शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

काल जेवलो, आज जेवायचे नाही का?

By admin | Updated: February 17, 2017 23:52 IST

महामार्गावरील वाहनधारकांना सवाल : कऱ्हाड पोलिसांकडून वसुली जोमात

अशोक पाटील --इस्लामपूर -पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील वाघवाडी फाटा ते कऱ्हाडपर्यंत महामार्ग पोलिसांनी पैसे वसुलीसाठी उच्छाद मांडला आहे. त्रुटी काढून वाहनांवर खटला दाखल करायचा आणि पैसे उकळून सोडून द्यायचे, असा प्रकार सुरू आहे. इस्लामपुरातील एका मालवाहतूक करणाऱ्याला कऱ्हाडच्या महामार्ग पोलिसांनी सलग दोन दिवस पकडले. दुसऱ्यादिवशी त्याने, ‘अहो कालच पैसे दिले, आज परत काय?’ असे म्हटल्यावर त्यातील एका पोलिसाने, ‘काल जेवल्यावर आज जेवत नाही का?’ असा सवाल करून पुन्हा पैसे घेतलेच!मार्च महिनाअखेर वसुली व खटल्यांचे ‘टार्गेट’, त्यातच जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमुळे पोलिसांना वाहने तपासण्याचे आदेश आहेत. हे आयते कोलितच मळाल्याने, त्यांच्याकडून लुटण्याचा उद्योग सुरू असल्याचे वाहनधारक सांगतात. कायद्याचे पालन करणाऱ्यांनाही याचा नाहक त्रास सोसावा लागत आहे.सध्या महामार्गावरील वाळवा व कऱ्हाड तालुक्याच्या सीमारेषेवर असलेल्या मालखेड, बेलवडे, वाळवा तालुक्यातील वाघवाडी फाट्यावर कऱ्हाड येथील महामार्ग पोलिस वाहन तपासणीच्या निमित्ताने थांबलेले दिसतात. कोल्हापूर व सांगली जिल्ह्याची सीमारेषा असलेल्या कणेगाव येथेही कुरळप पोलिस ठाण्याचे पोलिस दिसतात. ते दररोज वाहनधारकांकडून पैसे घेत असल्याचे, वाहनधारकांनी सांगितले. एखाद्याने कायद्याची भाषा सुरू केली की, त्याला दंडाची पावती दिली जाते.चार दिवसांपूर्वी असाच प्रकार इस्लामपूर येथील वाहनधारकाशी घडला. वाघवाडी येथे वाहनांची तपासणीसाठी उभ्या असलेल्या कऱ्हाड येथील पोलिसांनी त्याच्याकडून पैसे उकळले होते. पुन्हा दुसऱ्यादिवशी त्याच वाहनाला अडवून याच पोलिसांनी पैशाची मागणी केली. त्यावर या वाहनधारकाने, ‘अहो साहेब, कालच पैसे दिले, आज परत कशाला पैसे मागता?’ असा प्रश्न विचारला. त्यावर एका पोलिसाने, ‘काल जेवल्यावर आज भूक लागत नाही का?’ असा प्रतिसवाल करून पैसे घेतलेच. वाहनधारकांकडे सर्व कागदपत्रे असतानाही, त्रुटी काढून पैशाची मागणी होती. याला वाहनधारक कंटाळले असून, सांगली जिल्हा पोलिसप्रमुखांनी कऱ्हाडच्या पोलिसांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.एक आणि दोन नंबर बॅचकऱ्हाड महामार्ग पोलिस विभागात एकूण ३४ पोलिस कर्मचारी आहेत. त्यांच्या कामाचे नियोजन करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक आहेत. येथे १७-१७ पोलिसांच्या दोन बॅच कार्यरत आहेत. एक बॅच २४ तास सेवा करते. त्यानंतर दुसरी बॅच २४ तास महामार्गावर सेवा देते. परंतु यातील पहिली बॅच पैसे उकळण्यात आणि वाहनधारकांना त्रास देण्यात तरबेज आहे.