शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

नवा मुख्यमंत्री काय दिवे लावणार ?

By admin | Updated: May 21, 2014 01:06 IST

पतंगराव कदम : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढविणार

 सांगली : राज्यातील नेतृत्व बदलाबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, हे माहीत नाही. विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांनी होणार आहेत. त्यामुळे नवा मुख्यमंत्री येऊन काय दिवे लावणार आहे, असे रोखठोक मत पालकमंत्री पतंगराव कदम यांनी आज, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. यात निश्चितच काँग्रेस आघाडीला यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील पानिपतानंतर प्रथमच सांगली दौर्‍यावर आलेल्या कदम यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्री बदलाबाबत ते म्हणाले की, पक्षातील काहीजण मुख्यमंत्री बदलण्याची मागणी करीत आहेत. पुण्याच्या बैठकीत दीपक मानकरांनी व्यक्तिश: मागणी केली. त्याबाबत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेईल, हे माहीत नाही; पण पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत राजीनाम्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा काळ उरला आहे. आता नवा मुख्यमंत्री येऊन काय दिवे लावणार आहे? विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून काँग्रेस निश्चित यश मिळवेल, अशी अपेक्षा आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे गणित वेगवेगळे असते. लोकसभा निवडणुकीत देशाचे, तर विधानसभेवेळी राज्यातील प्रश्न मांडले जातात. त्यामुळे या पराभवाचा फारसा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार नाही. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येईल; पण त्यासाठी पक्षाला सतर्क रहावे लागेल. प्रत्येक मतदारसंघात बारकाईने लक्ष घालून निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस व राष्ट्रवादी दोघेही पराभवाचे चिंतन करीत आहेत. पुढील काळात जनतेला गृहित धरून जाण्याचे राजकारण चालणार नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केले. लोकसभेतील पराभवाचे विश्लेषण करताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला केवळ मोदी लाटच नव्हे, तर अनेक कारणे आहेत. नरेंद्र मोदींनी दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी केली सुरू केली होती. प्रसारमाध्यमांनीही मोदींची हवा तयार केली. त्याचा परिणाम तरुणांवर झाला. गॅस दरवाढ, महागाईने महिला त्रस्त होत्या. या सार्‍याचा परिपाक म्हणून भाजपला ‘न भूतो’ यश मिळाले. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस शून्यावर आली. अशोक चव्हाण व राजीव सातव यानांच यश मिळाले. मोदी सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होतात की नाही, यावर लक्ष ठेवावे लागेल. (प्रतिनिधी)