शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

‘सर्वोदय’च्या सभासदांना न्याय मिळणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:31 IST

दुधगाव : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेली दहा-बारा ...

दुधगाव : कारंदवाडी (ता. वाळवा) येथील सर्वोदय शेतकरी सहकारी साखर कारखाना वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. गेली दहा-बारा वर्षे सभासदांचा ऊस बिगर ऊस उत्पादक म्हणून तोडला जातो. यामुळे कारखान्याच्या सोळा हजार सभासदांना कधी न्याय मिळणार, अशी चर्चा मिरज पश्चिम भागात सुरू आहे.

पालकमंत्री जयंत पाटील व दिवंगत माजी आमदार संभाजी पवार यांचा कारखान्याच्या मालकीवरून वाद सुरू आहे. कारंदवाडीजवळील सर्वोदय साखर कारखान्याची उभारणी माजी आमदार व्यंकप्पा पत्की, माजी आमदार शरद पाटील, आमदार संभाजी पवार या त्रिमूर्तींनी १९९९ ते २००० मध्ये केली. वाळवा, सांगली, मिरज पूर्व आणि पश्चिम असे या कारखान्याचे कार्यक्षेत्र आहे. या कार्यक्षेत्रात ४८ गावांचा समावेश आहे. २००५ मध्ये महापुरामुळे कारखाना अडचणीत आला. २००८ मध्ये सर्वोदय साखर कारखान्यांना राजारामबापू कारखान्याला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला होता. त्यांची तीन वर्षांची मुदत २०११ मध्ये संपली. तेव्हापासून त्यांचे पैसे परत देऊन हा कारखाना ताब्यात घेण्यासाठी संभाजी पवार गटाचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी न्यायालयीन लढाई चालू आहे. राजारामबापू कारखान्याचे किती पैसे भरायचे, इतकाच वादाचा विषय आहे.

हा कारखाना सभासदांच्या मालकीचा व्हावा यासाठी संभाजी पवार गटाने राजारामबापू कारखान्यासोबत न्यायालयीन लढाई सुरू केली. हा कारखाना सभासदांचा होण्यासाठी मिरज पश्चिम भागातील काही सभासदांनी आपले सोने-नाणे गहाण ठेवून तसेच सहकारी पतसंस्थेचे कर्जदेखील घेतले आहे.

चौकट

असा झाला वाद

सर्वोदय साखर कारखान्यासमोर २००८ मध्ये आर्थिक संकट निर्माण झाल्याने राजारामबापू पाटील कारखान्याला भाडेतत्त्वावर चालविण्यास दिला होता. त्यानंतर करार संपल्यानंतर पैसे परत देण्याची तयारी करूनदेखील राजारामबापू कारखाना ताबा सोडण्यास तयार नाही. तेव्हापासून आज अखेर न्यायालयात वाद सुरू आहे.