शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने ...

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने झाले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार केल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे ते म्हणाले.

पाटील म्हणाले की, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आस्थापना बोर्डाच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदल्यांबाबत शुक्ला यांचा अहवाल खोटा आहे. अहवालात संदीप बिष्णोई यांची बदली नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होणार असल्याचे म्हटले होते पण त्याची बदली रेल्वे अप्पर पोलीस आयुक्त झाली आहे. संजयकुमार वर्मा यांची बदलीच झालेली नाही. विनयकुमार चौबे, बी. के. सिंग यांच्या बदल्याही अहवालात नमूद ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेली उदाहरणे चुकीची आहेत, असे काहीच घडलेले नाही. उलट फडणवीस गृहमंत्री असताना आस्थापना बोर्डाला डावलून पोलीस अधिकाऱ्यांचा थेट बदल्या केल्या होत्या. त्यात पारदर्शकता नव्हती. त्यांच्या काळात किती अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या केल्या हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही दिले.

रश्मी शुक्ला यांच्या अहवालात गृहमंत्र्यांवर कोणताही आरोप नाही. त्यातील आरोप ठेवलेल्या व्यक्ती या खासगी आहेत. एकच व्यक्ती उच्चश्रेणीतील अधिकारी आहे पण फोन टॅपिंगचे अधिकार त्यांना कुणी दिला, याची चौकशी होण्याची गरज आहे.

चौकट

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

वास्तविक अंबानीच्या घरासमोर वाहन, मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन मूळ विषय आहेत. हिरेन मृत्यूचा तपास एटीएसने अंतिम टप्प्यात आणला होता; पण आता हा तपास एनआयएने काढून घेतला आहे. एटीएसला आणखी चार दिवस मिळाले असते तर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचले असते. या दोन्ही विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच फडणवीस यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

चौकट

विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत

महाराष्ट्रात काहीही घडले की विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत आहे. एखादी घटना घडल्यावर त्याचा तपास व्हावा, चौकशी व्हावी, असे त्यांचा आग्रहच नसतो. उठसूट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगले रूळले आहेत. पण त्यांचा डोळा सत्तेकडेही आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपदालाही न्याय देऊ शकणार नाही. ते भाजपच्या दृष्टीने चांगले नाही, असा चिमटाही पाटील काढला.