शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेस यशवंत पंचायत राज पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 23:44 IST

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव ...

मुंबई : यशवंत पंचायत राज अभियान २०१६-१७ मध्ये राज्यात पहिला क्रमांक मिळविल्याबद्दल मुंबईत जिल्हा परिषदेचा राज्यपाल सी. विद्यासागर राव आणि ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी शुक्रवारी गौरव केला. अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपाध्यक्ष सुहास बाबर, माजी अध्यक्षा स्नेहल पाटील, उपाध्यक्ष रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी शिराळा, आटपाडी पंचायत समितीसही बक्षीस देण्यात आले.मुंबईतील रवींद्र नाट्यगृृहात यशवंत पंचायत राज अभियानाचे बक्षीस वितरण राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्याहस्ते झाले. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे अध्यक्षस्थानी होत्या. यशवंत पंचायत राजमध्ये जिल्हा परिषदेने राज्यात पहिला क्रमांक मिळवला आहे. शिराळा पंचायत समितीने राज्यपातळीवर, तर आटपाडी पंचायत समितीने पुणे विभागात प्रत्येकी तिसरा कमांक मिळविल्याबद्दल त्यांचाही गौरव करण्यात आला.राज्यातील पंचायत राज संस्था या राज्याच्या ग्रामीण, निमशहरी, शहरी भागाच्या विकासात महत्वपूर्ण योगदान देत आहेत. राज्यात शासनाच्या अनेक विकास योजना या पंचायत राज संस्थांच्या माध्यमातून प्रभावीपणे राबविल्या जात आहेत, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी काढले.स्वच्छ भारत अभियानात सांगली जिल्हा परिषदेस १२ पैकी १२, तर सामान्य प्रशासन विभागास ११ गुण मिळाले आहेत. एकूण १०० गुणांपैकी जिल्हा परिषदेस ८१ गुण मिळाले. अध्यक्ष देशमुख यांनी जिल्हा परिषदेची सूत्रे हाती घेतल्यापासून कामाला गती दिली. कोणतेही चुकीचे अथवा वादगस्त काम होणार नाही, याकडे लक्ष दिले. दिव्यांग अभियानासारख्या राज्यासमोर आदर्श ठरलेल्या नावीन्यपूर्ण योजना राबवण्यात आल्या.यावेळी सभापती डॉ. सुषमा नायकवडी, तम्मणगौडा रवी-पाटील, अरुण राजमाने, ब्रम्हदेव पडळकर, अतिरिक्त सीईओ विक्रांत बगाडे, शिराळा पंचायत समिती सभापती मायावती कांबळे, उपसभापती सम्राटसिंह नाईक, गटविकास अधिकारी डॉ. अनिल बागल, बी. के. नायकवडी, वैशाली माने, आटपाडी पंचायत समितीचे सभापती हर्षवर्धन देशमुख, उपसभापती तानाजी यमगर, गटविकास अधिकारी मीनाक्षी साळुंखे यांच्यासह खातेप्रमुख आणि गटविकास अधिकारी उपस्थित होते.जिल्हा परिषदेचे स्थान बळकट : देशमुखराज्यात मिळालेल्या पहिल्या स्थानामुळे जिल्हा परिषदेचे स्थान आणखीनच बळकट होऊन पदाधिकारी, अधिकारी आणि कर्मचाºयांचा आत्मविश्वास आणखीनच बळावल्याचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी केली. दिव्यांग अभियान राज्यासमोर आदर्श नावीन्यपूर्ण योजना ठरली. स्वच्छ भारत अभियानामध्ये तर जिल्हा परिषदेने जोरदार काम केल्याने यश मिळाले.