शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत चाकू हल्ल्यात तरुण ठार

By admin | Updated: November 3, 2016 00:05 IST

चौघेजण जखमी : भांडण सोडविण्यास गेला अन् जिवाला मुकला

 सांगली : येथील न्यू टिंबर एरियातील भीमनगर परिसरात भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या तरुणाचाच चाकूने वार करून खून करण्यात आला. आदर्श ऊर्फ नरसू मल्हारी वाघमारे (वय १८) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली. या वादावादीत अन्य चौघे जखमी झाले आहेत. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून, तिघांची नावे निष्पन्न झाली आहेत. अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. याप्रकरणी मृत नरसूचा भाऊ विकी वाघमारे यांनी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दिली आहे. यात संतोष दादासाहेब ठोकळे, त्याचे साथीदार नितीन बापू ठोकळे व सोनू ऊर्फ योगेश रवी पाटील (सर्व रा. भीमनगर) या तिघांवर खुनाचा संशय आहे. यातील संशयित संतोष ठोकळे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास संतोष व त्याचे दोन साथीदार नितीन व सोनूसह भीमनगरमधील भीमकट्ट्यावर बसले होते. यावेळी संतोष दारूच्या नशेत होता. याच परिसरात राहणाऱ्या अक्काताई सनदी (वय ८०) रस्त्याने घरी निघाल्या होत्या. त्यांना पाहून संतोषने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कानाखाली थप्पड मारली. यातून त्यांच्यात वाद झाला. अक्काताईचा नातलग सूरज सनदी यानेही संतोषशी वाद घातला. संतोष व सनदी यांच्यात वाद सुरू असल्याची माहिती आदर्श ऊर्फ नरसूला मिळाली. यावेळी तो घरात झोपला होता. त्याला कोणीतरी भांडण सोडविण्यासाठी बोलावून नेले. नरसू दोघांमधील भांडण सोडविण्याचा प्रयत्न करीत असतानाच संतोषने त्याच्याजवळील चाकू काढून त्याला भीती दाखविण्याचा प्रयत्न केला. दोघात वाद सुरू असल्याने परिसरातील तरुणांनीही गर्दी केली होती. संतोष व नरसू यांच्यात झटापट झाली. यावेळी इतर तरुणही भांडण सोडविण्यासाठी धावले. नरसू मागे हटत नसल्याचे पाहून संतोषने त्याच्या छातीवर चाकूने हल्ला केला. त्याला उपचारासाठी सांगलीच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले, पण छातीवर चाकूचा घाव वर्मी लागल्याने वाटेतच त्याचा मृत्यू झाला. या झटापटीत रोहित पुजारी, राहुल मुळके, विकी वाघमारे जखमी झाले. संतोष ठोकळे, नितीन ठोकळे व सोनू पाटील या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, रात्री उशिरापर्यंत कोणालाही अटक करण्यात आली नव्हती. विश्रामबाग पोलिस ठाण्याच्या निरीक्षक सरोजिनी पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी) चौकट बहिणीसाठी घेतले नवीन कपडे नरसूचे शिक्षण नववीपर्यंत झाले होते. तो कधी वाढप्याचे काम करी, तर कधी गवंड्याच्या हाताखाली कामाला जात असे. त्याची आर्थिक परिस्थितीही बेताची होती. दिवसभर काम केल्यानंतर रात्री जेवण मिळत असे. दिवाळी तोंडावर आल्याने तो चार ते पाच दिवस गवंड्याच्या हाताखाली कामाला गेला. त्यातून आलेल्या पैशातून त्याने स्वत:सह बहिणीसाठी नवीन कपडे घेतले होते.