शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

निकृष्ट घरकुलांची चौकशी करणार कोण?

By admin | Updated: June 13, 2015 00:13 IST

प्रशासन गांभीर्यहीन : जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर सहा महिन्यांपासून कार्यवाहीच नाही

तासगाव : झोपडपट्टी निर्मूलनासाठी तासगाव नगरपालिकेने कोट्यवधी रुपये खर्चून घरकुलांची उभारणी केली. मात्र या घरकुलांचा दर्जा निकृष्ट आहे. या योजनेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली होती. त्यांनी चौकशी समितीच्या माध्यमातून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. मात्र त्यांचे आदेश सहा महिन्यांपासून धूळ खात पडून आहेत. त्यामुळे निकृष्ट घरकुलांची चौकशी करुन झोपडपट्टीधारकांना न्याय मिळवून देणार कोण? असा प्रश्न उपस्थित होत आहे.तासगाव शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी नगरपालिकेच्यावतीने घरकुल योजना राबविण्यात आली. त्यासाठी केंद्र शासनाकडून साडेचार कोटींचा निधी मिळाला. घरकुल उभारणीचा ठेका देण्यात आला. साडेचार कोटी रुपये खर्ची पडले. ३९७ घरकुले उभारण्यात आली. मात्र या घरकुलांचे काम दर्जाहीन असल्याचे उघडकीस आले. याबाबत तत्कालीन जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंंह कुशवाह यांच्याकडे जानेवारी महिन्यात तक्रार करण्यात आली होती. कुशवाह यांनी या तक्रारीची दखल घेत उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्याचे आश्वासन दिले होते. समितीच्या माध्यमातून तासगाव, विटा व इस्लामपूर पालिकांच्या घरकुल योजनेतील कामाचा दर्जा, निधी खर्चाची सखोल चौकशी करण्यात येणार होती. या चौकशीअंती दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते.तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी सहा महिन्यांपूर्वी चौकशीचे आश्वासन देऊनही अद्याप याबाबत कोणतीही कार्यवाही झालेली नाही. ना चौकशी अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली, ना नगरपरिषदांना चौकशीसंदर्भात पत्रव्यवहार करण्यात आला. प्रशासकीय पातळीवर चौकशी व कारवाईबाबत टाळाटाळ होत आहे. यामुळे झोपडपट्टीधारकांना गळक्या घरातच वास्तव्य करावे लागणार आहे. (वार्ताहर)ठेका एकास, काम दुसऱ्याचे! घरकुल योजनेच्या कामाचा ठेका शिरोळ येथील रोडलॅन्ड कंपनीने घेतला होता. प्रत्यक्षात मात्र हे काम दुसऱ्याच ठेकेदाराने केले असल्याची चर्चा आहे. राजकीय वरदहस्त आणि प्रशासकीय अनास्था यामुळेच या कामाचा दर्जा निकृष्ट झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच कारवाईकडे दुर्लक्ष झाले आहे.