शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

ग्रामपंचायत निवडणुका महिला सक्षमपणे लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिला काँग्रेस सक्षमपणे लढणार आहे. गावा-गावात मदत केंद्रे उभारून महिला ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायतींच्या निवडणुका महिला काँग्रेस सक्षमपणे लढणार आहे. गावा-गावात मदत केंद्रे उभारून महिला सक्षम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाध्यक्षा ॲड. मनीषा रोटे यांनी सांगितले.

सांगलीत महिला काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक पार पडली, यावेळी ॲड. रोटे बोलत होत्या. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील उपस्थित होत्या. बैठकीत ग्रामपंचायतीच्या निवडणुकीबरोबरच तालुका कार्यकारिणीच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

रोटे म्हणाल्या, महिला काँग्रेसच्यावतीने गावा-गावात मदत केंद्रे उभी करून कॅडर तयार करणे गरजेचे आहे. जिल्ह्यातील १२ मदत केंद्रांचे काम सक्षमपणे सुरू आहे. प्रत्येक गावात मदत केंद्र उभे करून वेगळा आदर्श निर्माण करूया. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये महिलांनी सक्षमपणे सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.

शैलजाभाभी पाटील म्हणाल्या, महिलांनी तळागाळात जाऊन लोकांचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न केला पाहिजे. महिलांना मैत्रीण समजून काम करणे गरजेचे आहे.

यावेळी रंजना माळी, श्वेता बिरनाळे, रोहिणी शिंदे, अंजू तोरण, संजीवनी पवार, राजश्री पाटील, सरोजा पाटील, रुक्मिणी अंबर उपस्थित होत्या.