शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

उदगावात सशस्त्र दरोड्यात महिला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे निवृत्त प्राध्यापकाच्या पत्नीला निर्घृणपणे ठार मारून दरोडेखोरांनी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयांची रोकड अशी आठ लाख रुपयांची लूट केली. अरुणा बाबूराव निकम (वय ५६) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, निवृत्त प्राध्यापक बाबूराव नारायण निकम (६३) हेदेखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कउदगाव : उदगाव (ता. शिरोळ) येथे निवृत्त प्राध्यापकाच्या पत्नीला निर्घृणपणे ठार मारून दरोडेखोरांनी २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने व पन्नास हजार रुपयांची रोकड अशी आठ लाख रुपयांची लूट केली. अरुणा बाबूराव निकम (वय ५६) असे ठार झालेल्या महिलेचे नाव असून, निवृत्त प्राध्यापक बाबूराव नारायण निकम (६३) हेदेखील दरोडेखोरांच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर मिरज मिशन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सोमवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास घटना उघडकीस आली. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.घटनास्थळ व पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, उदगाव-शिरोळ मार्गावर निकम मळा आहे. येथे बाबूराव, बळवंत व बंडू या तिघा भावांचे एकमेका शेजारीच तीन बंगले आहेत. यातील बाबूराव निकम हे चंद्राबाई शेंडुरे ज्युनिअर कॉलेज, हुपरी (ता. हातकणंगले) येथून दोन वर्षांपूर्वी प्राध्यापक म्हणून निवृत्त झाले आहेत. त्यांना प्रवीण व प्रीतम ही दोन मुले आहेत. रविवारी (दि. १३) निकम कुटुंबीय प्रीतम यांच्या मुलीच्या बारशासाठी खेराटे-वांगी (ता. कडेगाव, जि. सांगली) येथे गेले होते. कार्यक्रम आटोपून सायंकाळी सात वाजता सर्वजण उदगावला परतले. दरम्यान, जेवण करून रात्री साडेनऊच्या सुमारास सर्वजण झोपी गेले.मध्यरात्रीच्या सुमारास दरोडेखोरांनी टेरसवरुन घरात प्रवेश केला. टेरेसजवळील खोलीत प्रीतम झोपले होते. या खोलीस बाहेरून कडी लावून दरोडेखोर जिन्यातून घराच्या हॉलमध्ये आले. हॉलच्या पलीकडील बेडरूममध्ये बाबूराव यांचा मोठा मुलगा प्रवीण, त्यांची पत्नी सरिता व मुलगी प्रणिता व लहान बाळ झोपले होते. त्याही दाराला चोरट्यांनी बाहेरून कडी घातली. त्यानंतर हॉलमध्ये झोपलेल्या अरुणा यांच्यावर दरोडेखोरांनी धारदार शस्त्राने चेहºयावर वार केल्याने त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर हॉल शेजारील दुसºया बेडरूममध्ये झोपलेल्या बाबूराव निकम यांच्यावरही धारदार शस्त्राने वार करून त्यांना जखमी केले. यानंतर दरोडेखोरांनी बाबूराव यांच्या बेडरूममध्ये असलेल्या दोन लोखंडी कपाटातील दोन तोळ्यांची कर्णफुले, अडीच तोळ्यांच्या दोन चेन, तीन तोळ्यांच्या चार अंगठ्या, दोन तोळ्यांचा लक्ष्मीहार, लहान बाळाचे दोन तोळ्यांचे दागिने, तर अरुणा यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र, हातातील बिलवर व पाटल्या असे एकूण २५ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, तसेच चांदीचे दागिने व रोख पन्नास हजार, असा एकूण सुमारे आठ लाख रुपयांचा ऐवज लंपास केला.एवढी भीषण घटना घडूनही याचा थांगपत्ता घरातील मुलांना नव्हता. सकाळी सहाच्या सुमारास बाबूराव यांचा मोठा मुलगा प्रवीण उठला असता बेडरूमला बाहेरून कडी असल्याचे लक्षात आले. त्यानंतर प्रवीणने पहिल्या मजल्यावरील भाऊ प्रीतमला फोन केला. तो उठला असता त्याच्याही रूमला बाहेरून कडी होती. त्यांनतर या दोघा भावांनी शेजारी असलेला चुलत भाऊ राजू निकम यास फोन करून बोलाविले. राजू यांनी दरवाजा उघडला असता हा प्रकार थरारक प्रकार उघडकीस आला.हॉलमध्ये अरुणा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या, तर बेडरूममध्ये बाबूराव निकम गंभीर अवस्थेत होते. त्यानंतर बाबूराव यांना तत्काळ मिरज मिशन रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय कदम, पोलीस उपअधीक्षक रमेश सरवदे, पोलीस उपअधीक्षक विनायक नरळे, कोेल्हापूर गुप्तचर विभागाचे डी. एन. मोहिते, इचलकरंजी गुन्हे अन्वेषण विभागाचे शहाजी निकम, शिरोळचे पोलीस निरीक्षक उदय डुबल यांच्यासह शंभरहून अधिक जणांचा पोलीस फौजफाटा व ट्रॅकिंग फोर्स घटनास्थळी दाखल झाला. उत्तरीय तपासणीनंतर अरुणा यांचा मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला.पोलिसांसमोर आव्हानघटनेचे गांभीर्य ओळखून दरोडेखोरांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली असली, तरी मारेकरांच्या शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. घटनास्थळी आमदार उल्हास पाटील, जि. प.च्या सदस्या स्वाती सासने, माजी बांधकाम सभापती सावकार मादनाईक, पं. स.चे सदस्य मन्सूर मुल्लाणी यांच्यासह मान्यवरांनी भेटी दिल्या.बंगल्याची टेहळणीबाबूराव निकम यांच्या नातीच्या बारशानिमित्त वांगी येथे निकम कुटुंबीय गेले होते. त्यामुळे दिवसभर बंगल्याला कुलूप होते. दरोडेखोरांनी बंगल्याची टेहळणी करून रात्री दरोडा टाकला असावा, अशी चर्चा होती. मात्र, घरात लोक असतानाही मारेकरांनी निर्घृणपणे खून केला. खुनामागे आणखी काही कारण असावे का, याचा शोध पोलीस घेत आहेत.छतालाही रक्ताचे डागझेबा श्वान बंगल्याभोवती व शिरोळ मार्गापर्यंत घुटमळले. दरम्यान, निद्रेत असलेल्या अरुणा यांच्यावर धारदार शस्त्राने वार केल्यानंतर बंगल्याच्या छतालाही रक्ताचे डाग लागले होते. त्यामुळे मारेकºयांनी क्रूरपणे ही हत्या केल्याने उदगाव परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.