शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

नुकसान वीज कंपनी भरून देणार का?

By admin | Updated: July 7, 2015 23:30 IST

शेतकऱ्यांचा सवाल : इस्लामपूर येथे ऊर्जामित्र बैठकीत जयंतरावांसमोर कैफियत

इस्लामपूर : आम्ही बँकांची कर्जे काढून विहिरी खोदल्या़ मात्र २-३ वर्षे वीज कनेक्शन न मिळाल्याने आमचे झालेले नुकसान महावितरण कंपनी भरून देणार आहे का? असा संतप्त सवाल करणाऱ्या शेतकऱ्यांना ‘आपण काहीजणांनी ग्राहक पंचायतीकडे अर्ज करा, बघू या काय होते,’ असा सल्ला माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील ‘ऊर्जा मित्र’ बैठकीमध्ये दिला़ आ़ पाटील यांनी वाळवा तालुक्यातील वीज ग्राहकांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते़ महावितरणचे कार्यकारी अधिकारी उस्मान शेख, उपकार्यकारी अभियंता प्रदीप सुरवसे, वैभव गोंदील, विक्रांत सपाटे यांनी प्रश्नांना उत्तरे दिली़ आ़ पाटील म्हणाले की, ज्यांनी शेतीपंपासाठी एप्रिल २0१२ ते मार्च २0१३ दरम्यान पैसे भरले आहेत, अशा ३३५ ग्राहकांची यादी केली असून त्यांची कामे सध्या सुरू आहेत़ या कामांना गती द्यावी, अशा सूचना दिल्या आहेत. जुन्या, लोंबणाऱ्या, घरांवरून जाणाऱ्या तारा बदलणे, ट्रान्स्फॉर्मर बदलणे आदी कामांचे १६८0 प्रस्ताव तयार केले असून, केंद्र शासनाच्या योजनेतून निधी मिळाल्यानंतर ही कामे तातडीने सुरू करण्यात येतील़ रेठरेहरणाक्ष गावात ट्रान्स्फॉर्मरला जागा मिळत नसल्याने पुढच्या आठवड्यात गावात आल्यावर भेट देऊ.माजी नगराध्यक्ष विजयभाऊ पाटील, चिमण डांगे, खंडेराव जाधव, रेठरेहरणाक्षचे सरपंच जे़ डी़ मोरे, बहेचे सरपंच सुधीर रोकडे, येडेमच्छिंद्रचे संग्राम पाटील, साखराळेचे सुनील पाटील, बावचीचे अनिल शिंगारे यांनी गावाचे प्रश्न मांडले. पं़ स़ सभापती रवींद्र बर्डे यांनी प्रास्ताविक केले. उपसभापती भाग्यश्री शिंदे, पं़ स़ सदस्य जयकर पाटील, सुभाष पाटील यांनी स्वागत केले़. विनायकअण्णा पाटील, गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव, बाळासाहेब पाटील, संजय पाटील, पं़ स़ सदस्य नंदकुमार पाटील, सौ़ राजेश्वरी पाटील, सौ़ रेखा कोळेकर, सौ़ शोभा देसावळे, सौ. जयश्री कदम, सुनील पोळ, पप्पू शेळके, प्रदीप थोरात उपस्थित होते. (वार्ताहर)कनेक्शन्स नावावर करून देण्याची मागणीकर्ज काढून विहीर, कूपनलिका खोदल्याची कैफियत धोंडिराम भक्ते, राजेंद्र पाटील, मोहन पाटील यांनी मांडली़ येवलेवाडीचे पोपट जगताप यांनी, आजोबा-वडिलांच्या नावावरील कनेक्शन्स कागदपत्रांची पाहणी करून नावावर करून द्यावीत, अशी मागणी केली़ महावितरणच्या अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना विद्युत कनेक्शन देण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन दिले आहे.जयंत पाटील यांनीही महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना वीज ग्राहकांना नाहक त्रास देऊ नये, अशी सूचना दिली.