शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांवरील प्रशासकराजची वर्षपूर्ती

By संतोष भिसे | Updated: March 12, 2023 18:24 IST

राज्यभरातील २८३ पंचायत समित्यांवर प्रशासकराज सुरु होऊन सोमवारी (दि. १३) एक वर्ष पूर्ण झाले.

सांगली : राज्यभरातील २८३ पंचायत समित्यांवर प्रशासकराज सुरु होऊन सोमवारी (दि. १३) एक वर्ष पूर्ण झाले. जिल्हा परिषदांवरील प्रशासकीय कारकिर्दीचीही येत्या सोमवारी (दि. २०) वर्षपूर्ती होत आहे. इतका प्रदीर्घ काल प्रशासकराज असणे हा अत्यंत दुर्मिळ अपवाद ठरला आहे.

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका विशिष्ट कालमर्यादेत शक्य नसल्याने प्रशासक नियुक्तीचा आदेश शासनाने गतवर्षी घेतला होता. प्रशासक म्हणून गटविकास अधिकाऱ्यांना नेमले. २५ जिल्हा परिषदाही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आल्या. त्यामुळे पदाधिकाऱ्यांची दालने तब्बल वर्षभर कुलूपबंद आहेत. त्यांची शासकीय वाहनेही पार्कींगमध्ये लावून ठेवली आहेत.

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांचे सभापती, तसेच पंचायत समितीचे सभापती, उपसभापती ही पदे एकाच वेळी रिक्त झाली होती. त्यानंतर आजअखेर प्रशासकच जिल्ह्याच्या कारभाराचा गाडा हाकत आहेत. इतका प्रदीर्घ काळ प्रशासक असण्याचा हा अपवादात्मक प्रसंग ठरला आहे.  याचा प्रतिकूल परिणाम विकासकामांवर झाला आहे. जिल्हा परिषदेत सदस्य नसल्याने स्वीय निधीचा वापर थांबला आहे. जिल्हा नियोजन समितीकडून मिळणाऱ्या निधीवरही मर्यादा आल्या आहेत. प्रशासक कामकाज करत असले, तरी जनतेच्या अपेक्षेतील कामांना न्याय मिळेना झाला आहे. आतापर्यंत लोकप्रतिनिधींकडून सर्वसाधारण बैठकांमध्ये कामांचा पाठपरावा केला जायचा, सध्या मात्र तशी परिस्थिती नाही.

शासन सध्या मार्च एण्डच्या गडबडीत आहे. जिल्हा परिषदेत फक्त मॉडेल स्कूल आणि स्मार्ट पीएचसीच्या कामांना प्राधान्य दिसत आहे. बांधकाम विभागातही मार्च एण्डची गडबड आहे. गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये निवडणूक आयोगाकडून निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. सदस्य संख्येच्या बदलामुळे स्थगिती जाहीर झाली. सदस्य संख्येची निश्चिती व अंमलबजावणी याला वेळ लागणार असल्याने स्थगितीचा निर्णय घेण्यात आला. पण आजअखेर हा गोंधळ थांबलेला नाही.

आता पावसाळा, तर फेब्रुवारीत लोकसभेची आचारसंहिता

आता जूनमध्ये पावसाळा सुरु होणार असल्याने निवडणुका केव्हा होणार? याकडे लक्ष लागणार आहे. पुढील वर्षी फेब्रुवारीमध्ये लोकसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्यामुळेही जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या केव्हा होणार? याची उत्सुकता लागली आहे.