शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर पाटील कोण, १०० कोटी कुठून आले?;  चंद्रकांत पाटलांवर शिंदेसेनेच्या नेत्याचा गंभीर आरोप
2
“छगन भुजबळ मराठ्यांना शत्रू मानतो, म्हातारा बावचळलाय”; मनोज जरांगे पाटलांची बोचरी टीका
3
अरे हा माणूस आहे का 'क्रेडिट कार्ड'? तब्बल १६३८ कार्ड वापरुन कमावतो पैसे; एक रुपयाही कर्ज नाही
4
शिवसेना पक्ष, चिन्हाचा खटला पुन्हा लांबणीवर; अंतिम सुनावणीसाठी पुढील तारीख, कोर्टात आज काय घडलं?
5
देश सोडा अन् IPL खेळा! पॅट कमिन्स-ट्रॅविस हेडला प्रत्येकी ५८-५८ कोटींची ऑफर; ही काय आहे भानगड?
6
Nashik Crime: पाळत ठेवून घराजवळ गाठलं, अमोलची भररस्त्यात सपासप वार करत हत्या; रक्ताच्या थारोळ्यातच गेला जीव
7
कंपनीला एक चूक महागात पडली; सॅलरीपेक्षा ३०० पट रक्कम कर्मचाऱ्याच्या खात्यावर पाठवली, मग जे घडलं...
8
Rajvir Jawanda: लोकप्रिय गायक राजवीर जवंदा यांच्या मृत्युमागचं कारण आलं समोर!
9
पतीवर उकळतं तेल फेकलं; तडफडताना पाहून मिरची पावडर जखमांवर ओतली! पत्नी इतकी क्रूर का झाली?
10
“धनुष्यबाण चिन्ह आम्हाला द्या, अन्यथा गोठवा”; ठाकरे गटाच्या नेत्याची सुप्रीम कोर्टाला विनंती
11
मराठी अभिनेत्री २५ वर्षांनंतर मूळ गावी रमली, कुटुंबासोबतचे व्हिडिओ पोस्ट करत म्हणाली...
12
प्रचंड मानसिक त्रास; पूरन कुमार यांचा सुसाइड नोटमधून 8 IPS आणि 2 IAS अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप
13
लखनऊच्या नवाबांचा वारसा: १७० वर्षांपूर्वी ईस्ट इंडिया कंपनीला ४ कोटींचे कर्ज दिलेले, आजही मिळतेय व्याज...
14
बंपर लिस्टिंग...! या शेअरनं पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांची चांदी केली; दुप्पट केला पैसा, दिला छप्परफाड परतावा
15
Vastu Tips: घराच्या उत्तर दिशेला ठेवा 'या' ५ वस्तू, कुबेर महाराज म्हणतील तथास्तु!
16
टेस्लाचा मोठा निर्णय! भारतात 'स्वस्त' इलेक्ट्रिक कार आणण्याची तयारी; २ नवीन मॉडेल लाँच, काय आहे किंमत?
17
झुबीन गर्ग मृत्यू प्रकरणी त्यांच्याच चुलत भावाला अटक; सिंगापूर यॉट पार्टीशी काय संबंध?
18
सांगली ते दुबई व्हाया सुरत; मुंबईच्या सलीम डोलाचं ड्रग्ज साम्राज्य, महाराष्ट्र पोलिसांनी केला होता पर्दाफाश
19
TATA च्या 'या' कंपनीच्या शेअरमध्ये जोरदार उसळी; सोन्यातील तेजीदरम्यानही ब्रोकरेजचा विश्वास कायम, तुमच्याकडे आहे का?
20
सोनम वांगचूक यांना भेटायला तुरुंगात पोहोचल्या पत्नी गीतांजली! पुढे काय करणार? सांगितला प्लॅन

संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह ...

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीच्या औचित्याने खुले चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ‘शेतकºयांची कर्जमाफी : मिळालं काय आणि मिळवायचं काय?’ या विषयावर कॉ. डॉ. ढवळे बोलत होते.क्रांती उद्योग समूहाचे नेते अरुण लाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. पाटील, जि. प. सदस्य शरद लाड, कॉ. उमेश देशमुख, जे. पी. लाड, कुंडलिक एडके, वसंतराव लाड, प्रा. बाबूराव लगारे, प्रा. सुनील काकडे, अ‍ॅड. सुधीर गावडे आदी प्रमुख उपस्थित होते.कॉ. ढवळे म्हणाले की, सरकार आणि त्यांची ऐतिहासिक कर्जमाफी फसवी आहे. याविरुद्ध शेतकºयांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज आहे. या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मोठे संकट आकार घेत असल्याचा अंदाज नॅशनल क्राईम बिरो आॅफ रेकॉर्डने व्यक्त केला होता. जागतिकीकरणाच्या धोरणानंतर १९९२ पासून गेल्या पंचवीस वर्षांत देशातील साडेतीन लाख शेतकºयांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. आयात-निर्यात धोरणाने बरबाद केले. महाराष्ट्रातील सत्तर हजार शेतकºयांनी कर्जाला कंटाळून जीवन संपवले. संपाच्या रूपाने प्रचंड चिडलेल्या, संतापलेल्या शेतकºयाला व्यक्त व्हायला वाट मिळाली.अरुण लाड म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे तीन हजार कोटीचे नुकसान झाले. दोन कोटी नोकºयांचे आश्वासन फसवे ठरले. आज जिल्ह्यातील ३५०० शेतकरी तरुणांचा विवाह होत नाही.यावेळी प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा. रवींद्र येवले, म. मा. फाटक गुरुजी, बी. बी. खोत, मारुती शिरतोडे, कॉ. दीपक घाडगे, मारुती शिरतोडे आदी उपस्थित होते.यावेळी चळवळीतील विशेष कार्याबद्दल कवी संदीप नाझरे, विशाल शिरतोडे, वैभव माळी, जमीर सनदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कॉ. अर्जुन जाधव यांनी स्वागत केले. आदम पठाण यांनी सूत्रसंचालन केले.