शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मसुचीवाडीत गुरू-शिष्य एकत्र येणार का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:42 IST

बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारीला मतदान हाेत असून, सरपंचपद खुले व्हावे, यासाठी ...

बोरगाव : मसुचीवाडी (ता. वाळवा) ग्रामपंचायत निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. १५ जानेवारीला मतदान हाेत असून, सरपंचपद खुले व्हावे, यासाठी अनेकांनी देव पाण्यात घातले आहेत. ग्रामपंचायतीची लढत एकेकाळच्या गुरू-शिष्यात होणार की, गुरू-शिष्य एकत्र येऊन हुतात्मा गटास टक्कर देणार, याकडे राजकीय धुरिणांच्या नजरा लागल्या आहेत.

अवघे चार वाॅर्ड असणाऱ्या मसुचीवाडीत १२ जागांसाठी लढत होते; पण या गावाच्या राजकारणाची ख्याती जिल्हाभर आहे. गावात पंचायत समितीचे माजी सदस्य दत्तूआप्पा खोत यांची जनसेवा आघाडी पार्टी व माजी सरपंच सर्जेरावबापू कदम यांची ग्रामविकास पॅनेल असे दोन पारंपरिक गट आहेत. दाेन्ही गट जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना मानणारे आहेत. दाेन्ही नेते नात्याने गुरू-शिष्य; पण आजमितीला एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. कार्यकर्तेही कट्टर आहेत. एकमेकांच्या आनंदात अथवा दुःखद प्रसंगातही सहभागी हाेत नाहीत. यामुळेच हे गाव राजकारणासाठी जिल्हाभर परिचित आहे. मात्र यावेळी गावात राजकीय समीकरण बदलत आहे. हुतात्मा गटाची कट्टर तिसरी पार्टी अस्तित्वात आली आहे. जयंत पाटील गट व हुतात्मा गटाचे विळ्या-भोपळ्याचे सख्य अख्ख्या जिल्ह्याला परिचित आहे. त्यामुळे ग्रामपंचायत बिनविरोध होणारच नाही, ही काळ्या दगडावरील रेघ आहे.

सध्या दत्तूआप्पा खोत यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे आप्पांच्या पार्टीची मदार सर्जेरावबापूंकडे देऊन ही निवडणूक जयंत पाटील एकत्र लढायला लावतील, अशी चर्चा आहे. दुसरीकडे हुतात्मा गटाने निवडणुकीची संपूर्ण तयारी केली आहे. याशिवाय रयत क्रांती आघाडीचे जिल्हाध्यक्ष भास्कर कदम काय निर्णय घेतात? यावरही या गावातील राजकीय समीकरणे अवलंबून आहेत. वाॅर्डनिहाय आरक्षण पूर्ण झाले आहे. सरपंच आरक्षणाकडे गावाच्या नजरा लागल्या आहेत. सरपंचपद खुले हाेणार, या अपेक्षेने अनेकांनी देव पाण्यात घालून गुडघ्याला बाशिंग बांधले आहे.

दत्तूआप्पा गटाकडून संजय खोत, सुरेश कदम, प्रकाश माने, उध्दव कदम, सर्जेरावबापू गटाकडून वसंत कदम, प्रशांत कदम, दादासाहेब कदम, तर हुतात्मा गटाकडून विद्यमान सरपंच सुहास कदम, माजी उपसरपंच संभाजी कदम यांनी तयारी चालविली आहे. यामुळे सध्या सर्वांचे लक्ष राजकीय घडामोडींकडे लागून राहिले आहे.