शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

शिराळ्यात बोगस बचत गटांचे जाळे

By admin | Updated: November 9, 2016 22:46 IST

फायनान्स कंपन्यांचा सुळसुळाट : कर्जाच्या हप्त्यांमुळे महिलांवर तणाव, अनेक कुटुंबांचे स्थलांतर

 विकास शहा ल्ल शिराळा महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, हा उद्देश ठेवून शासनाकडून महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. त्यांना उद्योगधंद्यांसाठी प्रवृत्त केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिलांना अनेक आर्थिक समस्या दूर होण्यासाठी मोठी मदत होते. मात्र हा बचत गटाचा उद्देश दूर राहून याचा फायदा ग्रामीण भागातील महिलांची आर्थिक गरज ओळखून तालुक्यात जवळपास १७ ते १८ फायनान्स कंपन्यांनी शिरकाव केला असून, त्याचे जाळे जवळपास संपूर्ण तालुक्यात पसरलेले आहे. हे सुरू असलेले बचतगट कायदेशीर आहेत का? त्यांची व्याजदराची आकारणी कोणत्या निकषावर केली जाते? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. गेल्या काही वर्षांपासून वार्षिक २ टक्के व्याजदराने शासनाकडून महिला बचत गटांना अर्थसहाय्य केले जाते. त्यामुळे ग्रामीण भागातील महिला वर्गाच्या अनेक समस्या दूरही झाल्या आहेत. ग्रामीण भागातील कुटुंबांचे आर्थिक उत्पन्न तोकडे असल्याने अनेक कुटुंबांनी बचत गटांचे कर्ज घेतले आहे. या कर्जामुळे आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी मदतही झाली आहे. या शासनाकडून घेतलेले कर्ज हे कमी व्याजदराने व या कर्जाचा हप्ता महिन्याला हप्ता असतो. ज्याचे कर्ज कमी आहे, त्या महिला आपला हप्ता कसाबसा देऊ शकतात, मात्र ज्या महिलांनी खासगी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे. ग्रामीण भागातील महिला वर्ग या बचत गटांचे हप्ते फेडण्यासाठी त्यांना मोठ्या तणावाखाली राहावे लागत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. या कर्जापैकी काही कर्जाचे हप्ते आठवड्याला, तर काही कर्जाचे हप्ते १० व १५ दिवसाला घेतले जातात व जर एखाद्या महिलेला ठरल्याप्रमाणे हप्ता दिला नाही, तर त्या बचत गटात जेवढ्या महिला आहेत, त्या महिलांवर तो हप्ता भरून काढण्याची जबाबदारी असते. त्यामुळे महिला त्या महिलेच्या घरी जाऊन बसतात व हप्ता वसूल करतात. मात्र ज्या कंपनीने कर्ज वाटप केले आहे, ते बिनधास्त असतात. खासगी फायनान्स कंपन्यांनी तसेच सहकारी संस्थांनी ग्रामीण भागात सुरू असलेले बचत गट केवळ एक छायाचित्र आणि रेशन कार्डच्या झेरॉक्सवर पैसे वाटप करतात. तोकड्या कागदपत्रांवर कर्ज मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांनी विविध बचत गटांचे पैसे उचलले आहेत. परंतु त्यांची परतफेड करताना मात्र महिलांना मोठ्या तणावाखाली राहावे लागत आहे. या तणावामुळे अनेक महिलांना विविध आजारांना तोंड द्यावे लागत आहे. सध्या तालुक्यात जवळपास १८ विविध फायनान्स कंपन्यांचे बचत गट कार्यरत आहेत व प्रत्येकाचे व्याज दर वेगवेगळे आहेत. बहुतांशी रोजगार करणाऱ्या व हातावर पोट असणाऱ्या महिलाच मोठ्या प्रमाणात अशा विविध बचत गटांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. ज्या महिला अशा बचत गटांच्या विळख्यात अडकल्या आहेत, या बचत गटांच्या परतफेडीची धास्ती लागून राहिली आहे. या तणावामुळे अनेक कुटुंबांनी गाव सोडून जाणे पसंत केले आहे. कारण हप्ता वसूल करण्यासाठी ही मंडळी सकाळी ७ वाजताच आपला अड्डा गावात मांडतात. रात्री दहा वाजेपर्यंत हप्ते गोळा केले जातात. हप्ता न दिल्यास गटातील महिलांचा मोर्चा संबंधित महिलेच्या घराकडे वळवतात व वेळ पडल्यास दमदाटी करून पैसै वसूल केले जातात. त्यातूनही पैसे नाही मिळाले, तर घराला कुलूप घालण्यापर्यंत दबावतंत्र वापरले जाते. खासगी फायनान्स : ग्रामीण भाागात वलय शिराळा तालुक्यात अनेक खासगी फायनान्स कंपन्यांनी तसेच सहकारी संस्थांनी आपले बचत गट तयार केले आहेत. हे बचत गट करत असताना, खासगी कंपनीवाले जवळपास प्रत्येक गावात जाऊन सुरुवातीला आपले वलय निर्माण करतात व गावातील पुढाकार घेणाऱ्या महिलांना हाताशी धरून ज्या महिलांना आर्थिक गरज आहे, अशा पाच-दहा-पंधरा महिलांचा बचत गट तयार करून त्यांना एक आठवड्यानंतर ५ ते ५० हजार रुपयापर्यंत कर्ज दिले जाते. दिलेले कर्ज वेळेत परत न केल्यासा या कंपन्यांकडून कर्जवसुलीसाठी विविध फंडे वापरले जात आहेत. यामुळे ग्रामीण भागातील महिलांना मानहानीचेही प्रसंग उद्भवत आहेत. यामुळे परिसरातील महिलांबरोबच अनेक नागरिकही तणावाखाली वावरत आहेत. चौकशीची मागणी एक छायाचित्र व रेशनकार्डच्या झेरॉक्सवर तातडीने कर्ज मिळत असल्यामुळे, अनेक रोजंदारी करणाऱ्या महिला, बचत गटांच्या नावाखाली सावकारी करणाऱ्यांच्या जाळ्यात अडकल्या आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या बचत गटांची चौकशी व्हावी, अशी मागणी ग्रामीण भागातून जोर धरू लागली आहे.