शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
7
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
8
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
9
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
10
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
11
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
12
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
13
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
14
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
15
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
16
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
17
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
18
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
19
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
20
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी

येळापूर, मेणीतील सहा बंधारे वाहून गेले

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

कृषी विभागाकडूृन बांधकाम : चौकशी करुन कारवाईची मागणी

येळापूर : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे अल्प कालावधित वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत असून, या सर्व कामांची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांच्याकडे केली. यावेळी रणधीर नाईक यांनी येळापूर, मेणी, चरण, काळुंद्रे परिसरातील सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे त्याचबरोबर पाझर तलावाची पाहणी केली. येळापूर, मेणी, सावंतवाडी, रांजणवाडी, शिरसटवाडी येथील सिमेंट बंधारे वाहून गेल्याचे, तर मातीचे बंधारे गाळाने भरले असून, शिरसटवाडी पाझर तलावाच्या गळतीबद्दल शेतकऱ्यांनी माहिती दिल्याने त्यांनी वरील सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मेणी खोऱ्यामध्ये गत कालावधित सुमारे ६ सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. ते सर्व बंधारे वाहून गेलेले आहेत. बांधलेले सर्व बंधारे वाहून जाणे धक्कादायक असल्याचे या ठिकाणी पाहणी केली असता आढळून आले. बंधाऱ्याचे आवशेष पाहून निकृष्ट दर्जाचे काम झाले होते, हे यामुळे कळून आले आहे. या बंधाऱ्याची कामे चांगली झाली असती, तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ झाला असता. तर अनेक गाळ साठलेले मातीचे बंधारे दगडमातीने भरल्याने ऐन पावसाळ्यात या ठिकाणी एक थेंबही पाणी साठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करुन उगवलेल्या पिकांना पाणी मिळाले नसल्याने लाखो रुपये अभियंता व अधिकारी यांच्या खिशात गेले. मात्र त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसलाही झाला नाही. यावेळी मेणी खोऱ्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्याच्या समस्या मांडल्या, तर नाईक यांनी जलयुक्त शिवार योजनेतील जलसंधारणाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने आत्माराम सावंत, शिवाजी शिरसट, आत्माराम नेर्लेकर, खाशाबा पाटील, हरिबा शिरसट, अशोक कुंभार, आनंदराव वाघमारे, महादेव पाटील, शामराव पाटील, आकाराम निकम, मोहन आटुगडे यांनी अडचणी मांडल्या. यावेळी ग्लुकोजचे संचालक गजानन पाटील, सुभद्रा आटुगडे, दगडू सावंत, सरपंच संजय बेंगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)