शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
2
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
3
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
4
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
5
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
6
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
7
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे
8
Video - अरे बापरे! टँकर पलटताच तेल लुटण्यासाठी बादल्या, कॅन घेऊन लोकांची झुंबड
9
ऐकलंत का? अंतराळात तयार करणार वीज अन् तारेशिवाय थेट जमिनीवर आणली जाणार
10
नाशिक: पोलिसांच्या हाताला झटका देऊन पळालेला क्रिश सापडला, कुठे बसला होता लपून?
11
कोण आहे 'तो' चोर? ज्याचं सर्वच करताहेत भरभरून कौतुक; कोट्यवधी रुपये चोरले अन्...
12
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
13
कर्मचाऱ्याचे पीएफ ट्रान्सफर होणार कंपनीच्या मंजुरीविना, नोकरी बदलताना प्रक्रिया होणार सुलभ
14
Matheesha Pathirana: 'त्याला लवकरात लवकर श्रीलंकेला पाठवा' पंजाबविरुद्धच्या पराभवानंतर मथिशा पाथिराना होतोय ट्रोल
15
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
16
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
17
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
18
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
19
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
20
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस

कुरळप आश्रमशाळा नोंदवहीत केल्या चुकीच्या नोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 23:06 IST

कुरळप : समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार कुरळप आश्रमशाळेस भेट देऊनसुध्दा, शाळेतील विविध सोयी-सुविधांचा अभाव व दिवसेंदिवस शाळेत चालणाºया गैरकारभाराकडे ...

कुरळप : समाजकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार कुरळप आश्रमशाळेस भेट देऊनसुध्दा, शाळेतील विविध सोयी-सुविधांचा अभाव व दिवसेंदिवस शाळेत चालणाºया गैरकारभाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन शेरेबुकात वस्तुस्थितीची नोंद न केल्यानेच येथे लैंगिक अत्याचाराचा प्रकार घडल्याची खंत पुणे येथे झालेल्या बैठकीत तपास अधिकाºयांनी व्यक्त केली.वीस दिवसांपूर्वी कुरळप आश्रमशाळेत घडलेल्या विद्यार्थिनींच्या लैंगिक अत्याचारप्रकरणी राज्य शासनाने गंभीर दखल घेतली आहे. यासंदर्भात पुणे येथे महिला व बालकल्याण आयुक्तालयात तपास अधिकाºयांची बैठक पार पडली. यामध्ये आश्रमशाळेस वेळोवेळी भेट देणाºया अधिकाºयांना अनेक समस्या लक्षात येऊनही त्यांनी शेरेबुकात वस्तुस्थितीची नोंद न करताच शाळेस सर्व सोयी-सुविधा योग्य असल्याच्या नोंदी केल्याचे अधिकाºयांच्या चौकशीत निष्पन्न झाले. अशा अधिकाºयांना तपास अधिकाºयांनी फैलावर घेत त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली.शाळेस दिलेल्या प्रत्येक भेटीवेळी अनेक दोष आढळूनसुध्दा त्यावर काय कारवाई केली? प्रत्यक्षात विद्यार्थी संख्या व रजिस्टरवर दाखविलेली संख्या यामध्ये तफावत असूनही, या अधिकाºयांनी याची दखल का घेतली नाही? अशा विविध बाबींवर तपास अधिकाºयांनी सवाल उपस्थित केला. नियमानुसार कोणत्याही सुविधा नसताना चांगला शेरा देण्यामागे संबंधित अधिकाºयांची भूमिका कोणती, यावर बैठकीत चर्चा झाली. तसेच संबंधित दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला.लैंगिक अत्याचारप्रकरणी समाजकल्याणच्या अधिकाºयांनी संस्थापक अरविंद पवारला सहकार्य केले काय? याची चौकशी करण्याचे सुचविण्यात आले. सध्या ९४ मुली व २२६ मुले वसतिगृहात शिक्षण घेत असल्याचे दाखविण्यात आले आहे. मात्र वस्तुस्थिती वेगळीच आहे. अनिवासी विद्यार्थ्यांना निवासी दाखवून शासनाची फसवणूक करण्यात आली आहे. तसेच चुकीच्या आकडेवारीने आर्थिक लुबाडणूकही केल्याचे पुढे येऊ लागले आहे.या बैठकीस बालहक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, श्रीमती सीमा व्यास, विजय जाधव, डॉ. शालिनी कराड, संचालक एस. ए. अहिरे उपस्थित होते.महत्त्वाच्या बाबींवर बैठकीत चर्चालैंगिक अत्याचार प्रकरणाच्या तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर याही बैठकीस उपस्थित होत्या. त्यांच्याकडूनही तपासाबाबत अनेक महत्त्वाच्या बाबी समितीपुढे मांडण्यात आल्या. तपास समितीच्या म्हणण्यानुसार, दोषींचे निलंबन झाले, तर राज्यातील अनेक आश्रमशाळांना गैरकृत्याच्या कारवाईचा संदेश जाईल आणि आश्रमशाळेविषयी विद्यार्थी व पालक वर्गाचा शिक्षण व सुविधा, सुरक्षितता यावर विश्वास बसेल, असेही मत व्यक्त करण्यात आले.