शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

‘डॉल्बी’ला दणका खरंच बसणार का?

By admin | Updated: September 5, 2014 00:16 IST

पोलीस आक्रमक : दोन वर्षानंतर कायद्यावर बोट

सांगली : गणेश विसर्जनाच्या पाचव्यादिवशी ‘डॉल्बी’चा दणदणाट सुरू ठेवणाऱ्या पाच मंडळांच्या अध्यक्ष, पदाधिकारी व डॉल्बी मालकांवर गुन्हे दाखल करून पोलिसांनी डॉल्बीविरोधी असलेली त्यांची भूमिका न्यायालयाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी आक्रमक असल्याचे दाखविले आहे. गेल्या दोन वर्षांत यावर्षी प्रथमच डॉल्बीचा दणदणाट सुरू ठेवल्याने गुन्हे दाखल झाले आहेत.डॉल्बीच्या दणदणाटाने नागरिकांच्या विशेषत: आजारी लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण होतो. आवाज सहन न झाल्याने लोकांचा बळी गेलेल्या घटनाही घडल्या आहेत. दोन वर्षापूर्वी पोलीसप्रमुखपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दिलीप सावंत यांनी ‘नो डॉल्बी’चा इशारा दिला होता. त्याचा परिणाम चांगला झाला. एकाही मंडळाने डॉल्बी लावण्याचे धाडस केले नाही. गतवर्षीही मंडळांनी डॉल्बी लावण्याचे धाडस केले नाही. ‘नो डॉल्बी’साठी पोलिसांनी दोन वर्षे फार मेहनत घ्यावी लागली; मात्र यावर्षी पोलिसांकडून ‘नो डॉल्बी’साठी फारसे प्रयत्न झाले नाहीत. एक-दोनवेळा मंडळाची बैठक घेऊन डॉल्बी लावू नका, असे आवाहन केले. याला काही मंडळांनी प्रतिसाद दिला, तर काहींनी पोलिसांना न जुमानता मोठ्या सुपाऱ्या देऊन डॉल्बी बुक केले आहेत. त्याचाच एक भाग पाचव्यादिवशी पाच मंडळांनी मिरवणुकीत बेभान होऊन डॉल्बीचा आवाज सोडला. यामुळे पोलिसांना कायद्यावर बोट ठेवून गुन्हे दाखल करावे लागले आहेत. यावेळी पोलीस अधीक्षक दिलीप सावंत म्हणाले, डॉल्बी लावू नका, असे आवाहन यापूर्वी केले आहे. यामुळे पोलीस गप्प बसणार नाहीत. डॉल्बीचा दणदणाट सुरू ठेवल्यास गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. गुन्हे दाखल करून गप्प बसणार नाही. त्याचा तपास करून शिक्षेसाठी प्रयत्न केले जातील. (प्रतिनिधी)शिक्षेची तरतूद ध्वनीप्रदूषण नियंत्रण नियम २००० व पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ नुसार डॉल्बीचालक व मंडळांवर कारवाई करण्याचा अधिकार पोलिसांना आहे. या कायद्यांतर्गत न्यायालयात गुन्हा सिध्द झाल्यास पाच वर्षांचा कारावास व लाख रुपये दंड, अशी शिक्षेची तरतूद असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजू मोरे यांनी दिली. ध्वनी तीव्रतेची प्रिंटगणेश विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी लावलेल्या डॉल्बीच्या आवाजाची तपासणी करण्यासाठी विशेष पथक तैनात केले आहे. हे पथक ध्वनीमापक यंत्राद्वारे तपासणी करते. त्यानंतर त्याची प्रिंट करून संबंधित मंडळांच्या कार्यकर्त्यांना आवाजाची मर्यादा ओलांडली असल्याचे दाखवून देते. पुढे याच प्रिंटच्या पुराव्याआधारे गुन्हा दाखल केला जातो, तसेच न्यायालयातही सादर केला जातो.