शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

कशाला पाहिजे संचालकपद?

By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST

सहकारी संस्था निवडणूक : वाळवा-शिराळा तालुक्यातील चित्र

अशोक पाटील - इस्लामपूर वाळवा व शिराळा तालुक्यातील विविध सहकारी सोसायट्या, बँका, पतसंस्था, कारखाने आदींच्या निवडणुका बिनविरोध होत आहेत. सद्यस्थितीत अशा संस्थांवर संचालक म्हणून जाण्यासाठी कोणालाही स्वारस्य राहिलेले नाही. वर्षानुवर्षे जे संचालक पदावर कार्यरत आहेत, तेच पुन्हा बिनविरोध निवडून येत आहेत. काही घराणी सोडली, तर इतरांकडून लष्कराच्या भाकरी भाजण्यापेक्षा शेतीवर लक्ष केंद्रित करण्यावर भर दिला जात आहे.वाळवा व शिराळा तालुक्यात सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. ग्रामीण भागातील बहुतांशी संस्थांच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत. कट्टर विरोधी नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून संस्था बिनविरोध केल्या आहेत. जे वर्षानुवर्षे संस्थांवर कार्यरत आहेत, तेच पुन्हा त्या पदावर दिसत आहेत. नवीन चेहरे मात्र सध्या या निवडणुकीकडे ढुंकूनही पाहात नाहीत. त्यामुळे सहकारी संस्थांच्या निवडणुकीत कसलीही स्पर्धा नसल्याने ऐन उन्हाळ्यात शांतता पसरली आहे.राजारामबापू साखर कारखाना, राजारामबापू दूध संघ, राजारामबापू बँक या संस्था सक्षम आहेत. या संस्थेवर ठराविक घराण्यांचीच मक्तेदारी आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या गत निवडणुकीत नेत्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून संचालकपदे वाटून घेऊन निवडणूक बिनविरोध केली. त्यामुळे यावेळीही निवडणुकीत स्मशानशांतता दिसत आहे. राजारामबापू कारखान्याच्या निवडणुकीत रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेचे तोकडे आव्हान असते. बहुतांश जागा बिनविरोध होत असतात. त्यामुळे यावेळची निवडणूकही बिनविरोधच होण्याची शक्यता आहे. दूध संघ व बँकेवर आमदार जयंत पाटील ठरवतील त्यांनाच संचालक पदाची संधी दिली जाते. त्यामुळे इच्छा असूनही बहुतांशी कार्यकर्ते निवडणुकीपासून अलिप्तच राहतात. अशीच अवस्था राजारामबापू उद्योग समूहातील सर्वच सहकारी संस्थांची आहे. त्यामुळे संस्थांच्या निवडणुकीत नेहमीचे चेहरे सोडले, तर इतर कोणालाही स्वारस्य राहिलेले नाही. त्यांनी आता आधुनिक शेती करण्यावर भर देण्यास सुरुवात केली असल्याचे चित्र आहे.गावाच्या विकासाला प्राधान्यआमदार शिवाजीराव नाईक व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विधानसभा निवडणुकीवेळी संघर्ष झाला होता. त्यात सत्यजित देशमुख यांच्या गटाच्या कार्यकर्त्यांचीही भर पडली होती. शिराळा तालुक्यातील या तीन नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी बहुतांश सेवा सोसायट्या बिनविरोध करीत गावाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे.