शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
3
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
4
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
5
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
6
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
7
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
9
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
10
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
11
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
12
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
13
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
14
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
15
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
16
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
17
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
18
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
19
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
20
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...

तुम्ही नारळ फोडा, उमेदवारी मला मिळो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:32 IST

सांगली : विनोदी चिमटे काढण्याचे कसब, हजरजबाबीपणा असलेल्या राजकारण्यांची सांगलीला परंपरा लाभली आहे. नव्या पिढीतही हे कौशल्य विकसित झाले ...

सांगली : विनोदी चिमटे काढण्याचे कसब, हजरजबाबीपणा असलेल्या राजकारण्यांची सांगलीला परंपरा लाभली आहे. नव्या पिढीतही हे कौशल्य विकसित झाले आहे. सांगलीतील एका कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेसच्या दोन नेत्यांमध्ये अशीच विनोदी जुगलबंदी रंगली. पालकमंत्री व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत हा प्रसंग घडत असल्याने त्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही उडी घेतली.

सांगलीतील नेमिनाथ नगर येथे एका चिल्ड्रन पार्कचे उद्घाटन जयंत पाटील यांच्या हस्ते पार पडले. जयंत पाटील यांनी यावेळी नारळ फोडण्याचा पहिला मान काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांना दिला. त्यानंतर लगेचच काँग्रेसचे युवा नेते विशाल पाटील यांनी त्यांच्या या संधीवर चिमटा काढला. ‘सर्व कार्यक्रमांचे नारळ त्यांनाच फोडायला मिळोत, पण उमेदवारी मला मिळो’. यावर उपस्थितांमध्ये एकच हास्यकल्लोळ झाला. या चिमट्याला तितक्याच हजरजबाबीपणाने पृथ्वीराज पाटील यांनी उत्तर दिले. ‘उमेदवारी त्यांनाच मिळणार आहे, पण लोकसभेची’. या त्यांच्या वाक्यावर हास्यकल्लोळ आणखी वाढला.

दोन्ही नेत्यांच्या जुगलबंदीचा आनंद जयंत पाटील यांच्या चेहऱ्यावरील हास्याने स्पष्ट दिसत होता. यावर गप्प बसतील ते राष्ट्रवादी पदाधिकारी कसले. यात राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांनी उडी घेत ‘या जागेवर आता आम्ही दावा करु’, असे सांगत दोन्ही नेत्यांची गंमत केली.

चौकट

सुप्त संघर्षाची कहाणी

गत सांगली विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून पृथ्वीराज पाटील यांना उमेदवारी मिळाली होती. त्यांना अल्प मताने पराभव पत्करावा लागला. दुसरीकडे सांगली लोकसभा मतदार संघातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विशाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती. आता विशाल पाटील यांच्या समर्थकांनी त्यांना विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह धरला आहे. त्यामुळे या जागेसाठी सध्या काँग्रेसमध्ये छुपा संघर्ष सुरु आहे.

चौकट

राष्ट्रवादी-काँग्रेसमध्येही दावेदारी

दोन्ही काँग्रेस जेव्हा एकत्र येतात, तेव्हा सांगली विधानसभेच्या जागेसाठी दोन्ही पक्षांकडून दावेदारी केली जाते. अनेकदा राष्ट्रवादीनेही या जागेवरुन निवडणूक लढवली आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांतही जागेवरुन संघर्ष आहे.