शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
3
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
4
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
5
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
6
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
7
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
8
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
9
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
10
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
11
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
12
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
13
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
14
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
15
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
16
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
17
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
18
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
19
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
20
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...

गुंडगिरी करणाऱ्यांना निवडून देणार का?

By admin | Updated: August 4, 2015 23:35 IST

पतंगराव कदम : कवठेमहांकाळ येथील प्रचार सभेत सवाल; भाजप नेत्यांवर टीका

कवठेमहांकाळ : तासगावमध्ये बाजार समितीच्या निवडणुकीत गुन्हेगारांनी कहर केला आहे. ही लोकशाहीच्या इतिहासातील दुर्दैवी घटना आहे. मग अशा गुंडगिरी प्रवृत्तीला आपण पोसायचे का? त्यांना आपण संधी द्यायची का?, असा सवाल आ. पतंगराव कदम यांनी खासदार संजयकाका पाटील यांचे नाव न घेता केला. दरम्यान, अशा प्रवृत्तींना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार करावे, असे आवाहनही त्यांनी केले.कवठेमहांकाळ येथे मंगळवारी शेतकरी दूध संघाच्या सभागृहात वसंतदादा रयत पॅनेलच्या प्रमुख कार्यकर्त्यांची व मतदारांची सभा पार पडली. यावेळी कदम बोलत होते.कदम म्हणाले की, माझ्या आजवरच्या राजकीय जीवनात मी संस्था वाढविण्याचे व सुदृढ ठेवण्याचे काम केले. संस्था काढायच्या व मोडायच्या हा उद्योग कधीच केला नाही. त्यामुळे या बाजार समितीच्या निवडणुकीत मिरज, कवठेमहांकाळ, जतच्या लोकांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे. एकेकाळी महाराष्ट्राच्या राजकारणात सांगली जिल्ह्याचा वचक होता. परंतु आता महाराष्ट्राच्या राजकारणात ‘सांगली चिल्लर’ झाली आहे. वसंतदादांच्या पश्चात सांगलीचा दबदबा राहिला नाही. हा दबदबा पुन्हा निर्माण करण्यासाठी जनतेने आपल्याला ताकद व आशीर्वाद द्यावेत.सांगलीच्या राजकारणात ‘सत्तापिपासू’ टोळ्या निर्माण झाल्या आहेत. टोळ्या करून सत्ता भोगायची अन् स्वार्थ साधायचा, असे उद्योग या टोळ्यांनी आजवर जिल्ह्यात केले आहेत. शेतकऱ्यांच्या विकासासाठी अशा टोळ्या मतदारांनी राजकारणातून हद्दपार कराव्यात. लोकशाही व्यवस्थेमध्ये राजकारणाला गुंडगिरीचा वास येऊ लागला आहे. त्यामुळे अशा लोकांना संधी द्यायची का, याबाबतचा निर्णय मतदारांनी घ्यावा, असे ते म्हणाले. अजितराव घोरपडे म्हणाले, शेती व शेतकऱ्यांच्या चांगल्या भवितव्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची असून मतदारांनी काठावर विजयी करू नये, तर भरघोस मतांनी विजयी करावे. बाजार समितीचा निकाल भविष्यातील राजकारणाला कलाटणी देणारा असेल. शेतकऱ्यांसाठी भविष्यात बरेच काही करायचे आहे. त्यामुळे त्यादृष्टीने मतदारांनी कौल द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत माजी आमदार दिनकर पाटील, आप्पासाहेब शिंदे, शंकर गायकवाड यांचीही भाषणे झाली. सभेस आनंदराव मोहिते, राजवर्धन घोरपडे, बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले, उदयसिंह शिंदे, सुनील माळी, तानाजी यमगर उपस्थित होते. (वार्ताहर)राजकारण स्वच्छ करायचे आहे...पतंगराव कदम म्हणाले की, जिल्ह्यातील राजकारणात गदारोळ सुरू आहे. बऱ्याच अपप्रवृत्ती शिरल्या आहेत. भानगडीही बऱ्याच सुरू असतात. अशा परिस्थितीत स्वच्छता मोहीम आम्ही हाती घेतली आहे. काही संस्थांमध्ये याचे काम यापूर्वीच सुरू झाले आहे. आता बाजार समितीच्या माध्यमातून राजकीय स्वच्छता करायची आहे. ही स्वच्छता झाली की, समितीचा कारभार चांगल्या पद्धतीने करता येईल. बाजार समितीमधून जतला वगळण्याचा डाव काहीजणांनी आखला होता. आपण तो यशस्वी होऊ दिला नाही. यापुढेही आम्ही या तालुक्यावर अन्याय होऊ देणार नाही. बाजार समितीशी संबंधित जत, कवठेमहांकाळ व मिरज पूर्व हे भाग दुष्काळी आहेत. त्यामुळे या दुष्काळी भागाच्या विकासाकरिता आम्ही प्रयत्न करणार आहोत. त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे पतंगराव कदम म्हणाले.