शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

पाणीपुरवठ्याच्या खासगीकरणाचा घाट

By admin | Updated: July 18, 2016 00:46 IST

महापालिकेत नवा संशयकल्लोळ : दुबईच्या कंपनीची आॅफर; दीड हजार कोटींची गरजच काय?

सांगली : महापालिकेच्या पाणीपुरवठा व मलनिस्सारणच्या कामासाठी दुबईस्थित पेट्रोकॉर्प कंपनीने दीड हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची तयारी दर्शविली आहे. वास्तवित इतक्या निधीची महापालिकेला गरज आहे का, हाच खरा प्रश्न आहे. त्यातून पाणीपुरवठा विभागाची यंत्रणा कंपनीच्या ताब्यात देण्याची अट घातली आहे. जणू काही पाणीपुरवठा विभागाचे खासगीकरण करण्याचाच हा घाट म्हणावा लागेल. या कंपनीच्या अहवालाबाबत प्रशासन, लोकप्रतिनिधी अनभिज्ञ आहेत. त्यामुळे भविष्यात या कंपनीच्या निधीवरून नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना विदेशी कंपन्यांची भुरळ पडली आहे. त्यापूर्वी जापनीज बँकेच्या कर्जावरून पालिकेत वादळ उठले होते. आता दुबईस्थित एका कंपनीने पालिका हद्दीत गुंतवणुकीची तयारी दर्शविली. मध्यंतरी कंपनीकडून सादरीकरणही झाले. या कंपनीला महापालिका हद्दीत सर्वेक्षण करण्यास मंजुरी दिली नव्हती. तरीही कंपनीने दोन दिवसांपूर्वी महापौर हारूण शिकलगार व आयुक्त रवींद्र खेबूडकर यांना दीड हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे पत्र दिले. हा आकडा पाहून अनेक नगरसेवक अवाक् झाले. महापालिकेला इतक्या निधीची गरज आहे का? असा सवालही नगरसेवकांतून उपस्थित होऊ लागला आहे. दुबईची कंपनी पाणीपुरवठा विभागावर ८०८ कोटी रुपये खर्च करणार आहे. पण सध्या महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातील बहुतांश कामे मार्गी लागली आहेत. केवळ वारणा योजना व ७० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्राचे काम बाकी आहे. त्यासाठी सुमारे १०० कोटींची गरज आहे. त्यात नुकताच केंद्र शासनाने अमृत योजनेतून ७५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून वारणा योजना मार्गी लागू शकते. उर्वरित जलशुद्धीकरण केंद्रासाठी वित्त आयोगाचा निधी वापरता येईल. त्यात कंपनीने बिसलरी दर्जाचे शुद्ध पाणी देण्यासह २० वर्षांचा करार करून दरवर्षी कंपनीला काही रक्कम अदा करण्याची अट घातली आहे. यातून पाणीपुरवठ्याचे खासगीकरणच होणार आहे. ही संपूर्ण पाणीपुरवठा यंत्रणा कंपनीच्या ताब्यात जाईल, अशी भीतीही व्यक्त होऊ लागली आहे. (प्रतिनिधी) नव्या वादाला तोंड ड्रेनेज योजनेचे घोडे अडले आहे, हे खरे असले तरी, ही योजना पूर्ण करण्यासाठी १०० कोटींची गरज आहे. ही गरज राष्ट्रीयीकृत बँकेकडून कर्ज घेऊन पूर्ण करता येईल. त्यासाठी विदेशी कंपन्यांकडे हात पसरण्याची गरजच काय? असा सवालही नगरसेवकांतून होत आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या अट्टाहासापोटी या कंपनीला महापालिकेत पायघड्या पसरल्या जात आहेत. पण त्यातून आता नव्या वादाला तोंड फुटले असून, सत्ताधाऱ्यांसह विरोधकांकडून या प्रस्तावाला विरोध होऊ लागला आहे. कंपनी आली कशी? : सारेच अनभिज्ञ दुबईस्थित कंपनीने सांगलीची निवड का केली?, हा खरा प्रश्न आहे. या कंपनीने भारतात कुठेही अशी गुंतवणूक केलेली नाही. थेट सांगली व कोल्हापूर महापालिकेत गुंतवणुकीसाठी ही कंपनी आली होती. कंपनीला कुठेही सर्वेक्षण करण्याची मान्यता दिलेली नव्हती. तरीही कंपनीने चार पानांवर अहवाल करून महापौर व आयुक्तांना सादर केला. आता दीड हजार कोटीची गुंतवणूक आणि चार पानांचा अहवाल यामुळे कंपनीच्या कार्यपद्धतीबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.