शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
2
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
3
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
4
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
5
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
6
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
7
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
8
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
9
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
10
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
11
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
12
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
13
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
14
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
15
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
16
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
17
गणेशोत्सव २०२५: यंदा श्रीगणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त कधी? पाहा, महत्त्व अन् काही मान्यता
18
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
19
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
20
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!

तासगावात १३ कोटींची अडत वाचणार?

By admin | Updated: July 16, 2016 23:36 IST

बेदाणा सौद्यांची उत्सुकता : शेतकऱ्यांचे हित व्यापाऱ्यांच्या हातात

दत्ता पाटील - तासगाव -राज्य शासनाने बाजार समित्या नियमनमुक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयानुसार शेतकऱ्यांकडून घेतली जाणारी अडत रद्द करण्यात आली आहे. तासगाव बाजार समितीकडून मागील आर्थिक वर्षात १३ कोटींची अडत वसूल करण्यात आली होती. यापुढे वर्षाला केवळ तासगावातून १३ कोटींची अडत वाचणार आहे. असे असले तरी बेदाणा व्यापार पाहिल्यास शेतकऱ्यांचे हित व्यापाऱ्यांच्याच हातात राहील, अशी शक्यता व्यक्त होत आहे. नेमके वास्तव जाणून घेण्यासाठी सौद्यांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.राज्य शासनाच्या बाजार समित्या नियमनमुक्तीच्या धोरणानुसार, यापुढे व्यापाऱ्यांकडून अडत घेतली जाणार आहे. शेतकऱ्यांना या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांकडूनही या निर्णयाचे स्वागत होत आहे. केवळ तासगाव बाजार समितीत मागील वर्षात शेतकऱ्यांकडून बेदाण्याच्या माध्यमातून तब्बल १३ कोटींची अडत वसूल करण्यात आली होती. यापुढे या शेतकऱ्यांचा तेवढा फायदा अडत बंदमुळे होणार आहे. शासनाच्या या निर्णयाचे नेमके फलित व्यापाऱ्यांच्या भूमिकेवर निश्चित होणार आहे. कारण अडतीचे दोन रुपये शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांच्या खिशातून जाणार आहेत. व्यापाऱ्यांकडून या दोन रुपयांची वसुली शेतकऱ्यांकडूनच केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. व्यापाऱ्यांकडून स्वत:चे आर्थिक हित साधण्यासाठी बेदाण्याची खरेदी कमी दराने केली जाण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे वरकरणी वाटणारा शेतकऱ्यांचा नफा शेतकऱ्यांना मिळेल का, याचे नेमके उत्तर जाणून घेण्यासाठी सौद्याची वाट पहावी लागणार आहे.अडतदारांना नोटीस शासनाच्या निर्णयानंतर १४ तारखेपासून तासगावात अद्यापर्यंत बेदाणा सौदे झालेले नाहीत. खरेदीदारांनी पाठ फिरवली असल्याने सौदे झाले नसल्याचे अडतदारांकडून सांगण्यात येत आहे. तर बाजार समितीने सोमवारपासून सौदे सुरू करण्याबाबत अडतदारांना नोटिसा बजावल्या आहेत. सौदे सुरु झाले नाहीत, तर पणनच्या नियमानुसार संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती सभापती अविनाश पाटील यांनी दिली.बाजार समितीच्या उत्पन्नावर परिणाम तासगाव कृषी उत्पन्न बाजार समितीला बेदाणा सौद्यातून खरेदीदारांकडून शंभराला पंचवीस पैशांप्रमाणे सेवा शुल्काच्या माध्यमातून उत्पन्न मिळते. मागील आर्थिक वर्षात तब्बल १ कोटी ६३ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळाले होते. शासनाच्या धोरणामुळे यापुढे बाजार समितीबाहेरच बेदाण्याची विक्री झाल्यास बाजार समितीचे उत्पन्न ढासळण्याची शक्यता आहे. दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना परस्पर विक्रीचा धोकाही आहे. बाजार समितीत बेदाणा विक्री झाल्यास, बेदाणा रकमेची जबाबदारी बाजार समितीकडे असते. मात्र परस्पर विक्री झाल्यास शेतकऱ्याची फसवणूक होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. तसे अनुभव यापूर्वी द्राक्ष आणि बेदाणा उत्पादकांना आलेले आहेत.