शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
2
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
3
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
4
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
5
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
6
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
7
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
8
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
9
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
10
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
11
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
12
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
13
एकच उच्चशिक्षणासाठी नियामक मंडळ असेल तर... मूल्यांकन होईल 'डिजिटल' आणि पारदर्शक!
14
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
15
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
16
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
17
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
18
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
19
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
20
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
Daily Top 2Weekly Top 5

नवा मुख्यमंत्री काय दिवे लावणार ?

By admin | Updated: May 21, 2014 01:06 IST

पतंगराव कदम : पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा लढविणार

 सांगली : राज्यातील नेतृत्व बदलाबाबत पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील, हे माहीत नाही. विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांनी होणार आहेत. त्यामुळे नवा मुख्यमंत्री येऊन काय दिवे लावणार आहे, असे रोखठोक मत पालकमंत्री पतंगराव कदम यांनी आज, मंगळवारी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले. आगामी विधानसभा निवडणुका मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याच नेतृत्वाखाली लढविल्या जातील. यात निश्चितच काँग्रेस आघाडीला यश मिळेल, असा दावाही त्यांनी केला. लोकसभा निवडणुकीतील पानिपतानंतर प्रथमच सांगली दौर्‍यावर आलेल्या कदम यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मुख्यमंत्री बदलाबाबत ते म्हणाले की, पक्षातील काहीजण मुख्यमंत्री बदलण्याची मागणी करीत आहेत. पुण्याच्या बैठकीत दीपक मानकरांनी व्यक्तिश: मागणी केली. त्याबाबत काँग्रेस हायकमांड काय निर्णय घेईल, हे माहीत नाही; पण पक्षाच्या कार्यकारिणी बैठकीत राजीनाम्याची मागणी फेटाळण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीसाठी तीन महिन्यांचा काळ उरला आहे. आता नवा मुख्यमंत्री येऊन काय दिवे लावणार आहे? विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून काँग्रेस निश्चित यश मिळवेल, अशी अपेक्षा आहे. लोकसभा व विधानसभा निवडणुकीचे गणित वेगवेगळे असते. लोकसभा निवडणुकीत देशाचे, तर विधानसभेवेळी राज्यातील प्रश्न मांडले जातात. त्यामुळे या पराभवाचा फारसा परिणाम विधानसभा निवडणुकीवर होणार नाही. राज्यात काँग्रेस आघाडी सरकार पुन्हा सत्तेवर येईल; पण त्यासाठी पक्षाला सतर्क रहावे लागेल. प्रत्येक मतदारसंघात बारकाईने लक्ष घालून निर्णय घ्यावे लागतील. काँग्रेस व राष्ट्रवादी दोघेही पराभवाचे चिंतन करीत आहेत. पुढील काळात जनतेला गृहित धरून जाण्याचे राजकारण चालणार नाही, असेही कदम यांनी स्पष्ट केले. लोकसभेतील पराभवाचे विश्लेषण करताना ते म्हणाले की, काँग्रेसच्या पराभवाला केवळ मोदी लाटच नव्हे, तर अनेक कारणे आहेत. नरेंद्र मोदींनी दोन वर्षांपासून लोकसभेची तयारी केली सुरू केली होती. प्रसारमाध्यमांनीही मोदींची हवा तयार केली. त्याचा परिणाम तरुणांवर झाला. गॅस दरवाढ, महागाईने महिला त्रस्त होत्या. या सार्‍याचा परिपाक म्हणून भाजपला ‘न भूतो’ यश मिळाले. विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस शून्यावर आली. अशोक चव्हाण व राजीव सातव यानांच यश मिळाले. मोदी सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत. भाजपने जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण होतात की नाही, यावर लक्ष ठेवावे लागेल. (प्रतिनिधी)