शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका
4
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
5
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
6
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
7
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
8
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
9
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
10
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
11
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
12
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
13
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
14
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
15
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
16
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
17
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
18
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
20
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष

समितीविना निराधार वाऱ्यावर

By admin | Updated: April 6, 2015 01:20 IST

बैठकाच नाहीत : पेन्शनपासून लाभार्थी वंचित, उपजीविकेचा प्रश्न

सांगली : निराधारांसाठी आधार ठरलेल्या श्रावणबाळ, संजय गांधी या योजनांसाठी अशासकीय समिती गठित न झाल्याने हजारो लाभार्थी पेन्शनपासून वंचित राहिले आहेत. गेल्या पाच महिन्यांत समिती नसल्याने बैठक झाली नाही, यामुळे नवे निराधारांचे अर्ज प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे निराधार वृध्द, विधवा, अपंगांच्या निर्वाह वेतनाची शेकडो प्रकरणे प्रलंबित आहेत. संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना, वृध्द योजना आदी योजनांद्वारे निराधार व दारिद्र्य रेषेखालील व्याक्तींना सहाशे ते हजार रुपायांपर्यंतची केंद्र व राज्य शासनाकडून पेन्शन देण्यात येते. याचा हजारो निराधार व्यक्ती लाभ घेत असतात. प्रत्येक महिन्याला नव्या लाभार्थींची यामध्ये निवड करण्यात येते. लाभार्थीची निवड करण्यासाठी अशासकीय समिती नियुक्त करण्यात येते. त्यांच्या शिफारसीनंतर निराधार योजनेच्या तहसीलदारांकडून याची निवड करण्यात येते. त्यानंतर अशा निराधारांना पेन्शन योजना सुरू होते. निराधार वृध्द, विधवा, अपंग यांना उदरनिर्वाहासाठी ही योजना आधार ठरली आहे. गेल्या पाच महिन्यांपासून यासाठी अशासकीय समितीची नियुक्ती करण्यात आली नसल्यामुळे याचे काम रखडले आहे. पालकमंत्री या समितीचे अध्यक्ष व इतर सदस्य नियुक्त करतात. नवे सरकार आल्यापासून ही समितीच गठित झाली नाही. यामुळे निराधारांना मार्गदर्शन मिळणे बंद होण्याबरोबरच योग्य लाभार्थी शोधणेही बंद झाले आहे. राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आपआपल्या भागातील लाभार्थी शोधून त्यांना अशा पेन्शनचा लाभ मिळवून देत होते. त्याचबरोबर त्यासाठी लागणाऱ्या कागदत्रांसाठीही कार्यकर्त्यांची मदत लाभार्थींना होत होती. मात्र गेल्या पाच महिन्यांपासून हे कामच थांबले आहे. या योजनेचे अधिकार सध्या प्रांतांना आहेत, मात्र त्यांनी यासाठी बैठक घेतली नाही. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी निराधार तहसील कार्यालयात अर्ज दाखल करून धडपडत आहेत. मात्र समितीची बैठक झाली नसल्याने त्यांचे काम रखडले आहे. निवडणूक आचारसंहितेमुळे अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जुनी समिती बरखास्त झाल्यामुळे वृध्द, विधवा, अपंग यांच्या प्रकरणांची मंजुरी थांबल्याने निराधारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. याबाबत आंदोलनाचा इशाराही काही संघटनांकडून देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)