शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

वांगीत दूषित पाणीपुरवठ्याविरोधात महिलांचा घागरी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३० महिलांनी मंगळवारी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.

वांगीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गावाला १० दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागली. गळती काढून दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरु झाला. मात्र उत्तरेस असणाऱ्या आडातून निम्म्या गावासाठी छोटी पाणी योजना आहे. आडाचे पाणी आटल्याने योजनेचे लाभार्थी अडचणीत आले आहेत. प्रभाग ३ व ४ तसेच इंदिरानगर, हायस्कूल परिसराला एक दिवसआड १० मिनिटे पाणी पुरवले जाते. या भागाला पाण्याची अन्य व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायतीने नाथाच्या विहिरीचे पाणी नाल्याद्वारे या आडाजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी दूषित असून याचा वास येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. पिण्यासाठी योग्य असलेल्या टाकीचा पाण्याचा पाणी पुरवठा सुरु केल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेतली.

सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी मोर्चातील महिलांना घेऊन जेथे काम थांबले होते, तेथे जाऊन लोकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे ठेकेदारास आदेश दिले. काम तत्काळ सुरु करण्यात आले. जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत महिला कामावर उभ्या होत्या.

या विभागाचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी हायस्कूल परिसर व इंदिरानगरचा पाणीप्रश्न 'जैसे थे' आहे.

यावेळी सरपंच डॉ. विजय होनमाने, काशिनाथ तांदळे, यशवंत कांबळे, विक्रम लांडगे, उत्तम कांबळे, ग्रामविकास अधिकारी विकास सुतार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.