शहरं
Join us  
Trending Stories
1
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
2
Rain Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा! उर्वरीत महाराष्ट्रात कसा असणार पाऊस? जाणून घ्या
3
ड्रॅगनला मिरची का झोंबली?; संतापलेल्या चीनने रेड लाईन क्रॉस करून या देशात पाठवली ६१ लढाऊ विमाने
4
Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 
5
इराण-इस्रायल युद्धात आता हुकूमशहाची 'एन्ट्री'...! ट्रम्प, नेतन्याहूंना दिली थेट धमकी, म्हणाले...
6
अनिल अंबानींच्या 'बुडत्या' कंपनीवर गौतम अदानींचा मोठा डाव! ४,००० कोटींना खरेदीची योजना
7
३ कोटींचं घर, पेशंटसोबत अनैतिक संबंध..; फिजियोथेरेपी सेंटर चालवणाऱ्या पत्नीने रचला पतीच्या हत्येचा कट
8
Iran Israel War: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या अरक अणुऊर्जा केंद्राचे किती नुकसान झाले?
9
धक्कादायक! होणारा जावई आवडला नाही, राग झाला अनावर; कुटुंबाने मुलीलाच संपवलं
10
'युद्धविरामासाठी भारताला विनंती केली', ऑपरेशन सिंदुरबाबत पाकिस्तानच्या उप-पंतप्रधानांची कबुली
11
HSRP Number Plate : वाहनधारकांसाठी खुशखबर! ‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ
12
'परिवार का साथ, परिवार का विकास...', बिहारमधून पीएम मोदींची काँग्रेस-राजदवर खोचक टीका
13
लोकांची उष्टी भांडी घासून गरीब वडिलांनी शिकवलं, लेकाने कष्टाचं सोनं केलं; आता होणार डॉक्टर
14
हल्ल्यात २ एअरबेस उद्धवस्त, पाकची कबुली; युद्धविरामसाठी भारताला कुणी केला होता फोन?
15
Jaipur Couple Video: रोमान्समध्ये इतके झाले तल्लीन की..., जयपूरमधील कपलचा हॉटेलमधील 'तो' व्हिडीओ व्हायरल
16
ENG vs IND : मॅच आधी एक मिनिटाचे मौन! टीम इंडियासह इंग्लंडचे खेळाडू काळी पट्टी बांधून उतरले मैदानात (VIDEO)
17
Mumbai Local Fight: मुंबई लोकलमध्ये चढताना धक्का लागला अन् तरुणीचा पारा चढला; महिलेला रक्तबंबाळ होईपर्यंत मारलं
18
ENG vs IND, 1st Test: गिलनं IPL जोडीदार साई सुदर्शनला दिली पदार्पणाची संधी; करुण नायरसह शार्दुल ठाकूरवरही भरवसा
19
पुण्यावरून कोकणात जाताय, थांबा! वरंध घाट मार्ग तीन महिने राहणार बंद; आता कोणत्या मार्गाने प्रवास कराल?
20
Video - धक्कादायक वास्तव! छतावरुन टपकतंय पाणी, वर्गात छत्री घेऊन शिकताहेत ६८ मुलं

संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 00:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह ...

लोकमत न्यूज नेटवर्कपलूस : सरकारची कर्जमाफी फसवी असून, आंदोलनाचा बडगा उगारल्याशिवाय सरकार जागे होणार नाही. कारण सरकारने झोपेचे सोंग घेतलेले आहे. त्यामुळे संघर्षाचे नगारे वाजल्याशिवाय संपूर्ण कर्जमाफी मिळणार नाही, असे प्रतिपादन कॉम्रेड अशोक ढवळे यांनी केले.कुंडल येथे पलूस तालुक्यातील समाजवादी प्रबोधिनी, परिवर्तनवादी चळवळीचे कार्यकर्ते आणि जिल्हा इरिगेशन फेडरेशनच्या सहभागाने, क्रांतिसिंह नाना पाटील जयंतीच्या औचित्याने खुले चर्चासत्र आयोजित केले होते. यावेळी ‘शेतकºयांची कर्जमाफी : मिळालं काय आणि मिळवायचं काय?’ या विषयावर कॉ. डॉ. ढवळे बोलत होते.क्रांती उद्योग समूहाचे नेते अरुण लाड अध्यक्षस्थानी होते. कार्यक्रमात ज्येष्ठ विचारवंत व्ही. वाय. पाटील, जि. प. सदस्य शरद लाड, कॉ. उमेश देशमुख, जे. पी. लाड, कुंडलिक एडके, वसंतराव लाड, प्रा. बाबूराव लगारे, प्रा. सुनील काकडे, अ‍ॅड. सुधीर गावडे आदी प्रमुख उपस्थित होते.कॉ. ढवळे म्हणाले की, सरकार आणि त्यांची ऐतिहासिक कर्जमाफी फसवी आहे. याविरुद्ध शेतकºयांनी संघटितपणे संघर्ष करण्याची गरज आहे. या तीन वर्षांत महाराष्ट्रातील शेती क्षेत्रात मोठे संकट आकार घेत असल्याचा अंदाज नॅशनल क्राईम बिरो आॅफ रेकॉर्डने व्यक्त केला होता. जागतिकीकरणाच्या धोरणानंतर १९९२ पासून गेल्या पंचवीस वर्षांत देशातील साडेतीन लाख शेतकºयांनी कर्जबाजारीपणातून आत्महत्या केली. आयात-निर्यात धोरणाने बरबाद केले. महाराष्ट्रातील सत्तर हजार शेतकºयांनी कर्जाला कंटाळून जीवन संपवले. संपाच्या रूपाने प्रचंड चिडलेल्या, संतापलेल्या शेतकºयाला व्यक्त व्हायला वाट मिळाली.अरुण लाड म्हणाले की, नोटाबंदीच्या निर्णयामुळे तीन हजार कोटीचे नुकसान झाले. दोन कोटी नोकºयांचे आश्वासन फसवे ठरले. आज जिल्ह्यातील ३५०० शेतकरी तरुणांचा विवाह होत नाही.यावेळी प्राचार्य तानाजीराव चव्हाण, प्रा. रवींद्र येवले, म. मा. फाटक गुरुजी, बी. बी. खोत, मारुती शिरतोडे, कॉ. दीपक घाडगे, मारुती शिरतोडे आदी उपस्थित होते.यावेळी चळवळीतील विशेष कार्याबद्दल कवी संदीप नाझरे, विशाल शिरतोडे, वैभव माळी, जमीर सनदी यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कॉ. अर्जुन जाधव यांनी स्वागत केले. आदम पठाण यांनी सूत्रसंचालन केले.