शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
2
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
3
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
4
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
5
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
6
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
7
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
8
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
9
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
10
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
11
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...
12
"या हॉटेलवर डॉक्टर तरुणीला का बोलावलं होतं?"; सुषमा अंधारे रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे नाव घेत काय म्हणाल्या?
13
"फलटणच्या घटनेत माजी खासदाराला मुख्यमंत्र्यांकडून क्लिन चिट म्हणजे कटात सहभाग असल्याचा पुरावाच’’, काँग्रेसचा आरोप 
14
Orkla India IPO च्या जीएमपीमध्ये मोठी तेजी; 'या' तारखेपासून लावू शकणार बोली, केव्हा होणार लिस्टिंग?
15
वादग्रस्त इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईकसाठी बांगलादेशात 'पायघड्या'; भारतात आहे MOST WANTED
16
ढासू परतावा...! ₹100 पेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, 5 वर्षांती दिला 6455% परतावा; आता रेल्वेकडून मिळाली मोठी ऑर्डर
17
Mumbai Pune Mumbai 4: स्वप्नील-मुक्ताची जोडी पुन्हा एकत्र, 'मुंबई पुणे मुंबई ४'ची घोषणा, बघा व्हिडीओ
18
श्रेयस अय्यरला झालेली दुखापत किती गंभीर, आता कशी आहे प्रकृती? बीसीसीआयने दिली महत्त्वाची माहिती
19
युक्रेनचा रशियावर मोठा ड्रोन हल्ला! १९३ ड्रोनमधून गोळीबार, मॉस्कोतील दोन विमानतळ बंद
20
Mid-Size SUV: २० लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये घरी आणा 'या' ५ जबरदस्त मिड- साइज एसयूव्ही कार!

जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:44 IST

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव ...

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी गौरव केला. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी शिराळा, आटपाडी पंचायत समितीसही बक्षीस देण्यात आले.मुंबईतील रवींद्र नाट्यगृृहात यशवंत पंचायत राज अभियानाचे बक्षीस वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते झाले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. यशवंत पंचायत राजमध्ये जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. शिराळा पंचायत समितीने राज्यपातळीवर, तर आटपाडी पंचायत समितीने पुणे विभागात प्रत्येकी तिसरा कमांक मिळविल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.राज्यातील पंचायत राज संस्था या राज्याच्या ग्रामीण, निमशहरी, शहरी भागाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. राज्यात शासनाच्या अनेक विकास योजना या पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविल्या जात आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.स्वच्छ भारत अभियानात सांगली जिल्हा परिषदेस १२ पैकी १२, तर सामान्य प्रशासन विभागास ११ गुण मिळाले आहेत. एकूण १०० गुणांपैकी जिल्हा परिषदेस ८१ गुण मिळाले. अध्यक्ष देशमुख यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यापासून कामाला गती दिली. कोणतेही चुकीचे अथवा वादगस्त काम होणार नाही, याकडे लक्ष दिले. दिव्यांग अभियानासारख्या राज्यासमोर आदर्श ठरलेल्या नावीन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या.यावेळी सभापती डॉ. सुषमा नायकवडी, तम्मणगौडा रवी-पाटील, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे, शिराळा पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंह नाईक, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बी. के. नायकवडी, वैशाली माने, आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती तानाजी यमगर, गटविकास अधिकारी मीनाक्षी साळुंखे यांच्यासह खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे स्थान बळकट : देशमुखराज्यात मिळालेल्या पहिल्या स्थानामुळे जिल्हा परिषदेचे स्थान आणखीनच बळकट होऊन पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाºयांचा आत्मविश्वास आणखीनच बळावल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. दिव्यांग अभियान राज्यासमोर आदर्श नावीन्यपूर्ण योजना ठरली. स्वच्छ भारत अभियानामध्ये तर जिल्हा परिषदेने जोरदार काम केल्याने यश मिळाले.