शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

येळापूर, मेणीतील सहा बंधारे वाहून गेले

By admin | Updated: September 13, 2015 00:18 IST

कृषी विभागाकडूृन बांधकाम : चौकशी करुन कारवाईची मागणी

येळापूर : शिराळा तालुक्याच्या पश्चिम भागातील कृषी विभागामार्फत बांधण्यात आलेले सिमेंट बंधारे अल्प कालावधित वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुष्काळाला तोंड द्यावे लागत असून, या सर्व कामांची चौकशी करुन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य रणधीर नाईक यांच्याकडे केली. यावेळी रणधीर नाईक यांनी येळापूर, मेणी, चरण, काळुंद्रे परिसरातील सिमेंट बंधारे, मातीचे बंधारे त्याचबरोबर पाझर तलावाची पाहणी केली. येळापूर, मेणी, सावंतवाडी, रांजणवाडी, शिरसटवाडी येथील सिमेंट बंधारे वाहून गेल्याचे, तर मातीचे बंधारे गाळाने भरले असून, शिरसटवाडी पाझर तलावाच्या गळतीबद्दल शेतकऱ्यांनी माहिती दिल्याने त्यांनी वरील सर्व ठिकाणी भेट देऊन पाहणी केली. मेणी खोऱ्यामध्ये गत कालावधित सुमारे ६ सिमेंट बंधारे बांधण्यात आले होते. ते सर्व बंधारे वाहून गेलेले आहेत. बांधलेले सर्व बंधारे वाहून जाणे धक्कादायक असल्याचे या ठिकाणी पाहणी केली असता आढळून आले. बंधाऱ्याचे आवशेष पाहून निकृष्ट दर्जाचे काम झाले होते, हे यामुळे कळून आले आहे. या बंधाऱ्याची कामे चांगली झाली असती, तर त्याचा शेतकऱ्यांना निश्चित लाभ झाला असता. तर अनेक गाळ साठलेले मातीचे बंधारे दगडमातीने भरल्याने ऐन पावसाळ्यात या ठिकाणी एक थेंबही पाणी साठा होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना पेरणी करुन उगवलेल्या पिकांना पाणी मिळाले नसल्याने लाखो रुपये अभियंता व अधिकारी यांच्या खिशात गेले. मात्र त्याचा फायदा सर्वसामान्य शेतकऱ्यांना कसलाही झाला नाही. यावेळी मेणी खोऱ्यातील सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी शेतीच्या पाण्याच्या समस्या मांडल्या, तर नाईक यांनी जलयुक्त शिवार योजनेतील जलसंधारणाच्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. यावेळी शेतकऱ्यांच्यावतीने आत्माराम सावंत, शिवाजी शिरसट, आत्माराम नेर्लेकर, खाशाबा पाटील, हरिबा शिरसट, अशोक कुंभार, आनंदराव वाघमारे, महादेव पाटील, शामराव पाटील, आकाराम निकम, मोहन आटुगडे यांनी अडचणी मांडल्या. यावेळी ग्लुकोजचे संचालक गजानन पाटील, सुभद्रा आटुगडे, दगडू सावंत, सरपंच संजय बेंगडे आदी उपस्थित होते. (वार्ताहर)