शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

भूविकास बँकेच्या कर्जमाफीकडे येळापूरच्या शेतकऱ्यांच्या नजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:28 IST

कोकरुड : भू-विकास बँकेकडे असलेली थकबाकी माफ करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी झाल्यास ...

कोकरुड : भू-विकास बँकेकडे असलेली थकबाकी माफ करून शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यासाठी शासनस्तरावर मोठ्या हालचाली सुरू आहेत. ही कर्जमाफी झाल्यास येळापूर येथील सभासदांची भू-विकास बँकेकडे असलेली १५ कोटींची थकबाकी माफ होणार असल्याने सर्वांच्या नजरा शासन निर्णयाकडे लागल्या आहेत.

३० वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ मध्ये येळापूरसह परिसरातील शेतीला पाणी मिळावे, येथील युवकांना रोजगार, महिलांच्या हाताला काम मिळून चार रुपये हातात यावेत, यासाठी विश्वास कारखान्याचे तत्कालीन अध्यक्ष लोकनेते फत्तेसिंगराव नाईक, संचालक शिवाजीराव घोडे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश उपसा जलसिंचन योजनेची स्थापना करण्यात आली. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे या संस्थेस कोणीही कर्ज देत नव्हते. यावेळी फत्तेसिंगराव नाईक यांनी शिराळा येथील भू-विकास बँकेच्या शाखेस विश्वास साखर कारखान्याचे हमीपत्र दिल्याने दहा वर्षांनंतर म्हणजे २००१ मध्ये प्रत्यक्ष ही योजना सुरू झाली. या योजनेसाठी २३२ सभासदांनी ६३० एकरवर कोट्यवधीचे कर्ज घेतले होते. कमी क्षेत्र लागवडीखाली असल्याने थकबाकी वाढत जाऊन ती १४ कोटी ७१ लाख ३० हजार झाली आहे. तारण ६३० एकर क्षेत्रापैकी ३०० एकर म्हणजे निम्मेच क्षेत्र लागवडीखाली असल्याने कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत चालला होता. महाविकास आघाडी सरकारने भू-विकास बॅंकेकडे असणाऱ्या सर्व कर्जदारांना कर्जमाफी देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे तीस वर्षांपासून असलेले १५ कोटी रुपये कर्ज माफ झाल्यास याचा फायदा सभासद, शेतकरी, गणेश उपसा जलसिंचन योजना यांना होणार आहे. येथील शेतकऱ्यांच्या नजरा शासन निर्णयाकडे लागल्या आहेत.