शहरं
Join us  
Trending Stories
1
भर उन्हाळ्यात दिल्ली पाण्यात बुडाली; पावसाचा कहर, जागोजागी पाणी तुंबले
2
मान्सूनची घाई, वेळेआधीच केरळ गाठले; राज्यात २ दिवसांत; २००९ नंतर प्रथमच आठवडाभर आधी आगमन
3
आजचे राशीभविष्य २५ मे २०२५ : धन- संपत्ति, मान - सन्मानाची प्राप्ती
4
केंद्र अन् राज्यांनी ‘टीम इंडिया’प्रमाणे काम केल्यास काहीही अशक्य नाही; PM मोदी यांचे आवाहन
5
काळजी नको, सगळे सुरळीत होईल; राहुल गांधींचा दिलासा, सीमाभागातील मृतांच्या कुटुंबांचे सांत्वन
6
५ वर्षांत एक ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्थेचे लक्ष्य; 'महाराष्ट्राचेही व्हिजन २०४७': CM फडणवीस
7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आग्रही; पण विधिमंडळाच्या नीतिमूल्य समितीची अद्याप प्रतीक्षाच
8
मुंबई, पुणे, नागपूरसह ७ जिल्ह्यांतून ५४ टक्के उत्पन्न; विकासाच्या प्रादेशिक असंतुलनावर बोट
9
हगवणेंकडून पिस्तुले, चांदीची भांडी, कार जप्त; CM फडणवीस, DCM शिंदेंकडून कुटुंबाचे सांत्वन
10
संततधारेने पिकांना मोठा फटका; बळीराजा संकटात, अनेक जिल्ह्यांत मुसळधार पावसाची शक्यता
11
ॲपलला भारतात जायचे असेल तर जावे, पण अमेरिकेत फोनवर कर लागणारच; ट्रम्प यांचा धमकीवजा इशारा
12
कीव्ह शहरावर रशियाचे ड्रोन, क्षेपणास्त्र हल्ले; १५ जखमी, ओबोलोन जिल्ह्याचे सर्वाधिक नुकसान
13
रुग्णासाठी चॅटजीपीटी बनले वकील, बिनतोड युक्तिवादाने मिळवून दिला २ लाखांचा रिफंड
14
पनवेल-सोमटणे, पनवेल-चिखली नवीन कॉर्ड लाइन; राहुरी-शनी शिंगणापूर नव्या रेल्वे मार्गास मान्यता
15
‘फिरत्या पम्पिंग स्टेशन’मुळे पाण्याचा लवकर निचरा; ४ वर्षांसाठी भाडेतत्त्वावर, ८ कोटी खर्च
16
‘विरार-अलिबाग’ विलंबाचा दिल्ली एक्स्प्रेसवेला फटका; ठाण्यात होणार अवजड वाहनांमुळे कोंडी
17
PBKS vs DC : दिल्लीकर समीरची मॅच विनिंग फिफ्टी; पंजाबचं टेन्शन वाढलं! Qualifier 1 च्या शर्यतीत नवं ट्विस्ट
18
Vaishnavi Hagawane: वैष्णवीच्या बाळाला एकनाथ शिंदेंनी घेतलं जवळ, आईवडिलांना दिला धीर; काय घडलं?
19
IPL 2025 Qualifier 1 Race : आता MI चे कट्टर चाहतेही करतील CSK ला चीअर; कारण...
20
हे वागणं बरं नव्हं... खासदारांनी नाराजीचा सूर आळवत रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना धरले धारेवर 

‘त्या’ पैलवानाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गरिबीच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचे, खाकी वर्दी अंगावर मिरवित सेवा करण्याचे आणि समाजात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गरिबीच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचे, खाकी वर्दी अंगावर मिरवित सेवा करण्याचे आणि समाजात मानाने जगण्याचे स्वप्न घेऊन कर्करोगाशी झुंजणारा सांगलीतील पैलवान अविनाश हजारेची लढत अखेर त्याच्या अखेरच्या श्वासाला थांबली.

गरिबीच्या अंध:कारात चाचपडत असतानाच लहानपणीच त्याचे पितृछत्र हरपले. मोठ्या भावाला अपंगत्व आले आणि घरच्या जबाबदारीचे मोठेसे गाठोडे डोईवर घेऊन त्याची धडपड सुरू होती. गरिबीने दिलेला त्रास सोसताना त्याला कर्करोगाने गाठले.

सांगलीच्या अहिल्यानगर येथे राहणाऱ्या अविनाश राजू हजारे या तरुणाची ही कहाणी समाजातील माणुसकीचे रितेपण स्पष्टपणे दाखवून देणारी आहे. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्याने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तो व्यायाम शाळेत, क्रीडांगणावर कसरत करीत राहिला. पहिल्याच प्रयत्नात तो थोड्याच गुणांनी पोलीस भरतीत अनुत्तीर्ण झाला होता. तरीही त्याचे कष्ट सुरूच होते. मात्र, त्याला गरिबीपाठोपाठ कर्करोगानेही ग्रासले.

हॉजकिन लिम्फोमा या विचित्र कर्करोगाने त्याला ग्रासले होते. निदान झाल्यानंतर त्याने लगेचच महात्मा फुले आरोग्य योजनेतून किमोथेरपीचे उपचार घेतले. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने हार्ड थेरपीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत घेतली. मात्र, ही मदत तुटपुंजी ठरली. त्यात त्याचे पूर्ण उपचार होऊ शकले नाहीत. त्याचा आजार ९० टक्क्यांपर्यंत बरा झाला होता. तरी त्याला भविष्यात कधीही याचा सामना करावा लागू नये, म्हणून डॉक्टरांनी त्यास बोनमॅरो ट्रान्स्प्लांटचा (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) सल्ला दिला होता. त्यासाठी त्याला ६ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. शासकीय योजनांचा लाभ घेतल्यामुळे त्याला मदतीचे दरवाजे बंद झाले होते. शस्त्रक्रियेसाठी इतके पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न त्याला सतावत होता. दुसरीकडे डॉक्टरांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत तातडीने ही शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. अखेर प्रयत्नांची शिकस्त करून थकल्यानंतर अविनाशने अखेरचा श्वास घेतला. समाजाचे मदतीचे हात किती रिते आहेत, याची प्रचिती या घटनेने आली.

चौकट

कुटुंबावर मोठे संकट

अविनाशचा भाऊ हमाली करतो, तर आई एमआयडीसीमध्ये कामाला जाते. अविनाश त्यांच्यासाठी एकमेव आधार होता. तो कर्करोगातून बरा होऊन कुटुंबाला आधार देईल, असे कुटुंबीयांनी उराशी बाळगलेले स्वप्नही अविनाशच्या जाण्याने विरले.