शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
2
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
3
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
4
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
5
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
6
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
7
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
8
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
9
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
10
"मोठी किंमत चुकवावी लागेल माहितीये, पण..."; पंतप्रधान मोदींचे डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बवर थेट उत्तर
11
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
12
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
13
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी
14
Video: भाषिक वादावरून उद्धव ठाकरे दिल्लीत कडाडले; राज ठाकरेंसोबतच्या युतीवरही स्पष्टच बोलले
15
ट्रम्प टॅरिफमुळे 'या' क्षेत्राला होणार ₹२४,००० कोटींचं नुकसान; या कंपन्यांचे शेअर्स क्रॅश, तुमच्याकडे आहेत का?
16
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
17
चाळीशी ओलांडल्यावर 'या' गोष्टी सोडा, शंभर वर्षं जगाल; सांगताहेत तरुण सागर महाराज!
18
नवरा गंगास्नानासाठी गेला, बायकोने १५ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारून बॉयफ्रेंडसह पळ काढला
19
ठरलेलं लग्न मोडलेला तरुण 'सैयारा' चित्रपट बघायला गेला, घरी परतला अन्...; संपूर्ण गावाला बसला मोठा धक्का!
20
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत वर्षाला फक्त १.५ लाख गुंतवून मिळवा ७० लाख रुपये, संपूर्ण रक्कम टॅक्स फ्री

जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:44 IST

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव ...

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी गौरव केला. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी शिराळा, आटपाडी पंचायत समितीसही बक्षीस देण्यात आले.मुंबईतील रवींद्र नाट्यगृृहात यशवंत पंचायत राज अभियानाचे बक्षीस वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते झाले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. यशवंत पंचायत राजमध्ये जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. शिराळा पंचायत समितीने राज्यपातळीवर, तर आटपाडी पंचायत समितीने पुणे विभागात प्रत्येकी तिसरा कमांक मिळविल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.राज्यातील पंचायत राज संस्था या राज्याच्या ग्रामीण, निमशहरी, शहरी भागाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. राज्यात शासनाच्या अनेक विकास योजना या पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविल्या जात आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.स्वच्छ भारत अभियानात सांगली जिल्हा परिषदेस १२ पैकी १२, तर सामान्य प्रशासन विभागास ११ गुण मिळाले आहेत. एकूण १०० गुणांपैकी जिल्हा परिषदेस ८१ गुण मिळाले. अध्यक्ष देशमुख यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यापासून कामाला गती दिली. कोणतेही चुकीचे अथवा वादगस्त काम होणार नाही, याकडे लक्ष दिले. दिव्यांग अभियानासारख्या राज्यासमोर आदर्श ठरलेल्या नावीन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या.यावेळी सभापती डॉ. सुषमा नायकवडी, तम्मणगौडा रवी-पाटील, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे, शिराळा पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंह नाईक, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बी. के. नायकवडी, वैशाली माने, आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती तानाजी यमगर, गटविकास अधिकारी मीनाक्षी साळुंखे यांच्यासह खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे स्थान बळकट : देशमुखराज्यात मिळालेल्या पहिल्या स्थानामुळे जिल्हा परिषदेचे स्थान आणखीनच बळकट होऊन पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाºयांचा आत्मविश्वास आणखीनच बळावल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. दिव्यांग अभियान राज्यासमोर आदर्श नावीन्यपूर्ण योजना ठरली. स्वच्छ भारत अभियानामध्ये तर जिल्हा परिषदेने जोरदार काम केल्याने यश मिळाले.