शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

वांगीत दूषित पाणीपुरवठ्याविरोधात महिलांचा घागरी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३० महिलांनी मंगळवारी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.

वांगीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गावाला १० दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागली. गळती काढून दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरु झाला. मात्र उत्तरेस असणाऱ्या आडातून निम्म्या गावासाठी छोटी पाणी योजना आहे. आडाचे पाणी आटल्याने योजनेचे लाभार्थी अडचणीत आले आहेत. प्रभाग ३ व ४ तसेच इंदिरानगर, हायस्कूल परिसराला एक दिवसआड १० मिनिटे पाणी पुरवले जाते. या भागाला पाण्याची अन्य व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायतीने नाथाच्या विहिरीचे पाणी नाल्याद्वारे या आडाजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी दूषित असून याचा वास येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. पिण्यासाठी योग्य असलेल्या टाकीचा पाण्याचा पाणी पुरवठा सुरु केल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेतली.

सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी मोर्चातील महिलांना घेऊन जेथे काम थांबले होते, तेथे जाऊन लोकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे ठेकेदारास आदेश दिले. काम तत्काळ सुरु करण्यात आले. जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत महिला कामावर उभ्या होत्या.

या विभागाचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी हायस्कूल परिसर व इंदिरानगरचा पाणीप्रश्न 'जैसे थे' आहे.

यावेळी सरपंच डॉ. विजय होनमाने, काशिनाथ तांदळे, यशवंत कांबळे, विक्रम लांडगे, उत्तम कांबळे, ग्रामविकास अधिकारी विकास सुतार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.