रकार वाढले!
17
Tata Motors Shares: परदेशातून चांगली बातमी, तरीही आपटले टाटा मोटर्सचे शेअर्स; गुतवणूकदारांनी काय करावं?
18
४८ तासानंतरही केरळमध्ये उभं आहे जगातील सर्वात महागडं लढाऊ विमान; नेमकं कारण काय?
19
गुरुवारी गुरुपौर्णिमा: ४ गुरुवार करा स्वामी सेवा, कृपा होईलच विश्वास ठेवा; नेमके काय करावे?
20
घाईगडबडीत चुकीची कर व्यवस्था निवडली? घाबरू नका! ITR दाखल करताना 'ही' ट्रिक वापरा आणि टॅक्स वाचवा

सांगलीत चाकू हल्ल्यात तरुण ठार

By admin | Updated: November 3, 2016 00:05 IST

चौघेजण जखमी : भांडण सोडविण्यास गेला अन् जिवाला मुकला

 सांगली : येथील न्यू टिंबर एरियातील भीमनगर परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचाच चाकूने वार करून खून करण्यात आला. आदर्श ऊर्फ नरसू मल्हारी वाघमारे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या वादावादीत अन्य चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मृत नरसूचा भाऊ विकी वाघमारे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. यात संतोष दादासाहेब ठोकळे, त्याचे साथीदार नितीन बापू ठोकळे व सोनू ऊर्फ योगेश रवी पाटील (सर्व रा. भीमनगर) या तिघांवर खुनाचा संशय आहे. यातील संशयित संतोष ठोकळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संतोष व त्याचे दोन साथीदार नितीन व सोनूसह भीमनगरमधील भीमकट्ट्यावर बसले होते. यावेळी संतोष दारूच्या नशेत होता. याच परिसरात राहणाऱ्या अक्काताई सनदी (वय ८०) रस्त्याने घरी निघाल्या होत्या. त्यांना पाहून संतोषने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कानाखाली थप्पड मारली. यातून त्यांच्यात वाद झाला. अक्काताईचा नातलग सूरज सनदी यानेही संतोषशी वाद घातला. संतोष व सनदी यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती आदर्श ऊर्फ नरसूला मिळाली. यावेळी तो घरात झोपला होता. त्याला कोणीतरी भांडण सोडविण्यासाठी बोलावून नेले. नरसू दोघांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच संतोषने त्याच्याजवळील चाकू काढून त्याला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. दोघात वाद सुरू असल्याने परिसरातील तरुणांनीही गर्दी केली होती. संतोष व नरसू यांच्यात झटापट झाली. यावेळी इतर तरुणही भांडण सोडविण्यासाठी धावले. नरसू मागे हटत नसल्याचे पाहून संतोषने त्याच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, पण छातीवर चाकूचा घाव वर्मी लागल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या झटापटीत रोहित पुजारी, राहुल मुळके, विकी वाघमारे जखमी झाले. संतोष ठोकळे, नितीन ठोकळे व सोनू पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सरोजिनी पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) चौकट बहिणीसाठी घेतले नवीन कपडे नरसूचे शिक्षण नववीपर्यंत झाले होते. तो कधी वाढप्याचे काम करी, तर कधी गवंड्याच्या हाताखाली कामाला जात असे. त्याची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण मिळत असे. दिवाळी तोंडावर आल्याने तो चार ते पाच दिवस गवंड्याच्या हाताखाली कामाला गेला. त्यातून आलेल्या पैशातून त्याने स्वत:सह बहिणीसाठी नवीन कपडे घेतले होते.