शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:24 IST

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने ...

सांगली : राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांना फोन टॅपिंगचे अधिकार कुणी दिले? हे टॅपिंग कुणाच्या आदेशाने झाले? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना केला. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आस्थापना मंडळाच्या शिफारशीनुसार केल्या आहेत. त्यामुळे फडणवीस यांचे आरोप धादांत खोटे असल्याचे ते म्हणाले.

पाटील म्हणाले की, राज्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या पोलीस आस्थापना बोर्डाच्या शिफारशीनुसार करण्यात आल्या आहेत. त्यामुळे बदल्यांबाबत शुक्ला यांचा अहवाल खोटा आहे. अहवालात संदीप बिष्णोई यांची बदली नवी मुंबईचे पोलीस आयुक्त होणार असल्याचे म्हटले होते पण त्याची बदली रेल्वे अप्पर पोलीस आयुक्त झाली आहे. संजयकुमार वर्मा यांची बदलीच झालेली नाही. विनयकुमार चौबे, बी. के. सिंग यांच्या बदल्याही अहवालात नमूद ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे फडणवीस यांनी दिलेली उदाहरणे चुकीची आहेत, असे काहीच घडलेले नाही. उलट फडणवीस गृहमंत्री असताना आस्थापना बोर्डाला डावलून पोलीस अधिकाऱ्यांचा थेट बदल्या केल्या होत्या. त्यात पारदर्शकता नव्हती. त्यांच्या काळात किती अधिकाऱ्यांच्या थेट बदल्या केल्या हे त्यांनी जाहीर करावे, असे आव्हानही दिले.

रश्मी शुक्ला यांच्या अहवालात गृहमंत्र्यांवर कोणताही आरोप नाही. त्यातील आरोप ठेवलेल्या व्यक्ती या खासगी आहेत. एकच व्यक्ती उच्चश्रेणीतील अधिकारी आहे पण फोन टॅपिंगचे अधिकार त्यांना कुणी दिला, याची चौकशी होण्याची गरज आहे.

चौकट

लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न

वास्तविक अंबानीच्या घरासमोर वाहन, मनसुख हिरेनचा मृत्यू हे दोन मूळ विषय आहेत. हिरेन मृत्यूचा तपास एटीएसने अंतिम टप्प्यात आणला होता; पण आता हा तपास एनआयएने काढून घेतला आहे. एटीएसला आणखी चार दिवस मिळाले असते तर मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचले असते. या दोन्ही विषयांवरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठीच फडणवीस यांच्याकडून सातत्याने आरोप सुरू आहेत, अशी टीकाही पाटील यांनी केली.

चौकट

विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत

महाराष्ट्रात काहीही घडले की विरोधकांची मजल राष्ट्रपती राजवटीपर्यंत आहे. एखादी घटना घडल्यावर त्याचा तपास व्हावा, चौकशी व्हावी, असे त्यांचा आग्रहच नसतो. उठसूट राष्ट्रपती राजवटीची मागणी केली जाते. देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते म्हणून चांगले रूळले आहेत. पण त्यांचा डोळा सत्तेकडेही आहे. त्यामुळे ते विरोधी पक्षनेतेपदालाही न्याय देऊ शकणार नाही. ते भाजपच्या दृष्टीने चांगले नाही, असा चिमटाही पाटील काढला.