शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

विजयाची माळ शेट्टी की मानेंच्या गळ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2019 23:27 IST

युनूस शेख लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : हातकणंगले लोकसभेच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ६९.४९ टक्केमतदान झाले. एकूण २ लाख ६९ ...

युनूस शेखलोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : हातकणंगले लोकसभेच्या इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात ६९.४९ टक्केमतदान झाले. एकूण २ लाख ६९ हजार २९५ मतदारांपैकी १ लाख ८७ हजार १४0 मतदारांनी हक्कबजावला. २0१४च्या निवडणुकीत ७२.५२ टक्केमतदान झाले होते.गेल्या दोन लोकसभा निवडणुकीत खासदार राजू शेट्टी यांनी काँग्रेस आघाडीविरुद्ध रणशिंग फुंकले होते. २०१४ च्या निवडणुकीत शेट्टी यांनी शेतकऱ्यांच्या बळावर विरोध मोडून काढत मतदारसंघातून २३ हजार ४४५ मताधिक्य घेतले होते. यावेळी शेट्टी यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, आमदार जयंत पाटील यांची ताकद होती. त्यामुळे मताधिक्यात वाढ होणे अपेक्षित आहे. मात्र, त्यांच्याविरोधात महायुतीकडून रिंगणात उतरलेले शिवसेनेचे उमेदवार धैर्यशील माने यांच्यासाठी भाजप-सेनेच्या पाच आमदारांची ताकद पणाला लागली होती. त्यामुळे येथे शेट्टींचे मताधिक्य रोखून धरण्याचा दावा युतीच्या समर्थकांकडून केला जात आहे.मतदानावेळी राजू शेट्टी यांच्यासाठी जयंत पाटील यांच्या कार्यकर्त्यांचे जाळे कामाला लागले होते. त्यांच्या समूहातील कामगार प्रत्यक्ष मतदान बुथमध्ये सक्रिय होते, तर कार्यकर्ते मतदान केंद्राबाहेर मतदारांची जुळणी करीत होते. माने यांच्यासाठीही भाजप-सेनेचे नेते, कार्यकर्त्यांसह मित्रपक्षांचे कार्यकर्ते कार्यरत होते.सगळ्यांचीच गोचीखासदार शेट्टी गेल्या दोन निवडणुकीत विकास आघाडीला सोबत घेऊन काँग्रेस-राष्ट्रवादीविरोधात लढले. यावेळी त्यांनी काँग्रेस आघाडीशी घरोबा केल्याने, विकास आघाडीचे नेते त्यांच्यासमोर विरोधात ठाकले होते. धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने राष्ट्रवादीकडून लढल्या आहेत. आता माने कुटुंब शिवसेनेत गेल्याने काँग्रेस, राष्ट्रवादीचे नेते त्यांच्याविरोधात आहेत. परिणामी, दोन्ही बाजूकडच्या सर्वांचीच गोची झाली होती.अंडर करंटची चर्चाहातकणंगले लोकसभा मतदारसंघात १७ उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये शेट्टी-माने यांच्यातील लढतीचीच चर्चा रंगली. शेवटच्या दोन दिवसांत वंचित आघाडीची कपबशी, राजू शेट्टी नावाचे दोन उमेदवार, खासदारांनी काँग्रेस-आघाडीशी केलेली सलगी, शेट्टींनी ब्राह्मण समाजाविषयी केलेल्या वक्तव्याचे उमटणारे पडसाद असे विषय समोर आले. वंचित आघाडीच्या कार्यकर्त्यांनी फक्त मोबाईल संदेशाची देवाण-घेवाण करून रान तापविल्याची चर्चा होती.