शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

नुकसान वीज कंपनी भरून देणार का?

By admin | Updated: July 7, 2015 23:30 IST

शेतकऱ्यांचा सवाल : इस्लामपूर येथे ऊर्जामित्र बैठकीत जयंतरावांसमोर कैफियत

इस्लामपूर : आम्ही बँकांची कर्जे काढून विहिरी खोदल्या़ मात्र २-३ वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने आमचे झालेले नुकसान महावितरण कंपनी भरून देणार आहे का? असा संतप्त सवाल करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आपण काहीजणांनी ग्राहक पंचायतीकडे अर्ज करा, बघू या काय होते,’ असा सल्ला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील ‘ऊर्जा मित्र’ बैठकीमध्ये दिला़ आ़ पाटील यांनी वाळवा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते़ महावितरणचे कार्यकारी अधिकारी उस्मान शेख, उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, वैभव गोंदील, विक्रांत सपाटे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली़ आ़ पाटील म्हणाले की, ज्यांनी शेतीपंपासाठी एप्रिल २0१२ ते मार्च २0१३ दरम्यान पैसे भरले आहेत, अशा ३३५ ग्राहकांची यादी केली असून त्यांची कामे सध्या सुरू आहेत़ या कामांना गती द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जुन्या, लोंबणाऱ्या, घरांवरून जाणाऱ्या तारा बदलणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे आदी कामांचे १६८0 प्रस्ताव तयार केले असून, केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मिळाल्यानंतर ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील़ रेठरेहरणाक्ष गावात ट्रान्स्फॉर्मरला जागा मिळत नसल्याने पुढच्या आठवड्यात गावात आल्यावर भेट देऊ.माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, चिमण डांगे, खंडेराव जाधव, रेठरेहरणाक्षचे सरपंच जे़ डी़ मोरे, बहेचे सरपंच सुधीर रोकडे, येडेमच्छिंद्रचे संग्राम पाटील, साखराळेचे सुनील पाटील, बावचीचे अनिल शिंगारे यांनी गावाचे प्रश्न मांडले. पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती भाग्यश्री शिंदे, पं़ स़ सदस्य जयकर पाटील, सुभाष पाटील यांनी स्वागत केले़. विनायकअण्णा पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, पं़ स़ सदस्य नंदकुमार पाटील, सौ़ राजेश्वरी पाटील, सौ़ रेखा कोळेकर, सौ़ शोभा देसावळे, सौ. जयश्री कदम, सुनील पोळ, पप्पू शेळके, प्रदीप थोरात उपस्थित होते. (वार्ताहर)कनेक्शन्स नावावर करून देण्याची मागणीकर्ज काढून विहीर, कूपनलिका खोदल्याची कैफियत धोंडिराम भक्ते, राजेंद्र पाटील, मोहन पाटील यांनी मांडली़ येवलेवाडीचे पोपट जगताप यांनी, आजोबा-वडिलांच्या नावावरील कनेक्शन्स कागदपत्रांची पाहणी करून नावावर करून द्यावीत, अशी मागणी केली़ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.जयंत पाटील यांनीही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वीज ग्राहकांना नाहक त्रास देऊ नये, अशी सूचना दिली.