शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
3
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
4
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
5
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
6
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
7
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
8
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
9
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
10
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
11
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
12
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
13
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
14
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
15
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
16
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
17
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
18
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
19
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
20
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब

‘त्या’ पैलवानाची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : गरिबीच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचे, खाकी वर्दी अंगावर मिरवित सेवा करण्याचे आणि समाजात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : गरिबीच्या खाईत लोटलेल्या कुटुंबाला बाहेर काढण्याचे, खाकी वर्दी अंगावर मिरवित सेवा करण्याचे आणि समाजात मानाने जगण्याचे स्वप्न घेऊन कर्करोगाशी झुंजणारा सांगलीतील पैलवान अविनाश हजारेची लढत अखेर त्याच्या अखेरच्या श्वासाला थांबली.

गरिबीच्या अंध:कारात चाचपडत असतानाच लहानपणीच त्याचे पितृछत्र हरपले. मोठ्या भावाला अपंगत्व आले आणि घरच्या जबाबदारीचे मोठेसे गाठोडे डोईवर घेऊन त्याची धडपड सुरू होती. गरिबीने दिलेला त्रास सोसताना त्याला कर्करोगाने गाठले.

सांगलीच्या अहिल्यानगर येथे राहणाऱ्या अविनाश राजू हजारे या तरुणाची ही कहाणी समाजातील माणुसकीचे रितेपण स्पष्टपणे दाखवून देणारी आहे. गरिबीतून बाहेर पडण्यासाठी त्याने कला शाखेतील पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. पोलीस भरतीचे स्वप्न उराशी बाळगून तो व्यायाम शाळेत, क्रीडांगणावर कसरत करीत राहिला. पहिल्याच प्रयत्नात तो थोड्याच गुणांनी पोलीस भरतीत अनुत्तीर्ण झाला होता. तरीही त्याचे कष्ट सुरूच होते. मात्र, त्याला गरिबीपाठोपाठ कर्करोगानेही ग्रासले.

हॉजकिन लिम्फोमा या विचित्र कर्करोगाने त्याला ग्रासले होते. निदान झाल्यानंतर त्याने लगेचच महात्मा फुले आरोग्य योजनेतून किमोथेरपीचे उपचार घेतले. त्यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात त्याने हार्ड थेरपीसाठी मुख्यमंत्री साहाय्यता निधीतून मदत घेतली. मात्र, ही मदत तुटपुंजी ठरली. त्यात त्याचे पूर्ण उपचार होऊ शकले नाहीत. त्याचा आजार ९० टक्क्यांपर्यंत बरा झाला होता. तरी त्याला भविष्यात कधीही याचा सामना करावा लागू नये, म्हणून डॉक्टरांनी त्यास बोनमॅरो ट्रान्स्प्लांटचा (अस्थिमज्जा प्रत्यारोपण) सल्ला दिला होता. त्यासाठी त्याला ६ लाख रुपयांचा खर्च सांगितला होता. शासकीय योजनांचा लाभ घेतल्यामुळे त्याला मदतीचे दरवाजे बंद झाले होते. शस्त्रक्रियेसाठी इतके पैसे आणायचे कोठून, असा प्रश्न त्याला सतावत होता. दुसरीकडे डॉक्टरांनी त्याला कोणत्याही परिस्थितीत तातडीने ही शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. अखेर प्रयत्नांची शिकस्त करून थकल्यानंतर अविनाशने अखेरचा श्वास घेतला. समाजाचे मदतीचे हात किती रिते आहेत, याची प्रचिती या घटनेने आली.

चौकट

कुटुंबावर मोठे संकट

अविनाशचा भाऊ हमाली करतो, तर आई एमआयडीसीमध्ये कामाला जाते. अविनाश त्यांच्यासाठी एकमेव आधार होता. तो कर्करोगातून बरा होऊन कुटुंबाला आधार देईल, असे कुटुंबीयांनी उराशी बाळगलेले स्वप्नही अविनाशच्या जाण्याने विरले.