शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

व्याघ्र प्रकल्प होणार की बारगळणार?

By admin | Updated: November 20, 2015 00:18 IST

निसर्गप्रेमींचा सवाल : प्रकल्पाची अधिसूचना निघाली, मात्र निधीच नाही

येळापूर : देशातल्या ३९ व्या व्याघ्र प्रकल्पाची आणि पश्चिम महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना निघाली, मात्र या सर्वांसाठी लागणाऱ्या निधीसाठी राज्य व केंद्र सरकारचा निधी कधी मिळणार, याकडे नजरा लागल्या आहेत. त्यामुळे हा प्रकल्प होणार की बारगळणार, हे सरकार निर्णयाने ठरणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने सत्तेत असताना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची अधिसूचना जारी केली. याचा केंद्र व राज्यातील सरकारने पाठपुरावा केला. चांदोली अभयारण्याची व्याघ्र प्रकल्प उभारणीसाठी व निसर्ग पर्यटनाला चालना देण्याच्यादृष्टीने २00३ मध्ये घोषणा करण्यात आली. दुर्मिळ व वैविध्यपूर्ण वनसंपदेचे वरदान चांदोली अभयारण्याला लाभले आहे. चांदोली अभयारण्य क्षेत्र सांगली, सातारा, रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विस्तारले असल्याने त्याचे महत्त्वही वाढले आहे.राज्याच्या अधिसूचनेनुसार कोयना व चांदोली धरण कार्यक्षेत्रातील अभयारण्यामध्ये ७१४.२२ चौरस कि.मी. क्षेत्रात या व्याघ्र प्रकल्पाची उभारणी होणार होती. यामध्ये चांदोलीच्या ३१७.६४ चौरस कि.मी., तर कोयनेच्या ४२३.५५ चौरस कि.मी. क्षेत्रामध्ये हा प्रकल्प विस्तारला जाणार होता. मात्र या अभयारण्यातील वाघांची संख्या दिवसेंदिवस घटत असून, बिबट्यासह इतर प्राण्यांची संख्या तुलनेने जास्त आहे.सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली, कोयना व राधानगरी मिळून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. यामध्ये जवळपास १८ हजार ७४५ हेक्टर एवढ्या क्षेत्रातील शिराळा तालुक्यातील १९, पाटण तालुक्यातील ८, शाहुवाडी तालुक्यातील ९, तर संगमेश्वर तालुक्यातील एका गावाचा समावेश आहे. आतापर्यंत साडेनऊ कोटी रुपये यासाठी खर्च झाला असून आणखी कोट्यवधी रुपयांची गरज आहे. राज्यातील काँग्रेस आघाडी सरकारने वाघ्र प्रकल्पाची घोषणा केली. पण निधी मात्र दिलाच नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्य अंधारात सापडले आहे. (वार्ताहर)