शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
'मै हूँ ना'मध्ये असती 'ही' अभिनेत्री, शूटिंगच्या दोन आठवड्यांपूर्वी सोडलेला सिनेमा; फराह खानचा खुलासा
7
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
8
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
9
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
10
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
11
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
12
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
13
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
14
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
15
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
16
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
17
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
18
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
19
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
20
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू

कारभाऱ्यांनो, भविष्याचा वेध घेऊन विकास करा

By admin | Updated: March 17, 2017 23:38 IST

इंद्रजित देशमुख : सांगलीत ‘आदर्श ग्रामपंचायत’, ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार प्रदान सोहळा उत्साहात

सांगली : गावांचा विकास करताना आपण पर्यावरणाचा ऱ्हास करत सुटलो आहोत. हे पुढे असेच चालू राहिले, तर श्वास घेण्यासाठी हवा चांगली नसेल, पिण्याच्या पाण्यावर लष्कर तैनात करावे लागेल. स्मार्ट गावामध्ये मूलभूत सुविधा देताना, निसर्गाचा ऱ्हास होणार नाही, याकडे आपण लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी कारभाऱ्यांनो, भविष्याचा वेध घेऊन गावांचा विकास करा, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंद्रजित देशमुख यांनी केले. सांगलीतील भावे नाट्य मंदिरात शुक्रवारी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागातर्फे ‘आदर्श ग्रामपंचायत’, ‘स्मार्ट ग्राम’ पुरस्कार प्रदान समारंभात डॉ. देशमुख बोलत होते. अध्यक्षस्थानी स्नेहल पाटील होत्या. डॉ. देशमुख म्हणाले की, ज्या गावाची गावकी आणि भावकी व्यवस्थित असते, ते गाव चांगले असते. गावाची जीवनमूल्ये तितक्याच ताकदीने विकसित होणे गरजेचे आहे. फक्त भौतिक सुविधा महत्त्वाच्या नाहीत. जीवनमूल्ये, कायदा सुव्यवस्थाही चांगली हवी. गावांचा विकास करताना, संवेदना नसल्या तरी, किमान पुढच्या पिढीला जगण्यासाठी काही शिल्लक राहील, असे गाव, असा समाज आपण तयार करणे गरजेचे आहे. भविष्यातील पिढीसाठी जगण्याच्या लायकीचे काम आपल्याला निर्माण करायचे आहे. त्याबाबतची जबाबदारी गावाच्या कारभाऱ्यांसोबत प्रत्येक ग्रामस्थांची असल्याची जाणीव हवी.स्नेहल पाटील म्हणाल्या की, गावासाठी पदाधिकाऱ्यांसह सर्वांनी योगदान दिल्यास गावाचा चेहरा बदलणे अशक्य नाही, हे या पुरस्कारप्राप्त गावांनी दाखवून दिले. या ग्रामपंचायतीचा आदर्श जिल्ह्यातील इतर ग्रामपंचायती घेतील, अशी अपेक्षा आहे. मुलींच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी ग्रामपंचायतींनी विशेष योगदान द्यावे, ही आपली नैतिक जबाबदारी आहे.उपाध्यक्ष रणजित पाटील यांनी, आदर्श ग्रामपंचायतींनी केलेल्या कामगिरीचे कौतुक केले. रणधीर नाईक यांनी, निधीचे नियोजन केल्यास गाव आदर्श बनविण्यात अडचण नसल्याचे स्पष्ट केले. छायाताई खरमाटे म्हणाल्या, ज्या गावांत मुलींचा जन्मदर वाढला आहे, त्यांचा जिल्हा परिषदेने गौरव केला पाहिजे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले की, यमाजी पाटलाचीवाडी या गावात २००३ पासून शोषखड्डे वापरले जातात. गावात गटारी नाहीत. त्यामुळे पाण्याची पातळी वाढलेली दिसते. डासांचे प्रमाणही नगण्य आहे. या गावाचा आदर्श प्रत्येकाने घ्यावा. यावेळी उपाध्यक्ष रणजित पाटील, सभापती भाऊसाहेब पाटील, जि. प. सदस्य भीमराव माने, रणधीर नाईक, तानाजी यमगर, प्रकाश कांबळे, शरद लाड, काकासाहेब धामणे, संयोगिता कोळी, छायाताई खरमाटे, संपतराव पवार, माजी सदस्या छायाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसूळ आदी उपस्थित होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी आडसूळ यांनी प्रास्ताविक केले. कवठेपिरान, कामेरी आणि भाटवाडी या तीन ग्रामपंचायतींना संयुक्तपणे यावेळी जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार देण्यात आला. (प्रतिनिधी)