शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
3
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
4
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
5
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
6
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
7
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
8
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
9
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
10
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
12
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
13
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
14
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
15
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
16
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
17
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
18
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
19
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
20
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक

संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह ...

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीच्या औचित्याने खुले चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ‘शेतकºयांची कर्जमाफी : मिळालं काय आणि मिळवायचं काय?’ या विषयावर कॉ. डॉ. ढवळे बोलत होते.क्रांती उद्योग समूहाचे नेते अरुण लाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. पाटील, जि. प. सदस्य शरद लाड, कॉ. उमेश देशमुख, जे. पी. लाड, कुंडलिक एडके, वसंतराव लाड, प्रा. बाबूराव लगारे, प्रा. सुनील काकडे, अ‍ॅड. सुधीर गावडे आदी प्रमुख उपस्थित होते.कॉ. ढवळे म्हणाले की, सरकार आणि त्यांची ऐतिहासिक कर्जमाफी फसवी आहे. याविरुद्ध शेतकºयांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज आहे. या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मोठे संकट आकार घेत असल्याचा अंदाज नॅशनल क्राईम बिरो आॅफ रेकॉर्डने व्यक्त केला होता. जागतिकीकरणाच्या धोरणानंतर १९९२ पासून गेल्या पंचवीस वर्षांत देशातील साडेतीन लाख शेतकºयांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. आयात-निर्यात धोरणाने बरबाद केले. महाराष्ट्रातील सत्तर हजार शेतकºयांनी कर्जाला कंटाळून जीवन संपवले. संपाच्या रूपाने प्रचंड चिडलेल्या, संतापलेल्या शेतकºयाला व्यक्त व्हायला वाट मिळाली.अरुण लाड म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे तीन हजार कोटीचे नुकसान झाले. दोन कोटी नोकºयांचे आश्वासन फसवे ठरले. आज जिल्ह्यातील ३५०० शेतकरी तरुणांचा विवाह होत नाही.यावेळी प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा. रवींद्र येवले, म. मा. फाटक गुरुजी, बी. बी. खोत, मारुती शिरतोडे, कॉ. दीपक घाडगे, मारुती शिरतोडे आदी उपस्थित होते.यावेळी चळवळीतील विशेष कार्याबद्दल कवी संदीप नाझरे, विशाल शिरतोडे, वैभव माळी, जमीर सनदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कॉ. अर्जुन जाधव यांनी स्वागत केले. आदम पठाण यांनी सूत्रसंचालन केले.