शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

रेल्वे यार्डात पाईपलाईनचे काम सुरू

By admin | Updated: April 8, 2016 00:23 IST

लातूरला पाणीपुरवठा : एका आठवड्यात यंत्रणा कार्यान्वित होण्याची चिन्हे

मिरज : मिरजेतून लातूरला पाणी पुरवठ्यासाठी मिरजेचे प्रांताधिकारी व तहसीलदार नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत सुमारे १ कोटी १० लाख खर्चून रेल्वेच्या जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत पाईपलाईनचे काम सुरू करण्यात येणार आहे. एका आठवड्यात लातूरला पाणी पुरवठा सुरू होईल, अशी माहिती जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. मिरजेतून लातूरला रेल्वे पाणी पुरवठ्यासाठी प्रत्येकी ५० हजार लिटर क्षमतेचे ५० टँकर राजस्थानातील कोटा येथून मिरजेला येत आहेत. हे टँकर भरण्यासाठी मिरज रेल्वे स्थानकाजवळील जलशुध्दीकरण केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत ५० अश्वशक्तीचा पंप बसविण्यात येणार आहे. सुमारे ८० लाख रूपये खर्चून जलशुध्दीकरण केंद्रापासून रेल्वे यार्डापर्यंत आठ इंच व्यासाची अडीच किलोमीटर लांब नवीन पाईपलाईन बसविण्यात येणार आहे. या पाईपमधून एकावेळी २५ टँकर भरण्याची व्यवस्था होणार असून ५० टँकर भरण्यासाठी दहा तास लागणार असल्याने एक दिवसाआड २५ लाख लिटर पाणी घेऊन रेल्वे लातूरला जाणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. टँकर भरण्यासाठी रेल्वे व जीवन प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मिरजेचे प्रांताधिकारी सुभाष बोरकर व तहसीलदार किशोर घाडगे नियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. जूनपर्यंत तीन महिने रेल्वे टँकरने पाणी पुरवठा सुरू ठेवण्याची व्यवस्था होणार आहे. लातूर येथे रेल्वेस्थानकाजवळ मोठ्या टाक्यांत पाणी सोडण्यात येणार असून, तेथून शुध्दीकरण केंद्रात नेण्यात येईल. मिरजेतील रेल्वे जलशुध्दीकरण केंद्रापासून पाईपलाईनचे काम उद्यापासून सुरू होणार असून, त्यासाठी रेल्वे मार्गाखालून पाईप नेण्याची परवानगी रेल्वे प्रशासनाने दिली आहे. (वार्ताहर) रेल्वे पोलिसांकडून बंदोबस्ताची तयारीलातूरला रेल्वेने पाणी पुरवठा रोखण्याचा इशारा काँग्रेस व राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी दिल्याने रेल्वे पोलिसांनी जादा बंदोबस्ताची तयारी केली आहे. रेल्वे टँकर रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे रेल्वे पोलिस ठाण्याचे निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी सांगितले. लातूरला पाणी पुरवठा करणाऱ्या रेल्वे टँकरना रेल्वे पोलिस व सुरक्षा दलाचा बंदोबस्त देण्यात येणार आहे.