शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

फसव्या कारखानदारांच्या गव्हाणीत उड्या घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:27 IST

ते म्हणाले, कडेगाव येथे नोव्हेंबर महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कारखानदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला आमदार मोहनराव ...

ते म्हणाले, कडेगाव येथे नोव्हेंबर महिन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कारखानदारांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीला आमदार मोहनराव कदम, विजयबापू पाटील, उमेश जोशी यांच्यासह अन्य कारखान्यांचे पदाधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत सर्वांनी एकरकमी एफआरपी देण्याचे कबूल केले होते. मात्र त्यांनी शब्द फिरविला असून, सोनहिरा, उदगिरी आणि दालमिया हे तीन कारखाने वगळता सर्वांनी एकरकमी एफआरपी दिली नाही. केवळ प्रतिटन दोन हजार ५०० रुपये पहिला हप्ता जमा केला आहे. ही शेतकऱ्यांशी कारखानदारांनी गद्दारी केली आहे. कारखानदारांच्या या भूमिकेवर शेतकऱ्यांचा प्रचंड असंतोष असून, त्यांनी आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. संघटना शेतक ऱ्यांबरोबर असून, आम्ही रस्त्यावरची आणि न्यायालयीन लदाई लढणार आहोत. शब्द न पाळणाऱ्या कारखानदारांचे पुतळे जाळण्याचे आणि गव्हाणीत उड्या घेण्याचे आंदोलन सुरू करणार आहोत. त्याचबरोबर साखर आयुक्तांकडेही तक्रार करणार आहे. ऊस गाळप झाल्यानंतर १४ दिवसांत बिल देणे कायद्याने बंधनकारक आहे. मात्र दीड ते दोन महिन्यानंतर कारखानदार केवळ दोन हजार ५०० रुपये प्रतिटन शेतकऱ्यांना देत आहेत, ही गंभीर बाब आहे.

चौकट

भजन करूनही कारखानदारांचा निषेध करणार

कडेगाव येथे एकरकमी एफआरपीसाठी बैठक झाली होती. या बैठकीस अनेक कारखान्यांचे पदाधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक उपस्थित होते. या सर्वांनी एकरकमी एफआरपी मान्य केली होती. तरीही त्यांनी एकरकमी एफआरपी देण्याचा शब्द पाळला नाही. म्हणून या बैठकीस उपस्थित असणाऱ्यांच्या घरासमोर भजन करून त्यांचा निषेध करणार आहे, असेही खराडे म्हणाले.