शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
4
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
5
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
9
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
10
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
11
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
12
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
13
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
14
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
15
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
16
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
17
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
18
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
19
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
20
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

यंदा केवळ तीनच ग्रामपंचायती तंटामुक्त

By admin | Updated: May 26, 2015 00:54 IST

रत्नागिरी जिल्हा : तीनशे ठिकाणचे तंटे कायमच

रत्नागिरी : जिल्ह्यातील ८४४ ग्रामपंचायतींपैकी ५४१ ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत. यावर्षी त्यामध्ये आणखी तीन ग्रामपंचायतींची भर पडली आहे. निगडी (मंडणगड), भराडी (मंडणगड), पालशेत (गुहागर) या ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्या आहेत.जिल्ह्यातील ८४४ पैकी ३०३ ग्रामपंचायती तंटामुक्त व्हायच्या शिल्लक आहेत. केवळ तीन ग्रामपंचायती तंटामुक्त झाल्याने अद्याप ३०० ग्रामपंचायती तंटामुक्त होणे बाकी आहे. मंडणगड, गुहागर तालुकेवगळता अन्य सात तालुक्यातील ग्रामपंचायती तंटामुक्त झालेल्या नाहीत. जिल्ह्याच्या ९ तालुक्याच्या मूल्यमापन समिती सदस्यांच्या बैठकीत यावर्षी तंटामुक्त होण्याचे प्रमाण नगण्य असल्याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले. इच्छाशक्तीची कमतरता असल्याचे मत बैठकीत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक शिवाजी पाटील, पोलीस निरीक्षक व तहसीलदार उपस्थित होते. काही ग्रामपंचायती तंटामुक्त होण्याच्या गुणांकनापर्यंत पात्र ठरु शकतात. त्यासाठी ५ जूनपर्यंतच्या उर्वरित कालावधीत पाठपुरावा करण्याची सूचना देण्यात आली आहे.जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी मार्गदर्शन करीत असताना गाव तंटामुक्त होण्यासाठी इतर सर्व बाबींची पूर्तता होत असताना केवळ दिवाणी तंट्यांमुळे गाव अपात्र ठरत असेल, तर अशा गावांचा स्वतंत्र तक्ता तयार करावा. या गावांचा स्वतंत्र अहवाल शासनाकडे पाठवून त्याबाबत काही वेगळा विचार करण्यासंदर्भात मार्गदर्शन करण्याची सूचना केली. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी दिवाणी खटले तंटामुक्त होण्यामध्ये अडथळे ठरत असल्याचे मत नोंदवले. प्रतिबंधात्मक उपाययोजनांची कामे उल्लेखनीय असून, दिवाणी खटले तंटामुक्त समितीच्या गुणांमध्ये गावाचे गुण कमी करत असल्याचे सांगितले.अनेक गावांमध्ये तंटामुक्त योजनांचा अहवाल तयार करण्यात ग्रामसेवक, पोलीसपाटील, तलाठी अनिच्छा दर्शवतात. त्यामुळे गावे तंटामुक्त होण्यास विलंब होतो. याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. व जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी संबंधित अधिकारी, कर्मचारीवर्गाकडून काम करुन घेण्याची सूचना बैठकीत दिली. (प्रतिनिधी)