शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

कष्टकरी जनतेकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 23:22 IST

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...कामगार नेते विकास मगदूम यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूकचळवळीतील कार्यकर्ते म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?निवडणुकांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. कोणताही पक्ष असला तरी त्यांना विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती बांधणे एवढाच वाटत आहे. याउलट जीवनमान उंचाविण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. देशात ४२ कोटींच्या वर असणाऱ्या कष्टकरी जनतेकडे कोणी लक्ष देत नाही. समाजातील आवश्यक प्रश्न बाजूला पडले आहेत.लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?सकल राष्टÑीय उत्पादनात ६५ टक्के योगदान असणाºया कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा मिळत नाही. काम करत आहे तोवरच तुटपुंजे उत्पन्न. मात्र, थकल्यानंतर त्यांच्या अन्न, औषधांचीही आबाळ होताना दिसते. संविधानानुसार जसे सन्मानाने जगता आले पाहिजे, तसेच सन्मानाने मरणही आले पाहिजे. असा दिलासा देणारा मुद्दा कोणीही विचारात घेत नाही. शेतकऱ्यांनाही केवळ कर्जमाफी न देता त्यांना वेळेवर पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून दिल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही.तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?स्वातंत्र्यापासूनच कामगारवर्ग आपल्या हक्कासाठी लढत आहे. १९९१ च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, प्रशासकीय वर्ग सोडला, तर चळवळीला भवितव्य उरलेले नाही. अनेक कामगारांना साप्ताहिक सुटी नाही, १३ ते १४ तास काम करावे लागते. विशेष म्हणजे देशात संख्येने बहुसंख्य असलेल्या कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. त्यांनी कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवे.नवीन मतदारांनाकाय आवाहन कराल?नवमतदारांनी आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यास पुढे यावे. राजकीय व्यवस्थेविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी पाच वर्षांतून एकदा संधी मिळते. ही संधी तरूणांनी वाया घालवू नये.