शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
3
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
4
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
5
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
6
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
7
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
8
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
9
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
10
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
11
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
12
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
13
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
14
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
15
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
16
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
18
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
19
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
20
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्याध्यापकांचे काळ्या फिती लावून काम

By admin | Updated: January 8, 2015 00:06 IST

केंद्र शासनाच्या आऱ टी़ ई़ कायद्याची राज्य सरकारने शंभर टक्के अंमलबजावणी केली आहे़

सांगली : राज्याने केंद्राच्या धर्तीवर जसाच्या तसा आर.टी. ई. कायदा राबविल्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची टीका करत हा कायदा त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी आज (मंगळवारी) काळ्या फिती लावून आंदोलन केले़ मागण्या मान्य होईपर्यंत शासकीय सर्व प्रशिक्षणावर बहिष्कार घालणार असल्याचे शिक्षक परिषदेचे नेते माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी सांगितले़केंद्र शासनाच्या आऱ टी़ ई़ कायद्याची राज्य सरकारने शंभर टक्के अंमलबजावणी केली आहे़ या निर्णयामुळे काही फायदे झाले असले तरी, अनेक तोटेही झाले आहेत़ या निर्णयाविरोधात शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे़ शिक्षक परिषदेचे नेते साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनीही आजपासून आंदोलन सुरू केले आहे़ जिल्ह्यातील ५५० माध्यमिक शाळांपैकी ४५० शाळांमध्ये काळ्या फिती लावून शिक्षक, मुख्याध्यापकांनी काम केले़ बुधवार, दि़ ७ पासून शासनाच्या सर्व प्रशिक्षणावर बहिष्कार घालण्यात येणार आहे़ जोपर्यंत आऱ टी़ ई़ कायद्यात दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले़ ते म्हणाले की, सर्व शैक्षणिक संघटनांना बरोबर घेऊन राज्य सरकारने कर्नाटक, गुजरात राज्याप्रमाणे कायदा दुरूस्त करावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे़ नव्या सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे़ पहिल्या टप्प्यातील आंदोलन संपले आहे़ सरकारने उपाययोजना न केल्यास १३ रोजी सामुदायिक रजा आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यातूनही विचार न झाल्यास २ पासून बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. बजरंग शिंदे, अर्जुन सावंत, बाळासाहेब चोपडे, राजेंद्र नागरगोजे, आर. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास मोहन लाड, बाळासाहेब कणके, अजित चव्हाण सहभागी झाले होते़ (वार्ताहर)