कडेगाव : यशवंतराव चव्हाण यांनी निर्माण केलेल्या साहित्यसंपदेत सुसंस्कृत माणूस घडविण्याचे सामर्थ्य आहे. आपल्या चरित्र व चारित्र्यातून ते संस्काराचे महामेरू ठरले, असे मत प्रा. प्रदीप कदम यांनी व्यक्त केले.आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या ३० व्या स्मृतिदिनानिमित्त देवराष्ट्रे (ता. कडेगाव) येथे यशवंतराव हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित यशवंत व्याख्यानमालेत प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी यशवंत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मोहनराव मोरे होते.ते म्हणाले की, गोरगरिबांच्या मुला-मुलींना मोफत शिक्षण मिळावे म्हणून यशवंतरावांनी पदाचा राजीनामा देण्याची तयारी केली होती. ईबीसी सवलतीचा हाच निर्णय देशात क्रांतिकारी ठरला. त्यांचे साहित्य युवकांनी वाचणे गरजेचे आहे. त्याशिवाय राज्याला पुढे नेणारी तरुण पिढी निर्माण होणार नाही. पी. टी. मोरे यांनी स्वागत केले. एन. जे. पोटे यांनी आभार मानले. भारती साळुंखे व शीतल कुंभार यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सरपंच रेखा महिंद, उपसरपंच भानुदास शिरतोडे, दिनकर पवार, बापूसाहेब मोरे, महादेव महिंद, सचिव संजय मोरे, आत्माराम ठोंबरे उपस्थित होते. (वार्ताहर)
यशवंतरावांचे साहित्य माणूस घडवते : कदम
By admin | Updated: November 27, 2014 00:21 IST