शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

मुख्याध्यापकांचे काळ्या फिती लावून काम

By admin | Updated: January 8, 2015 00:06 IST

केंद्र शासनाच्या आऱ टी़ ई़ कायद्याची राज्य सरकारने शंभर टक्के अंमलबजावणी केली आहे़

सांगली : राज्याने केंद्राच्या धर्तीवर जसाच्या तसा आर.टी. ई. कायदा राबविल्यामुळे हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असल्याची टीका करत हा कायदा त्वरित रद्द करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील मुख्याध्यापक, शिक्षकांनी आज (मंगळवारी) काळ्या फिती लावून आंदोलन केले़ मागण्या मान्य होईपर्यंत शासकीय सर्व प्रशिक्षणावर बहिष्कार घालणार असल्याचे शिक्षक परिषदेचे नेते माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी सांगितले़केंद्र शासनाच्या आऱ टी़ ई़ कायद्याची राज्य सरकारने शंभर टक्के अंमलबजावणी केली आहे़ या निर्णयामुळे काही फायदे झाले असले तरी, अनेक तोटेही झाले आहेत़ या निर्णयाविरोधात शिक्षण संस्थाचालक, मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी आंदोलनाचे रणशिंग फुंकले आहे़ शिक्षक परिषदेचे नेते साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनीही आजपासून आंदोलन सुरू केले आहे़ जिल्ह्यातील ५५० माध्यमिक शाळांपैकी ४५० शाळांमध्ये काळ्या फिती लावून शिक्षक, मुख्याध्यापकांनी काम केले़ बुधवार, दि़ ७ पासून शासनाच्या सर्व प्रशिक्षणावर बहिष्कार घालण्यात येणार आहे़ जोपर्यंत आऱ टी़ ई़ कायद्यात दुरूस्ती होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे साळुंखे यांनी सांगितले़ ते म्हणाले की, सर्व शैक्षणिक संघटनांना बरोबर घेऊन राज्य सरकारने कर्नाटक, गुजरात राज्याप्रमाणे कायदा दुरूस्त करावा, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे़ नव्या सरकारचे मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन सुरू केले आहे़ पहिल्या टप्प्यातील आंदोलन संपले आहे़ सरकारने उपाययोजना न केल्यास १३ रोजी सामुदायिक रजा आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाईल. त्यातूनही विचार न झाल्यास २ पासून बेमुदत शाळा बंद आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला. बजरंग शिंदे, अर्जुन सावंत, बाळासाहेब चोपडे, राजेंद्र नागरगोजे, आर. एस. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. मेळाव्यास मोहन लाड, बाळासाहेब कणके, अजित चव्हाण सहभागी झाले होते़ (वार्ताहर)