शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

वांगीत दूषित पाणीपुरवठ्याविरोधात महिलांचा घागरी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व ...

लोकमत न्यूज नेटवर्क

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे ग्रामपंचायतीकडून पंधरा दिवसांपासून दूषित आणि अत्यंत कमी व अनियमित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे ३० महिलांनी मंगळवारी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला.

वांगीला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला गळती लागल्याने गावाला १० दिवस पाण्यासाठी भटकंती करावी लागली. गळती काढून दोन दिवसांपासून पाणीपुरवठा सुरु झाला. मात्र उत्तरेस असणाऱ्या आडातून निम्म्या गावासाठी छोटी पाणी योजना आहे. आडाचे पाणी आटल्याने योजनेचे लाभार्थी अडचणीत आले आहेत. प्रभाग ३ व ४ तसेच इंदिरानगर, हायस्कूल परिसराला एक दिवसआड १० मिनिटे पाणी पुरवले जाते. या भागाला पाण्याची अन्य व्यवस्था नसल्यामुळे ग्रामपंचायतीने नाथाच्या विहिरीचे पाणी नाल्याद्वारे या आडाजवळ सोडण्यात आले आहे. ते पाणी दूषित असून याचा वास येत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी महिलांचे हाल सुरु झाले आहेत. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी अचानक ग्रामपंचायतीवर घागर मोर्चा काढला. पदाधिकाऱ्यांना धारेवर धरले. पिण्यासाठी योग्य असलेल्या टाकीचा पाण्याचा पाणी पुरवठा सुरु केल्याशिवाय हलणार नाही अशी भूमिका घेतली.

सरपंच डॉ. विजय होनमाने यांनी मोर्चातील महिलांना घेऊन जेथे काम थांबले होते, तेथे जाऊन लोकांना पाणी देण्याची व्यवस्था करण्याचे ठेकेदारास आदेश दिले. काम तत्काळ सुरु करण्यात आले. जलवाहिनीचे काम पूर्ण होईपर्यंत महिला कामावर उभ्या होत्या.

या विभागाचा पाण्याचा प्रश्न सुटला असला तरी हायस्कूल परिसर व इंदिरानगरचा पाणीप्रश्न 'जैसे थे' आहे.

यावेळी सरपंच डॉ. विजय होनमाने, काशिनाथ तांदळे, यशवंत कांबळे, विक्रम लांडगे, उत्तम कांबळे, ग्रामविकास अधिकारी विकास सुतार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.