शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
6
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
7
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
8
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
9
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
10
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
11
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
12
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
13
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
14
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
15
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
16
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
17
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
19
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
20
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...

फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने ...

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने झाले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार केल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे ते म्हणाले.

पाटील म्हणाले की, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आस्थापना बोर्डाच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदल्यांबाबत शुक्ला यांचा अहवाल खोटा आहे. अहवालात संदीप बिष्णोई यांची बदली नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होणार असल्याचे म्हटले होते पण त्याची बदली रेल्वे अप्पर पोलीस आयुक्त झाली आहे. संजयकुमार वर्मा यांची बदलीच झालेली नाही. विनयकुमार चौबे, बी. के. सिंग यांच्या बदल्याही अहवालात नमूद ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेली उदाहरणे चुकीची आहेत, असे काहीच घडलेले नाही. उलट फडणवीस गृहमंत्री असताना आस्थापना बोर्डाला डावलून पोलीस अधिकाऱ्यांचा थेट बदल्या केल्या होत्या. त्यात पारदर्शकता नव्हती. त्यांच्या काळात किती अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या केल्या हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही दिले.

रश्मी शुक्ला यांच्या अहवालात गृहमंत्र्यांवर कोणताही आरोप नाही. त्यातील आरोप ठेवलेल्या व्यक्ती या खासगी आहेत. एकच व्यक्ती उच्चश्रेणीतील अधिकारी आहे पण फोन टॅपिंगचे अधिकार त्यांना कुणी दिला, याची चौकशी होण्याची गरज आहे.

चौकट

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

वास्तविक अंबानीच्या घरासमोर वाहन, मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन मूळ विषय आहेत. हिरेन मृत्यूचा तपास एटीएसने अंतिम टप्प्यात आणला होता; पण आता हा तपास एनआयएने काढून घेतला आहे. एटीएसला आणखी चार दिवस मिळाले असते तर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचले असते. या दोन्ही विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच फडणवीस यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

चौकट

विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत

महाराष्ट्रात काहीही घडले की विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत आहे. एखादी घटना घडल्यावर त्याचा तपास व्हावा, चौकशी व्हावी, असे त्यांचा आग्रहच नसतो. उठसूट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगले रूळले आहेत. पण त्यांचा डोळा सत्तेकडेही आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपदालाही न्याय देऊ शकणार नाही. ते भाजपच्या दृष्टीने चांगले नाही, असा चिमटाही पाटील काढला.