शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान वीज कंपनी भरून देणार का?

By admin | Updated: July 7, 2015 23:30 IST

शेतकऱ्यांचा सवाल : इस्लामपूर येथे ऊर्जामित्र बैठकीत जयंतरावांसमोर कैफियत

इस्लामपूर : आम्ही बँकांची कर्जे काढून विहिरी खोदल्या़ मात्र २-३ वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने आमचे झालेले नुकसान महावितरण कंपनी भरून देणार आहे का? असा संतप्त सवाल करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आपण काहीजणांनी ग्राहक पंचायतीकडे अर्ज करा, बघू या काय होते,’ असा सल्ला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील ‘ऊर्जा मित्र’ बैठकीमध्ये दिला़ आ़ पाटील यांनी वाळवा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते़ महावितरणचे कार्यकारी अधिकारी उस्मान शेख, उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, वैभव गोंदील, विक्रांत सपाटे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली़ आ़ पाटील म्हणाले की, ज्यांनी शेतीपंपासाठी एप्रिल २0१२ ते मार्च २0१३ दरम्यान पैसे भरले आहेत, अशा ३३५ ग्राहकांची यादी केली असून त्यांची कामे सध्या सुरू आहेत़ या कामांना गती द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जुन्या, लोंबणाऱ्या, घरांवरून जाणाऱ्या तारा बदलणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे आदी कामांचे १६८0 प्रस्ताव तयार केले असून, केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मिळाल्यानंतर ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील़ रेठरेहरणाक्ष गावात ट्रान्स्फॉर्मरला जागा मिळत नसल्याने पुढच्या आठवड्यात गावात आल्यावर भेट देऊ.माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, चिमण डांगे, खंडेराव जाधव, रेठरेहरणाक्षचे सरपंच जे़ डी़ मोरे, बहेचे सरपंच सुधीर रोकडे, येडेमच्छिंद्रचे संग्राम पाटील, साखराळेचे सुनील पाटील, बावचीचे अनिल शिंगारे यांनी गावाचे प्रश्न मांडले. पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती भाग्यश्री शिंदे, पं़ स़ सदस्य जयकर पाटील, सुभाष पाटील यांनी स्वागत केले़. विनायकअण्णा पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, पं़ स़ सदस्य नंदकुमार पाटील, सौ़ राजेश्वरी पाटील, सौ़ रेखा कोळेकर, सौ़ शोभा देसावळे, सौ. जयश्री कदम, सुनील पोळ, पप्पू शेळके, प्रदीप थोरात उपस्थित होते. (वार्ताहर)कनेक्शन्स नावावर करून देण्याची मागणीकर्ज काढून विहीर, कूपनलिका खोदल्याची कैफियत धोंडिराम भक्ते, राजेंद्र पाटील, मोहन पाटील यांनी मांडली़ येवलेवाडीचे पोपट जगताप यांनी, आजोबा-वडिलांच्या नावावरील कनेक्शन्स कागदपत्रांची पाहणी करून नावावर करून द्यावीत, अशी मागणी केली़ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.जयंत पाटील यांनीही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वीज ग्राहकांना नाहक त्रास देऊ नये, अशी सूचना दिली.