शहरं
Join us  
Trending Stories
1
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-रादजवर खोचक टीका
2
इस्रायलसोबत युद्ध सुरू असताना अचानक ३ इराणी विमाने ओमानमध्ये पोहोचली, नेमकं कारण काय?
3
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
4
कुणी फुकट खाऊ घालत नाही...! आसिम मुनीर-डोनाल्ड ट्रम्प 'लन्च पॉलिटिक्स'नं पाकिस्तानचंच टेन्शन वाढवलं
5
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेवेळी एका टिफिनवाल्याने वाचवला ८० डॉक्टरांचा जीव
6
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
7
Pandharpur Wari 2025: आता स्वस्तात करा विठ्ठलाचे दर्शन; एसटी महामंडळाची खास ऑफर!
8
१ जुलैपासून बदलणार बँकिंगचे नियम, क्रेडिट कार्ड बिल पेमेंटमध्येही होणार बदल; जाणून घ्या माहिती
9
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
10
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
11
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
12
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
13
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
14
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
15
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
16
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
17
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
18
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
19
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
20
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव

वांगीत दूषित पाणीपुरवठ्याविरोधात महिलांचा घागरी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३० महिलांनी मंगळवारी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.

वांगीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गावाला १० दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागली. गळती काढून दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरु झाला. मात्र उत्तरेस असणाऱ्या आडातून निम्म्या गावासाठी छोटी पाणी योजना आहे. आडाचे पाणी आटल्याने योजनेचे लाभार्थी अडचणीत आले आहेत. प्रभाग ३ व ४ तसेच इंदिरानगर, हायस्कूल परिसराला एक दिवसआड १० मिनिटे पाणी पुरवले जाते. या भागाला पाण्याची अन्य व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायतीने नाथाच्या विहिरीचे पाणी नाल्याद्वारे या आडाजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी दूषित असून याचा वास येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. पिण्यासाठी योग्य असलेल्या टाकीचा पाण्याचा पाणी पुरवठा सुरु केल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेतली.

सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी मोर्चातील महिलांना घेऊन जेथे काम थांबले होते, तेथे जाऊन लोकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे ठेकेदारास आदेश दिले. काम तत्काळ सुरु करण्यात आले. जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत महिला कामावर उभ्या होत्या.

या विभागाचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी हायस्कूल परिसर व इंदिरानगरचा पाणीप्रश्न 'जैसे थे' आहे.

यावेळी सरपंच डॉ. विजय होनमाने, काशिनाथ तांदळे, यशवंत कांबळे, विक्रम लांडगे, उत्तम कांबळे, ग्रामविकास अधिकारी विकास सुतार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.